शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रोज तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे आणि नुकसान, वाचाल तर रहाल फायद्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 15:02 IST

Alum water bath : तुरटी पाण्यात टाकून आंघोळ करण्याचे फायदेही आहेत आणि नुकसानही आहेत. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Alum water bath :  आंघोळ करणं हा आपल्या रोजच्या रूटीनचा भाग आहे. कुणी गरम पाण्याने आंघोळ करतात, कुणी थंड पाण्याने आंघोळ करतात. तर काही लोक पाण्यात काही इतर गोष्टी टाकून आंघोळ करतात. बरेच लोक आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवतात. मात्र, जशा नाण्याला दोन बाजू असतात. तशाच काही गोष्टींच्याही दोन बाजू असतात. तुरटी पाण्यात टाकून आंघोळ करण्याचे फायदेही आहेत आणि नुकसानही आहेत. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

- तुरटीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-फंगल गुण असतात. जे त्वचेला साफ करण्यास मदत करतात. तसेच या गुणांमुळे पिंपल्स आणि त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. 

- तसेच घामाची येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठीही तुरटी फिरवलेल्या पाण्याने आंघोळ केली जाते. तुरटी फिरवलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास फ्रेश वाटतं. 

- तुरटीच्या पाण्याने त्वचेची जळजळ आणि खाज दूर करण्यास मदत मिळते. याने शरीराला थंडावाही मिळतो.

- तुरटीच्या पाण्याने शरीराची स्वच्छता होते. अनेक नुकसानकारक बॅक्टेरिया दूर होऊन त्वचेवरील डागही होतात.

- शाम्पूमुळे केसांची सफाई तर होते. स्कॅल्प म्हणजे डोक्याच्या त्वचेवरील मळ-माती शाम्पूने निघत नाही. ज्यामुळे केसांमध्ये उवा होतात. तुरटीच्या पाण्याने केस धुतल्याने डोक्याची त्वचा स्वच्छ होते. 

- जखमेवर तुरटी लावली तर रक्त वाहणं बंद होतं. एखादी जखम झाली असेल तर तुरटीच्या पाण्याने ती धुवावी याने रक्त बंद होतं. तुरटीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात जे जखमेला संक्रमणपासून रोखतात.

तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याने नुकसान

- तुरटीच्या पाण्याने जास्त वेळ आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होते. थंडीच्या दिवसात तुरटीच्या पाण्याने आंघोळ करणं टाळलं पाहिजे. ज्या लोकांची त्वचा ड्राय आहे त्यांनी तुरटीच्या पाण्याने आंघोळ करू नये.

- ज्या लोकांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे, त्यांनी सुद्धा तुरटीच्या पाण्याने आंघोळ करणं टाळलं पाहिजे. असं केल्यास त्वचेवर लाल चट्टे येऊ शकतात.

- त्याशिवाय जर तुम्ही रोज तुरटीच्या पाण्याने आंघोळ केली तर तुमच्या त्वचेतील ओलावा दूर होऊ शकतो. याने त्वचेचं आरोग्य बिघडण्याचा धोका असतो.

तुरटीचे अनेक फायदे आहेत. पण याचा वापर संतुलित पद्धतीने केला जावा. याचा जास्त वापर केला तर त्वचेसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्यावर त्वचेवर खाज आणि जळजळ होत असेल तर या पाण्याचा वापर लगेच बंद करा.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स