शेती खरडली, भरपाई मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST2021-05-30T04:26:27+5:302021-05-30T04:26:27+5:30
प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीला खो अंबाजोगाई - अंबाजोगाई शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर आजही ...

शेती खरडली, भरपाई मिळेना
प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीला खो
अंबाजोगाई - अंबाजोगाई शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर आजही सर्रासपणे सुरूच आहे. शासनाने बंदी घातल्यानंतर प्लास्टिकच्या वापराला आळा बसणे आवश्यक आहे. पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिक वापरामुळे जमिनीचे मोठे नुकसान होत आहे व पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. तरी प्लास्टिक बंदीचे गांभीर्य नागरिकांनी बाळगावे.
पाटबंधारे विभागात अनेक पदे रिक्त
अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात पाटबंधारे विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त झाले आहेत. कर्मचारी मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त झाल्याने जे कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्यावर कामाचा मोठा ताण वाढला आहे. परिणामी कामे वेळेवर होत नाहीत. पाटबंधारे विभागात रिक्त असलेली पदे तत्काळ भरावीत व हा विभाग सक्रिय करावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
सुधारित वेतनाची प्रतीक्षा
अंबाजोगाई - ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा निर्णय घेऊन बराच कालावधी लोटला तरी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याबाबत शासनाने या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी केली नाही. ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना हे सुधारित वेतन लागू करावे व त्यांच्यावरील अन्याय दूर करावा.
घरकूल लाभार्थी अनुदानापासून वंचित
अंबाजोगाई - दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या लाभार्थींना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाच्या वतीने विविध घरकूल योजना राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील मुडेगाव, राडी, दैठणा, आपेगाव, राडीतांडा, तडोळा या परिसरातील अनेक लाभार्थींना अजूनही अनुदान मिळाले नाही. या परिसरातील लाभार्थींना अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक कदम यांनी केली आहे.
अंबाजोगाईत घरफोड्यांचे प्रमाण वाढले
अंबाजोगाई - अंबाजोगाई शहर व परिसरात घरफोड्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. घराला कुलूप दिसल्यानंतर घरफोड्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रिंगरोड, पोखरीरोड या परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाकडे दाद मागण्यांचा प्रयत्न केला असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने पोलिसांत तक्रार करणेही नागरिक टाळू लागले आहेत.