शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

एकाच अपिलार्थीने केले २७८८ RTI अपील; सुनावणीत खंडपीठाने फेटाळताना म्हणाले, जनहिताचे...

By शिरीष शिंदे | Updated: August 12, 2024 18:05 IST

छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

बीड : माहिती अधिकार कायद्यानुसार मागणी करण्यात आलेल्या माहितीतून कोणतेही व्यापक जनहित साध्य होत नाही. वारंवार मोठ्या प्रमाणात माहितीचे अर्ज सादरकरुन शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांवर ताण येऊन सर्व सामान्यांच्या कामावर विपरित परिणाम होऊ शासकीय कामकाजाचा खोळंबा होईल, असे स्पष्ट करीत छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्त मकरंद रानडे यांनी बीड येथील अपिलार्थी ॲड. केशवराजे निंबाळकर यांचे २७८८ अपील अर्ज फेटाळून लावले.

बीड येथील सहयोगनगर येथील ॲड. केशवराजे निंबाळकर यांनी दाखल केलेल्या अपील प्रकरणी दि. २६ जून रोजी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान एका अर्जदाराने किती अर्ज करावेत याबाबत कोणतेही बंधन नसल्याने प्राप्त अधिकारानुसार अर्ज सादर केल्याचे सांगण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर निरनिराळ्या प्राधिकरणांकडे माहिती अर्ज सादर करून किंवा प्राप्त झालेल्या माहितीमधून नेमके कोणते जनहित साध्य झाले याबाबत अपिलार्थी आयोगास समर्थनीय उत्तर देऊ शकले नाहीत. यावेळी ॲड. निंबाळकर यांनी माहिती अधिकारी कायद्याखाली माहितीचे अर्ज, प्रथम अपिले व द्वितीय अपिले वेगवेगळ्या कार्यालये व राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाकडे दहा हजार अर्ज प्रलंबित असल्याचे सांगितले. एकाच व्यक्तीने हजारोच्या संख्येने माहिती अधिकार कायद्याखाली माहिती अर्ज, अपिले करणे माहिती अधिकारात अभिप्रेत नाही, यावरून अपिलार्थी हे माहिती अधिकार कायद्याचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग करून संबंधित शासकीय कार्यालयास वेठीस धरत आहेत. त्यांच्या या कृतीमुळे संबंधित कार्यालयांचे कामकाज ठप्प होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. अशा अमर्यादित अर्ज करण्याच्या सवयीमुळे संबंधित शासकीय कार्यालयांचा बहुमूल्य वेळ व शक्ती अधिक प्रमाणात खर्ची पडून जनतेला दिल्या जाणाऱ्या कामकाजावर गंभीर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे आयोगाने म्हटले आहे.

काय म्हटले आहे निर्णयात?सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व केंद्रीय माहिती आयोगाकडील निर्णय विचारात घेता अपिलार्थी यांनी मागणी केलेल्या माहितीतून कोणतेही व्यापक जनहित साध्य होत नाही. वारंवार मोठ्या प्रमाणात माहितीचे अर्ज करून मागणी केलेल्या माहितीच्या मागणीमुळे शासकीय यंत्रणेतील मनुष्यबळ व साधन-सामग्री यावर ताण येऊन सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन कामावर विपरीत परिणाम होऊन शासकीय कामांचा खोळंबा होईल, असे माहिती अधिकार कायद्यास अभिप्रेत नाही, असे आयोगाचे स्पष्ट मत झाले आहे. त्यामुळे अपिलार्थी यांचे सर्व २७८८ द्वितीय अपिले फेटाळण्यात येत आहे, असा निर्णय छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्त मकरंद रानडे यांनी दिला.

शासकीय यंत्रणेस वेठीस धरण्याचा हेतूमाहिती कायद्यामध्ये माहिती मागण्याबाबत कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध नसला तरी शासकीय कामात पारदर्शकता आणून जनतेला माहिती मिळावी आणि शासकीय कामात कार्य तत्परता असावी, असा उद्देश आहे. वारंवार एकाच विषयावर माहिती अर्ज करून शासकीय यंत्रणेस वेठीस धरण्याचा अपिलार्थींचा हेतू असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण होतो. तसेच शासकीय कामकाजावरही विपरीत परिणाम होतो. अशा प्रकारची माहिती जमा करण्यासाठी शासकीय यंत्रणेच्या वेळेचा अपव्यय होतो, असेही आयोगाने म्हटले आहे.

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकारAurangabadऔरंगाबादBeedबीड