शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

करोडोंचे साहित्य चोरीस, अवादा कंपनीने सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या हाती दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:13 IST

सुरक्षा दलाचे जवान करणार आता अवादाची सुरक्षा, कामाच्या साइटवरही राहणार सुरक्षा जवान

केज : तालुक्यातील मस्साजोग येथे असलेल्या अवादा पवन ऊर्जा कंपनीत खंडणी मागणाऱ्या खंडणीखोरांकडून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. तसेच येथे अनेक वेळा चोऱ्या झाल्याच्याही घटना घडल्याने पोलिस सुरक्षा यंत्रणा पुरवू शकत नसल्यामुळे अवादा कंपनीने महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) यांचे शुल्क भरून सुरक्षा घेतली आहे. आता अवादा कंपनी आणि त्यांच्या सर्व कामाच्या ठिकाणी त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी हे आता सशस्त्र संरक्षणासाठी तैनात करण्यात आले आहेत.

मस्साजोग शिवारातील अवादा पवन ऊर्जा कंपनीचे केज तालुक्यातील बालाघाट डोंगर पट्ट्यात अनेक ठिकाणी पवन चक्की उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. दरम्यान, या पवन ऊर्जा कंपनीत अनेक वेळा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना खंडणी मागितल्याच्या घटना घडल्या आहेत. खंडणीला विरोध केल्याच्या प्रकारातून मस्साजोगचे संतोष देशमुख यांचे अपहरण करून अत्यंत निर्दयीपणे त्यांची हत्या करण्यात आली. अवादा पवन ऊर्जा गोदामात अनेक वेळा चोरीच्या घटना घडल्या असून पवन ऊर्जा उभारणीच्या विडा शिवारातील साइटवरही १३ लाखांचे साहित्य चोरीला गेले आहे. या सर्व प्रकारामुळे कंपनीने पोलिसांकडे पोलिस सुरक्षा मागितली होती, परंतु पोलिस विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने त्यांनी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) ची सशस्त्र सुरक्षा सेवा पुरविली आहे. त्यांचे अधिकारी आणि २५ जवान हे रात्रंदिवस कंपनीची सुरक्षा करणार असून साइटवरदेखील राहणार आहेत.

लोकमत बातमीचा इफेक्टअवादा कंपनीच्या मुख्य गोदामासह ज्या ठिकाणी पवन चक्की उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे त्या ठिकाणी पडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या साहित्य चोरीच्या घटना घडल्या होत्या. लोकमत अंकामध्ये गुरुवारी ‘अवादाच्या साहित्याची चोरांना गोडी’ या आशयाची बातमी झळकताच अवादा पवन ऊर्जा प्रकल्पाचे अधिकारी खडबडून जागे झाले. त्यामुळे आता मुख्य गोदामासह कामाच्या साइटवरही सशस्त्र सैनिकांचा पहारा राहणार आहे.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीडCrime Newsगुन्हेगारी