शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

‘स्वच्छता दर्पण’साठी जिल्ह्यातील १३६४ गावे सज्ज; राष्ट्रीय स्तरावर गुणांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 23:01 IST

‘स्वच्छता दर्पण’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी १३६४ गावे सज्ज झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘स्वच्छता दर्पण’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी १३६४ गावे सज्ज झाली आहेत. गावातील सर्व कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छग्रहींच्या मदतीने जनजागृती, स्वच्छाग्रहींना प्रशिक्षण व घनकचरा सांडपाण्याचे व्यवस्थापन करणेहे उपक्र म प्रामुख्याने तपासण्यात येणार असून शाश्वत स्वच्छतेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून जनजागृती करण्यावर जिल्ह्याचे गुणांकन होणार आहे.राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता दर्पण ही गुणांकन स्पर्धा असून ३० जुलैपर्यंत सर्वांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, शौचालयाचा वापर शाश्वत स्वच्छतेसाठी स्वच्छाग्रही यांची निवड प्रशिक्षण व स्वच्छाग्रह सक्रिय करणे या बाबी या स्पर्धेसाठी महत्त्वाच्या असून सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबबत गावात जनजागृती करण्यासाठी रंगरंगोटी करण्याचे काम अंतीम टप्प्यात आहे.‘हागणदारी मुक्त गावात आपले स्वागत’ अशा आशयाचे स्वागत फलक व लहान मुलांच्या शौचाचे व्यवस्थापन, शौचालयाचा वापर, शौचालय सर्वांसाठी तसेच घनकचरा व्यवस्थापन हे ४ महत्वाचे चित्रसंदेश गावात रंगवणे गरजेचे आहे. केंद्र शासनाने दिलेला नमुना आकार रंगसंगती प्रमाणे एक स्वागत फलक व चार भिंती रंगवावे. आॅफ अ‍ॅपच्या मदतीने फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. या आधारेच गुणांकन करण्यात येणार आहे. यासाठी २० गुण आहेत. कामासाठी व स्वागत फलक तयार करण्यासाठी १३६४ गावांना निधी उपलब्ध करु न दिला जात आहे.ग्रामसेवक व सरपंच तसेच गावातील पाच महिलांच्या स्वाक्षरीने रंग कामाचा अहवाल पंचायत समितीस दाखल होताच संबंधित ग्रामपंचायतींच्या खात्यावर रंगकामाचा निधी वितरित करण्यात येणार आहे. यासाठी जिओ टॅगींग महत्वाची आहे. रंग काम पूर्ण करून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर फोटो अपलोड करावयाचा आहे. ग्रामसेवक, सरपंच व देखरेख समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन आपले गाव व ग्रामपंचायत राष्ट्रीय स्तरावर गुणांकनात अव्वल आणण्यासाठी प्रयत्न करावेत.स्वच्छता दर्पण या स्पर्धेचा कालावधी ३० जुलैपर्यंतचा आहे त्यामुळे गावनिहाय कोणत्या बाबी गुणांकन करण्यास साहाय्यभूत होणार आहेत याचा विचार करून काम पूर्ण करून घ्यावे असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे यांनी केले आहे.जिल्हयातील सहभागी गावेबीड - २२९, अंबाजोगाई - १०६, गेवराई - २००, माजलगाव - १२६, धारुर - ६७, केज - १२२, पाटोदा - ९७, परळी - १०७, शिरुर - ९१, वडवणी - ४४, आष्टी - १७५

टॅग्स :government schemeसरकारी योजनाWaterपाणीcivic issueनागरी समस्या