शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

जलयुक्त शिवार योजनेत १ कोटींचा गैरव्यवहार; वसुलीसाठी ९७ व्यक्तींच्या मालमत्तांवर बोजे

By शिरीष शिंदे | Updated: December 3, 2024 19:01 IST

जलयुक्त शिवार गैरव्यवहार प्रकरण : जवळपास ३ कोटी ५० लाख रुपयांचा अपहार झाल्याचा संशय असून, त्यातील जवळपास दीड कोटी रुपये वसूल झाले असल्याची माहिती.

बीड : जलयुक्त शिवार गैरव्यवहारप्रकरणी १ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ९७ मजूर सहकारी संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांच्या मालमत्तांवर बोजे चढविण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. महसुली वसुलीच्या कारवाईनुसार आता त्यांच्या मालमत्तांवर बोजे घेण्यात आले असून, काहींची बँक खाती गोठविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई येथील राज्य उपलोकआयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत वाघाळा येथे सन २०१३-१४, २०१४-१५ व २०१५-१६ यादरम्यान अधिकारी, गुत्तेदार व मजूर संस्थांनी मोठा भ्रष्टाचार केल्याची तक्रार वसंत मुंडे यांनी केली होती. तसेच, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विशेष निधीतून बोधेगाव, सोनहिवरा, खोडवा सावरगाव, वानटाकळी, रेवली, भिलेगाव, शिरसाळा यांसह संपूर्ण परळी तालुक्यात जुन्याच माती, नाला बांधावर नवीन कामे दाखवून किरकोळ दुरुस्ती केली. मशिनधारक मजूर संस्था, गुत्तेदारांच्या संगनमताने भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप मुंडे यांनी केला होता. डीसीसीटीच्या कामात कंटूर लाइननुसार चर खोदलेले नाहीत. वहीत क्षेत्रात चराची कामे केली आहेत, दोन चरात १३ मीटर अंतर आवश्यक असताना, ५ ते १० मीटर अंतर ठेवून कमी क्षेत्रात काम करून मोजमाप पुस्तिकेत जास्त क्षेत्राची नोंद केली आहे.

केवळ ०.३० मीटर खोली ठेवून भ्रष्टाचार केला आहे. कंपार्टमेंट बंडिंगची कामे करताना उताराला आडवे बांध न घालता उभे बांध घालून पाणी अडविण्याऐवजी बाजूला काढून दिले. संस्करण न करता, त्याची बिले काढून भ्रष्टाचार केला. यासह इतर बाबींचा उल्लेख तक्रारीमध्ये होता. याप्रकरणी लोकआयुक्त यांच्या समोर २४ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली होती. या प्रकरणातील आरोपी असलेले अधिकारी, वैयक्तिक गुत्तेदार, मजूर संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांच्या मालमत्तांवर नोंद करावी, असा आदेश उपलोकआयुक्तांनी दिला. त्यानुसार बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी १ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी ९७ व्यक्तींच्या मालमत्तांवर बोजे चढविले आहेत.

या तालुक्यातील संस्थांचा समावेशपरळी तालुक्यातील १७ मजूर सहकारी संस्था, आष्टी तालुक्यातील ७ मजुर संस्था, धारूर तालुक्यातील ८, पाटोदा तालुक्यातील ३ मजूर सहकारी संस्था, माजलगाव तालुक्यातील ५ मजूर सहकारी संस्था, अंबाजोगाई तालुक्यातील १६ मजूर सहकारी संस्था, केज तालुक्यातील १३ व मजूर सहकारी संस्था, बीड येथील १ मजूर सहकारी संस्था, अशा एकूण ९७ संस्थांचा समावेश आहे.

आतापर्यंत दीड कोटी रुपये वसूल झालेजलयुक्त शिवार योजनेतील घोटाळ्यात मजूर सहकार संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व वैयक्तिक गुत्तेदार यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, त्यातील एक मयत आहे. या प्रकरणात ज्यांनी पैसे भरले नाहीत, त्यांच्या मालमत्तेवर बोजा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली आहे. चार टप्प्यांत चौकशी झाली असून, जवळपास ३ कोटी ५० लाख रुपयांचा अपहार झाल्याचा संशय असून, त्यातील जवळपास दीड कोटी रुपये वसूल झाले असल्याचे काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी यापूर्वी सांगितले होते.

टॅग्स :BeedबीडfraudधोकेबाजीAgriculture Sectorशेती क्षेत्र