शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

‘स्वच्छता दर्पण’साठी जिल्ह्यातील १३६४ गावे सज्ज; राष्ट्रीय स्तरावर गुणांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 23:01 IST

‘स्वच्छता दर्पण’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी १३६४ गावे सज्ज झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘स्वच्छता दर्पण’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी १३६४ गावे सज्ज झाली आहेत. गावातील सर्व कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छग्रहींच्या मदतीने जनजागृती, स्वच्छाग्रहींना प्रशिक्षण व घनकचरा सांडपाण्याचे व्यवस्थापन करणेहे उपक्र म प्रामुख्याने तपासण्यात येणार असून शाश्वत स्वच्छतेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून जनजागृती करण्यावर जिल्ह्याचे गुणांकन होणार आहे.राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता दर्पण ही गुणांकन स्पर्धा असून ३० जुलैपर्यंत सर्वांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, शौचालयाचा वापर शाश्वत स्वच्छतेसाठी स्वच्छाग्रही यांची निवड प्रशिक्षण व स्वच्छाग्रह सक्रिय करणे या बाबी या स्पर्धेसाठी महत्त्वाच्या असून सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबबत गावात जनजागृती करण्यासाठी रंगरंगोटी करण्याचे काम अंतीम टप्प्यात आहे.‘हागणदारी मुक्त गावात आपले स्वागत’ अशा आशयाचे स्वागत फलक व लहान मुलांच्या शौचाचे व्यवस्थापन, शौचालयाचा वापर, शौचालय सर्वांसाठी तसेच घनकचरा व्यवस्थापन हे ४ महत्वाचे चित्रसंदेश गावात रंगवणे गरजेचे आहे. केंद्र शासनाने दिलेला नमुना आकार रंगसंगती प्रमाणे एक स्वागत फलक व चार भिंती रंगवावे. आॅफ अ‍ॅपच्या मदतीने फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. या आधारेच गुणांकन करण्यात येणार आहे. यासाठी २० गुण आहेत. कामासाठी व स्वागत फलक तयार करण्यासाठी १३६४ गावांना निधी उपलब्ध करु न दिला जात आहे.ग्रामसेवक व सरपंच तसेच गावातील पाच महिलांच्या स्वाक्षरीने रंग कामाचा अहवाल पंचायत समितीस दाखल होताच संबंधित ग्रामपंचायतींच्या खात्यावर रंगकामाचा निधी वितरित करण्यात येणार आहे. यासाठी जिओ टॅगींग महत्वाची आहे. रंग काम पूर्ण करून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर फोटो अपलोड करावयाचा आहे. ग्रामसेवक, सरपंच व देखरेख समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन आपले गाव व ग्रामपंचायत राष्ट्रीय स्तरावर गुणांकनात अव्वल आणण्यासाठी प्रयत्न करावेत.स्वच्छता दर्पण या स्पर्धेचा कालावधी ३० जुलैपर्यंतचा आहे त्यामुळे गावनिहाय कोणत्या बाबी गुणांकन करण्यास साहाय्यभूत होणार आहेत याचा विचार करून काम पूर्ण करून घ्यावे असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे यांनी केले आहे.जिल्हयातील सहभागी गावेबीड - २२९, अंबाजोगाई - १०६, गेवराई - २००, माजलगाव - १२६, धारुर - ६७, केज - १२२, पाटोदा - ९७, परळी - १०७, शिरुर - ९१, वडवणी - ४४, आष्टी - १७५

टॅग्स :government schemeसरकारी योजनाWaterपाणीcivic issueनागरी समस्या