शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

महागड्या शॅम्पू-क्रिमपेक्षा तांदळाच्या पाण्याने खुलवा चेहरा आणि केसांचं सौंदर्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 11:56 AM

तांदळाचं पाणी जे तांदूळ शिजवल्यावर काही लोक फेकून देतात. या पाण्याने चेहऱ्याची सुंदरता वाढवता येते. 

देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तर भात खाणारे लोक आढळतातच. भात जवळपास देशातील प्रत्येक घरात तयार होतो. देशाच्या अनेक भागांमध्ये तांदळाची मोठी शेतीही केली जाते. चांगल्या आरोग्यासाठीही तांदूळाचे अनेक फायदे सांगितले जातात. त्यासोबत चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठीही तांदूळ फायदेशीर आहे. तांदूळाचं पाणी जे तांदूळ शिजवल्यावर काही लोक फेकून देतात. या पाण्याने चेहऱ्याची सुंदरता वाढवता येते. 

तांदळाचं पाणी फायदेशीर कसं?

तांदूळ शिजवण्यासाठी ते पाण्यात टाकले जातात. ते पाणी उकळल्यानंतर तांदुळातील पोषक तत्व पाण्यात येतात. जसजसे तांदूळ शिजत जातात पाण्याचाही रंग बदलतो आणि ते पाणी घट्टही होतं. या पाण्यात अनेक मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स एकत्र होतात. याचा चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यास मदत होते. चला जाणून घेऊ कसा करावा याचा वापर...

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी

तांदूळ शिजल्यानंतर त्यातील पाणी चाळणीच्या मदतीने एका भांड्यात काढा. हे पाणी थंड होऊ द्या. त्यानंतर कॉटनच्या मदतीने हे पाणी चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ तसेच ठेवा. चेहरा सुकल्यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा आणि चेहरा धुवा.  

काय होतो फायदा?

हे पाणी त्वचेवर लावल्याने त्वचा टाईट होते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात.

या उपायामुळे त्वचा आणखी मुलायम होते. 

तसेच या पाण्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, डाग येत नाहीत.

मुलायम केसांसाठी

जर तुम्हाला सुंदर, लांब आणि मुलायम केस हवे असतील तर तांदळाचं हे पाणी तुमच्या फायद्याचं ठरु शकतं. तांदळाच्या पाण्याने केस धुतल्यास केस मुलायम होतात. तुम्हाला हवं असेल तर या पाण्यात लॅवेंडर तेलही मिश्रीत करु शकता. तांदळाच्या पाण्याने केस धुतल्यावर साध्या पाण्याने पुन्हा एकदा केस धुवा.

काय होतो फायदा?

या पाण्याने केस धुतल्यास केस मुलायम होतात. तसेच डोक्याच्या त्वचेला पोषक तत्वेही मिळतात. 

या पाण्याने केस धुतल्यास व्हिटॅमिन आणि मिनरल्सच्या मदतीने केस आणखी मजबूत आणि सुंदर होतात.  

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स