शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

वक्फ जमीन घोटाळा प्रकरणात आरोपींचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 5:19 PM

जिल्ह्यातील वक्फच्या शेकडो एकर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात भूमाफियांसह महसूलचे अधिकारी, कर्मचारी आरोपी आहेत.

बीड : जिल्ह्यात गाजत असलेल्या वक्फ जमीन घोटाळा प्रकरणांपैकी शहरातील शिवाजीनगर ठाण्यात दाखल असलेल्या ४०९ एकरच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांच्यासह इतर आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. या प्रकरणात उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांच्यासह १५ जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील वक्फच्या शेकडो एकर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात भूमाफियांसह महसूलचे अधिकारी, कर्मचारी आरोपी आहेत. २९ डिसेंबर २०२१ रोजी शिवाजीनगर ठाण्यात जिल्हा वक्फ अधिकारी अमीनजुमा खलीखुजमा यांच्या तक्रारीवरून शहेनशाहवली दर्ग्याच्या ४०९ एकर जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरण व खरेदी-विक्रीच्या व्यवहारप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. यात राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाची १५ कोटी रुपयांची रक्कम हडपण्यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा खटाटोप केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. आर्थिक गुन्हे शाखा याचा तपास करत आहेत. यातील उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांच्यासह हबीबोद्दीन सिद्दकी, तत्कालीन तलाठी उद्धव हिंदोळे, पुरुषोत्तम आंधळे, परमेश्वर राख, शेज अश्फाक शेख गौसपाशा, वसंत मंडलिक यांनी अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. न्यायाधीश के. आर. पाटील यांच्यासमोर या प्रकरणात सुनावणी झाली. सुनावणीअंती सर्व आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत.

अटकेच्या कारवाईची दाट शक्यताया प्रकरणात वक्फच्या जमिनी ज्यांनी खरेदी केल्या त्यांनादेखील आरोपी करण्यात आले आहे. काही खरेदीदारांनीदेखील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ‘आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाहून जमिनी खरेदी केल्या आहेत’, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला. मात्र न्यायालयाने त्यांचाही जामीन फेटाळला. त्यामुळे अटकेची शक्यता वाढली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय