शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

तुरीच्या पैशांसाठी १०४ शेतकरी उच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 18:49 IST

पणन महासंघाचे संचालक आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसह इतर प्रतिवाद्यांना नोटीस

ठळक मुद्देमहाराष्ट्र शासनाची एक वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी

बीड : महाराष्ट्र शासनाने सुमारे एक वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या तुरीचे पैसे द्यावेत, यासाठी १०४ शेतकऱ्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या अनुषंगाने न्या. एस.व्ही. गंगापूरवाला व न्या. मंगेश पाटील यांनी पुणे येथील पणन महासंघाचे संचालक, बीडचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पणन अधिकारी, तसेच बीड येथील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेचे व्यवस्थापक आणि जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांना नोटिशी बजाविण्याचा आदेश दिला आहे. याचिकेची पुढील सुनावणी ९ आॅगस्ट रोजी होणार आहे. 

गेवराई तालुक्यामधील सय्यदपूर येथील संदीपानराव दातखीळ व इतर १०३ शेतकऱ्यांनी अ‍ॅड. नंदकुमार खंदारे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार महाराष्टÑ शासनाने ‘आधारभूत किमतीद्वारे’ शेतकऱ्यांनी पिकविलेली तूर आणि सोयाबीन नाफेडमार्फत खरेदी करण्याची योजना कार्यान्वित केली होती. या खरेदीची कार्यवाही ३० जानेवारी २०१८ च्या परिपत्रकाद्वारे निश्चित केली होती. 

शेतकऱ्यांनी पिकविलेली तूर आणि सोयाबीनची नोंदणी बाजार समितीकडे करणे आवश्यक होते. शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादनासंबंधी ७/१२ आणि जमिनीच्या मालकीच्या नमुना नंबर ८-अ अर्जासोबत दाखल करणे अनिवार्य होते. तहसीलदार, कृषी अधिकारी, सहनिबंधक सहकारी संस्था आणि संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांचा समावेश असलेल्या समितीमार्फत शेतकऱ्यांच्या अर्जांची शहानिशा करून सदरील पिकाची नोंदणी केली जात असे. नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या संपूर्ण माहितीसह जिल्हाधिकाऱ्यांकडे यादी पाठविणे बंधनकारक होते. बीड येथील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची खरेदीसाठी सबएजंट म्हणून नेमणूक केलेली होती. तेथे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे रीतसर वजन करून पावती दिली जात होती. 

याचिकाकर्त्यासह एकूण १०४ शेतकऱ्यांनी वरील केंद्रावर तूर आणि सोयाबीन मे २०१८ मध्ये दिल्यानंतर त्यांना रीतसर पावती देण्यात आली होती. या शेतकऱ्यांनी पैशाबद्दल वारंवार चौकशी केली असता संस्थेच्या सचिवांनी टाळाटाळीची उत्तरे दिली. अधिकाऱ्यांना भेटून व अर्ज देऊनही फायदा झाला नाही. सदर सोसायटीचे कार्यालय दोन महिन्यांपासून बंद आहे. नाइलाजाने याचिकाकर्त्यांना खंडपीठात याचिका दाखल करावी लागली आहे. 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठMONEYपैसाagricultureशेतीFarmerशेतकरी