शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

पोस्ट करणारे तर सोडाच पण कमेंट्स अन् ॲडमिनवरही होणार कारवाई

By सोमनाथ खताळ | Updated: June 7, 2024 12:06 IST

सोशल मीडियावर अफवा पसरवू नका : नंदकुमार ठाकूर यांचा इशारा

सोमनाथ खताळ, बीड : लोकसभा निवडणूक मतमोजणी निकालानंतर सोशल मीडियावर वादावादी सुरू झाली आहे. वादग्रस्त पोस्ट केल्याने दोन समाजांत, गटांत हाणामाऱ्या, दगडफेक अशा घटना घडत आहेत. याच अनुषंगाने पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत शांतता ठेवण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवर तर कारवाई होणारच आहे, शिवाय त्याखाली कमेंट्स करणारे आणि ग्रुप ॲडमिनवरही कडक कारवाई करण्याचा इशारा ठाकूर यांनी दिला आहे.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत यावेळी जातीय राजकारण झाले. मतमोजणीनंतर याचे पडसाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी उमटले. त्यानंतर पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेत आवाहन केले. त्यामुळे काही दिवस शांतता राहिली. परंतु आता पुन्हा एकदा मतमोजणीनंतर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याने तणाव निर्माण होत आहे. यासंदर्भात सायबर पोलिसांनी नजर ठेवून वादग्रस्त पोस्ट हटवल्या, शिवाय कारवायाही केल्या आहेत. परंतु लोकांनी हार-जीत मान्य करून शांतता ठेवावी. वादग्रस्त पोस्ट करू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. जर कोणी अशा प्रकारच्या पोस्ट करतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

यावेळी अपर अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक देविदास गात, उपनिरीक्षक शैलेष जोगदंड, निशिगंधा खुळे, स्वाती लहाने यांच्यासह सर्व सायबर टीम उपस्थित होती.

५५० पोस्ट हटवल्या

सायबर पोलिसांना ६०० पेक्षा अधिक वादग्रस्त पाेस्ट आढळून आल्या. त्यातील ५५० पोस्ट हटविण्यात आल्या आहेत. तसेच ३५० लोकांवर आतापर्यंत कारवाई केल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

१५ दिवसांत २८ गुन्हे

व्हाॅट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी समाज माध्यमांवर वादग्रस्त पाेस्ट केल्याने पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. गुरुवारपर्यंत हा आकडा २८ वर पोहोचला होता. यातील २४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सुशिक्षित लोकांकडूनच वादग्रस्त पोस्ट

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणारे हे सर्वात जास्त सुशिक्षितच आहेत. यामध्ये पत्रकार, वकील, इंजिनिअर आदींचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी अफवा पसरवलेल्या वकिलाला न्यायालयाने दोन दिवसांची पाेलिस कोठडी दिली आहे.

दोन दिवसांपासून वातावरण खराब

मतमोजणी झाल्यापासून वातावरण दूषित झाले आहे. दोन समाजांत वाद होत आहेत. भावना दुखावणाऱ्या पोस्ट, अफवा पसरवून वाद घातले जात आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही ठाकूर म्हणाले.

... तर पोलिसांवरही होणार कारवाई

सामान्य नागरिकांप्रमाणेच काही पोलिस अधिकारी, कर्मचारीही राजकीय नेत्यांचे स्टेटस ठेवत आहेत. तसेच वादग्रस्त मजकूर पोस्ट करत आहेत. यावरही ठाकूर यांनी सांगितले की जर असे निदर्शनास आले तर पोलिसांवरही कारवाई केली जाईल.

 

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया