शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

'सरेंडर कधी व्हायचं ते आरोपी ठरवतो, पुरावे नष्ट करायला वेळ दिला'; संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:23 IST

वाल्मीक कराड याच्या सरेंडर प्रकरणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी संशय व्यक्त केला.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने आज मुख्य दोन आरोपींना पुण्यातून अटक केली. ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. यावरुन आता आमदार संदीर क्षीरसागर यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. आरोपी स्वत: कधी सरेंडर व्हायचं हे ठरवतात याचा अर्थ आरोपींना पुरावा नष्ट करायला वेळ दिला जात असल्याचा संशय क्षीरसागर यांनी व्यक्त केला. 

'लोकमत'चं WhatsAppचॅनल फॉलो करा!

आज पत्रकार परिषदेमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील संशयीत आरोपींबाबत संशय व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली. 

सरपंच संतोष देशमुखांचे आणखी दोन मारेकरी सापडले; मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, लोकांचे एवढे मोर्चे निघत असताना आरोपींना अटक करण्यासाठी २६ दिवस का लागले? या प्रकरणातील बाकीचे आरोपी कमी वयाचे आहेत, यातील मास्टरमाईंड हा वाल्मीक कराड आहे. त्याच्यावरती ३०२ अजूनही का नाही. कुठेतरी धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे सरंक्षण मिळत आहे, असा संशय आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला. 

"हत्या घडल्यानंतर २६ दिवसांनी आरोपी एखाद्या पिक्चर स्टाईलसारखं सीआयडी कार्यालयात येतात. आरोपींनी हत्या तशीच गाडीचा पाठलाग करुन हत्या केली. आरोपी सगळ्या घडामोडी पाहतो, सगळ्यांना कधी जमा व्हायचं ते सांगतो. मग धनंजय मुंडे यांची वरिष्ठांची भेट झाल्यानंतर तो एका गाडीमधून येतो. बाकीचे आरोपीही त्यांच्या वेळेप्रमाणे येतात. मला तर वाटत या लोकांना पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला जात आहे, असा संशय आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला. 

'धनंजय मुंडे यांनी राजीमाना दिला पाहिजे'

"या प्रकरणी माझी पहिल्या दिवसापासून सीडीआर तपासण्याची मागणी आहे. ज्यावेळी मोर्चा निघाला त्यावेळी त्यांनी एका हॉस्पीटलमधून डिस्चार्ज घेतला, त्याकाळात त्यांना कोण भेटायला आले होते याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजे. धनंजय मुंडे ज्यावेळी पालकमंत्री होते, त्यावेळी त्यांनी काही अधिकारी होते. या तपासात काही मागेपुढे होतंय. त्यामुळे त्यांनी हा तपास होत नाही तोपर्यंत त्यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशा मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली.  

आणखी दोन मारेकरी सापडले

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांचा समावेश होता. तर आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले , कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे हे फरार होते. या आरोपींना पकडण्यासाठी प्रसिद्धीपत्रक जारी करत फरार घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. दोन्ही आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस