शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

रोज तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे आणि नुकसान, वाचाल तर रहाल फायद्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 15:02 IST

Alum water bath : तुरटी पाण्यात टाकून आंघोळ करण्याचे फायदेही आहेत आणि नुकसानही आहेत. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Alum water bath :  आंघोळ करणं हा आपल्या रोजच्या रूटीनचा भाग आहे. कुणी गरम पाण्याने आंघोळ करतात, कुणी थंड पाण्याने आंघोळ करतात. तर काही लोक पाण्यात काही इतर गोष्टी टाकून आंघोळ करतात. बरेच लोक आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवतात. मात्र, जशा नाण्याला दोन बाजू असतात. तशाच काही गोष्टींच्याही दोन बाजू असतात. तुरटी पाण्यात टाकून आंघोळ करण्याचे फायदेही आहेत आणि नुकसानही आहेत. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

- तुरटीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-फंगल गुण असतात. जे त्वचेला साफ करण्यास मदत करतात. तसेच या गुणांमुळे पिंपल्स आणि त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. 

- तसेच घामाची येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठीही तुरटी फिरवलेल्या पाण्याने आंघोळ केली जाते. तुरटी फिरवलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास फ्रेश वाटतं. 

- तुरटीच्या पाण्याने त्वचेची जळजळ आणि खाज दूर करण्यास मदत मिळते. याने शरीराला थंडावाही मिळतो.

- तुरटीच्या पाण्याने शरीराची स्वच्छता होते. अनेक नुकसानकारक बॅक्टेरिया दूर होऊन त्वचेवरील डागही होतात.

- शाम्पूमुळे केसांची सफाई तर होते. स्कॅल्प म्हणजे डोक्याच्या त्वचेवरील मळ-माती शाम्पूने निघत नाही. ज्यामुळे केसांमध्ये उवा होतात. तुरटीच्या पाण्याने केस धुतल्याने डोक्याची त्वचा स्वच्छ होते. 

- जखमेवर तुरटी लावली तर रक्त वाहणं बंद होतं. एखादी जखम झाली असेल तर तुरटीच्या पाण्याने ती धुवावी याने रक्त बंद होतं. तुरटीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात जे जखमेला संक्रमणपासून रोखतात.

तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याने नुकसान

- तुरटीच्या पाण्याने जास्त वेळ आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होते. थंडीच्या दिवसात तुरटीच्या पाण्याने आंघोळ करणं टाळलं पाहिजे. ज्या लोकांची त्वचा ड्राय आहे त्यांनी तुरटीच्या पाण्याने आंघोळ करू नये.

- ज्या लोकांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे, त्यांनी सुद्धा तुरटीच्या पाण्याने आंघोळ करणं टाळलं पाहिजे. असं केल्यास त्वचेवर लाल चट्टे येऊ शकतात.

- त्याशिवाय जर तुम्ही रोज तुरटीच्या पाण्याने आंघोळ केली तर तुमच्या त्वचेतील ओलावा दूर होऊ शकतो. याने त्वचेचं आरोग्य बिघडण्याचा धोका असतो.

तुरटीचे अनेक फायदे आहेत. पण याचा वापर संतुलित पद्धतीने केला जावा. याचा जास्त वापर केला तर त्वचेसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्यावर त्वचेवर खाज आणि जळजळ होत असेल तर या पाण्याचा वापर लगेच बंद करा.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स