शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'अजित पवारांनी पालकमंत्रिपद घ्यावं, अंधारात कोण काय काय करतंय हे कळेल'; बजरंग सोनवणेंचा रोख कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 14:16 IST

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज खासदार बजरंग सोनवणे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता आरोप केला.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पोलिसांनी अजूनही काही आरोपींना अटक केलेली नाही. आरोपींना अटक करण्याची मागणी वाढली आहे. तर या गुन्ह्याचा तपास सीआयडी करत आहे. दरम्यान, आता यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी हा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद घ्यावे अशी मागणी केली. 

“मनमोहन सिंग यांनी न बोलता, शांतपणे करुन दाखवले, ते अनेकांना बोलून करता आले नाही”: राज ठाकरे

'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कारवाई करु, देशमुख यांना न्याय देऊ असं सांगितलं आहे. पण, अजूनही असं काही होत असल्याचे दिसत नाही. काही दिवस याचा तपास पोलिस करत होते, यानंतर सीआयडीकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला. पोलिस यंत्रणेला हे तिनही गुन्हे कुठेतरी लिंक असल्याचं पोलिसांच्या लक्षात आले आहे. यामुळे या गुन्हाच्या पाठिमागचा कोण मास्टरमाइंड आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी खासदार सोनवणे यांनी केली. 

गुन्हेगारांना कोण पाठबळ देत आहे त्याचा तपास केला पाहिजे

"कोण सीआयडीची मागणी तर कोण एसआयटीची मागणी करत आहे. पण मी पहिल्या दिवसापासून सीबीआयची मागणी करत आहे. गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. गेल्या पाच वर्षापासून वेगळ्या ट्रॅकवर गेला आहे. याच्यात कोण आहे ते तपासले पाहिजे, गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळत आहे. या गुन्ह्याच्या संदर्भात मी कोणाच नाव घेण्यापेक्षा लोकांना सर्व गोष्टी माहित आहेत. बीड जिल्ह्यात ज्या घटना घडल्या आहेत. त्या घटनेचा उहापोह झालेला नाही, दमानिया यांनीही व्हिडीओ शेअर केल्या आहेत. याचे तपास केले पाहिजेत. या गुन्हेगारांना कोण पाठबळ देत आहे त्याचा तपास केला पाहिजे. सीडीआर काढला तर याची सर्व माहिती मिळेल, असंही बजरंग सोनवणे म्हणाले. 

"मागच्यावेळी जे सत्तेत आहेत त्यांनी या पोलिसांना खुर्चीवर बसवले आहे.  असा आरोप त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर केला. एसपी साहेब आता आमच्याकडे नवीन जॉईन झाले आहेत. त्यांनी आता बदल केले पाहिजेत. 

या आधीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, त्यामुळे अंधारात कोण काय काय करतंय हे जाणून घ्यायचं असेल तर अजितदादांनी बीडचे पालकमंत्रिपद घ्यावं अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली.

टॅग्स :bajrang sonwaneबजरंग सोनवणेBeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेAjit Pawarअजित पवार