शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

थंडीच्या दिवसात त्वचेची काळजी घ्याच, पण 'या' चुका करू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 11:53 IST

कधी कधी काही गोष्टींची काळजी तुमच्यासाठी समस्याही निर्माण करु शकतात. अशाच काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ज्या थंडीच्या दिवसात टाळायला पाहिजे. 

(Image Credit : athomediva.com)

थंडीचे दिवस आले की लोकांच्या सवयींमध्येही फरक बघायला मिळतो. थंडीत खासकरुन त्वचेची काळजी नेहमीपेक्षा जास्त घ्यावी लागते. पण लोक काळजी घेण्याच्या अशा काही गोष्टी करतात ज्याने आरोग्याला नुकसान होऊ शकतं. कधी कधी काही गोष्टींची काळजी तुमच्यासाठी समस्याही निर्माण करु शकतात. अशाच काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ज्या थंडीच्या दिवसात टाळायला पाहिजे. 

पाय नेहमी झाकून ठेवणे - थंडीच्या दिवसात सर्वांनाच थंडी लागते. पण काही लोकांना थंडी जरा जास्तच जाणवते. हे लोक दिवस-रात्र हात आणि पाय झाकून ठेवतात. पण असे केल्याने त्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याने त्वचेचं नुकसान होऊ शकतं. अशात हात आणि पाय सतत झाकून ठेवण्याऐवजी काही वेळासाठी मोकळे ठेवा.

पाणी कमी पिऊ नये - थंडीच्या दिवसात इतर ऋतुंच्या तुलनेत कमी तहाण लागते. पण याचा अर्थ हा नाही की, पाणी पिऊच नये. शरीराची क्रिया व्यवस्थित होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या तहाण नसली तरी या दिवसात पाणी पिणे गरजेचे आहे. कमी पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली होणार नाही.

जास्त गरम पदार्थ खाणे - थंडीच्या दिवसात गरमीसाठी वेगवेगळे गरमागरम पदार्थ खाल्ले जातात. अनेकांना याची सवयही असते. काही लोक गरम पराठे, गोड पदार्थ खातात, पण सतत हे पदार्थ खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका असतो. सोबतच कोलेस्ट्रॉलचा स्तरही वाढतो, जे शरीरासाठी घातक ठरु शकतं. 

त्वचेवर नेहमी नेहमी क्रीम लावणे - थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होण्याची समस्या अधिक प्रमाणात होते. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे गरजेचेच आहे. पण काही लोक हे त्वचा मुलायम ठेवण्यासाठी त्वचेवर सतत चिकट क्रीम लावतात, याने त्वचेवर धुळ, माती आणि किटाणू चिकटतात. याने त्वचेचं अधिक नुकसान होऊ शकतं. 

काय वापरू नये

बेकिंग सोडा  - गरमीच्या दिवसांपेक्षा थंडीच्या दिवसात बेकिंग सोडा वापरणे नुकसानदायक ठरु शकतं. याने त्वचेवर काळे डाग पडतात. याने तुमची त्वचा सावळी होऊ शकते.

लिंबू  - वेगवेगळ्या फेस पॅकमध्ये लिंबाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. पण लिंबामध्ये भरपूर प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड असतं. याने त्वचा अधिक रखरखीत होऊ शकते.   

पुदीना - थंडीच्या दिवसात त्वचेवर पुदीना वापरल्यास याने डार्कनेस वाढते. कारण या मेंथोल अधिक प्रमाणात असतं. याने चेहऱ्याचा ओलावा शोषून घेतला जातो. 

वेगवेगळ्या सालींपासून फेस पॅक - वेगवेगळ्या घरगुती उपायांमध्ये फळांच्या सालींपासून तयार केलेले फेस पॅक लावले जातात. पण थंडीच्या दिवसात याचा वापर करणे घातक ठरु शकतं. याने चेहऱ्याच्या त्वचेवरील तेल कमी होतं. याने त्वचेचा कोरडेपणा वाढू लागतो. 

संत्री - तसे तर थंडीच्या दिवसात संत्री खाणे फार फायदेशीर असतात. पण याच्या फेस पॅकचा वापर करणे समस्या निर्माण करु शकतो. कारण यात सायट्रिक अ‍ॅसिडचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे त्वचा अधिक कोरडी होते.

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीSkin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स