शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

तुरीच्या पैशांसाठी १०४ शेतकरी उच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 18:49 IST

पणन महासंघाचे संचालक आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसह इतर प्रतिवाद्यांना नोटीस

ठळक मुद्देमहाराष्ट्र शासनाची एक वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी

बीड : महाराष्ट्र शासनाने सुमारे एक वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या तुरीचे पैसे द्यावेत, यासाठी १०४ शेतकऱ्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या अनुषंगाने न्या. एस.व्ही. गंगापूरवाला व न्या. मंगेश पाटील यांनी पुणे येथील पणन महासंघाचे संचालक, बीडचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पणन अधिकारी, तसेच बीड येथील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेचे व्यवस्थापक आणि जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांना नोटिशी बजाविण्याचा आदेश दिला आहे. याचिकेची पुढील सुनावणी ९ आॅगस्ट रोजी होणार आहे. 

गेवराई तालुक्यामधील सय्यदपूर येथील संदीपानराव दातखीळ व इतर १०३ शेतकऱ्यांनी अ‍ॅड. नंदकुमार खंदारे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार महाराष्टÑ शासनाने ‘आधारभूत किमतीद्वारे’ शेतकऱ्यांनी पिकविलेली तूर आणि सोयाबीन नाफेडमार्फत खरेदी करण्याची योजना कार्यान्वित केली होती. या खरेदीची कार्यवाही ३० जानेवारी २०१८ च्या परिपत्रकाद्वारे निश्चित केली होती. 

शेतकऱ्यांनी पिकविलेली तूर आणि सोयाबीनची नोंदणी बाजार समितीकडे करणे आवश्यक होते. शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादनासंबंधी ७/१२ आणि जमिनीच्या मालकीच्या नमुना नंबर ८-अ अर्जासोबत दाखल करणे अनिवार्य होते. तहसीलदार, कृषी अधिकारी, सहनिबंधक सहकारी संस्था आणि संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांचा समावेश असलेल्या समितीमार्फत शेतकऱ्यांच्या अर्जांची शहानिशा करून सदरील पिकाची नोंदणी केली जात असे. नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या संपूर्ण माहितीसह जिल्हाधिकाऱ्यांकडे यादी पाठविणे बंधनकारक होते. बीड येथील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची खरेदीसाठी सबएजंट म्हणून नेमणूक केलेली होती. तेथे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे रीतसर वजन करून पावती दिली जात होती. 

याचिकाकर्त्यासह एकूण १०४ शेतकऱ्यांनी वरील केंद्रावर तूर आणि सोयाबीन मे २०१८ मध्ये दिल्यानंतर त्यांना रीतसर पावती देण्यात आली होती. या शेतकऱ्यांनी पैशाबद्दल वारंवार चौकशी केली असता संस्थेच्या सचिवांनी टाळाटाळीची उत्तरे दिली. अधिकाऱ्यांना भेटून व अर्ज देऊनही फायदा झाला नाही. सदर सोसायटीचे कार्यालय दोन महिन्यांपासून बंद आहे. नाइलाजाने याचिकाकर्त्यांना खंडपीठात याचिका दाखल करावी लागली आहे. 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठMONEYपैसाagricultureशेतीFarmerशेतकरी