शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

माजलगाव धरण, गोदावरी पात्रात २८ हजार ५५० क्युसेक आवक; २६ गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 18:23 IST

सध्या माजलगाव धरणात ४१ टक्के पाणीसाठा असून एक दोन मोठ्या पावसात हे धरण केंव्हाही भरू शकते.

- पुरूषोत्तम करवामाजलगाव (बीड) : जायकवाडी धरण ९० टक्के भरल्याने १८ दरवाजे वर उचलून गोदावरी पात्रात २८ हजार क्युसेक तर माजलगाव धरणात ५५० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गोदावरी पात्रात केव्हाही पाण्यात वाढ होऊ शकते. वाढणाऱ्या पाणी पातळीमुळे गोदावरीपात्रा शेजारीलं गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने गोदापात्रा शेजारील २६ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाथसागर धरणाच्यावरील भागात जास्त पाऊस झाल्याने धरणात पाणीसाठी ९० टक्क्यांवर झाला. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने जायकवाडीतून गोदावरी नदी पात्रात व माजलगाव धरणात पाणी सोडले आहे. माजलगाव धरणात तीन दिवसापासून तर गोदावरी पात्रात दोन दिवसापासून पाण्याची आवाक सुरू आहे. माजलगाव धरणात मंगळवार रोजी ५५० क्युसेक तर गोदावरी नदीपात्रात २८ हजार २९६ क्युसेक अशी आवक सुरु आहे.

ही आवक लवकरच गोदापात्र आणि धरणात येईल. तसेच पुढील काही दिवसात जास्त पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आताची आवक आणि नंतर पावसामुळे होणाऱ्या पाणीपातळीतील वाढ यामुळे माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात शेजारील गावातील नागरिकांमध्ये आत्तापासूनच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या माजलगाव धरणात ४१ टक्के पाणीसाठा असून एक दोन मोठ्या पावसात हे धरण केंव्हाही भरू शकते. त्यामुळे दोन्ही धरणातून पाणी सोडण्याची वेळ आल्यास अनेक गावांना धोका निर्माण होऊ शकतो.

माजलगाव तालुक्यातील जवळपास २६ गावांना गोदावरी नदी पात्रातून होणाऱ्या निसर्गामुळे धोका निर्माण होऊ शकतो यामुळे प्रशासनाने या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या येथील उपविभागीय अधिकारी नीलम बाफना व तहसीलदार वर्षा मनाळे यावर लक्ष ठेवुन आहेत.

या गावांना धोक्याचा इशारानाथसागर व माजलगाव धरण भरल्यास माजलगाव तालुक्यातील मोगरा, गंगामसला, आबेगाव, छत्रबोरगाव, सादोळा, मंजरथ, सरवर पिंपळगाव, सोमठाणा, पुरूषोत्तमपुरी, शेलगावथडी, काळेगावथडी, डुब्बाथडी, महातपुरी, कवडगावथडी, गव्हानथडी, रिधोरी, हिवरा , जायकोवाडी, आळसेवाडी, आडोळा, सुरूमगाव, गुंजथडी, सोन्नाथडी, शुक्लतिर्थलिमगाव, पिंप्रीखुर्द, खतगव्हाण या गावांसह माजलगाव शहरातील आंबेडकर नगर भागास धोका निर्माण होऊ शकतो.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBeedबीडJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी