शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधू हरली कारण...

By प्रसाद लाड | Updated: August 5, 2018 16:13 IST

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधू का पराभूत झाली, याबद्दल सांगणारा हा लेख.

ठळक मुद्देसिंधूची लय बिघडत गेली आणि मरिनची रणनीती यशस्वी झाली.

युद्ध हे फक्त शस्त्रांच्या जोरावर जिंकलं जात नाही, तर त्यासाठी कणखर मानसीकताही लागते. रणनीती आणि तिची योग्य अंमलबजावणीही लागते. गुणवत्ता, मेहनत, चिकाटी, संयम याबरोबरच वीजीगीषूवृत्ती तुमच्याकडे असायला हवी, तर तुम्ही कधीही विजय मिळवू शकता. अगदी हेच भारताच्या पी. व्ही. सिंधूला दाखवता आले नाही. दुसरीकडे आक्रमकता हे जिचं दुसरं नाव आहे, अशी स्पेनची कॅरोलिन मरिन जेतेपदाची हकदार ठरली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधू का पराभूत झाली, याबद्दल सांगणारा हा लेख.

सिंधू आणि मरिन यांच्यामध्ये गुणवत्तेची कोणतीच कमतरता नव्हती. दोघींनी चांगली मेहनतही घेतली होती. सामना जेव्हा सुरु झाला तेव्हा एक रंगतदार, कडवी झुंज पाहायला मिळणार, असे वाटत होते. तसे काही वेळ पाहायलाही मिळाले. पण चुरशीच्या या लढतीत सिंधूने आघाडी घ्यायला सुरुवात केली. ही आघाडी तब्बल पाच गुणांच्या फरकाचीही झाली. यावेळी सिंधू पहिला गेम जिंकणार, असे वाटत होते. पण मरिन काही हार मानणारी नव्हती. तिने आक्रमकतेला धार चढवली आणि सिंधूशी पहिल्यांदा 15-15 आणि त्यानंतर 18-18 अशी बरोबरी केली. तिचे हे पुनरागमन तिला जेतेपदापर्यंत घेऊन गेले. कारण पहिला गेम तिने जिंकला आणि त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये तर तिने सिंधूला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही.

मरिनकडे असलेली आक्रमकता सिंधूकडे दिसली नाही. मरिन प्रत्येक गुणाला जोरदार आवाज काढत होती. आपला आक्रमकपणा हा ती खेळाच्या माध्यमातून दाखवत होती. हा आक्रमकपणाच मरिनसाठी लाभदायक ठरला. या गोष्टीचा परीणाम कुठेतरी सिंधूच्या मानसीकतेवर झाला. त्याचबरोबर सिंधू सर्व्हिस असताना मरिन तिला हात दाखवून बऱ्याचदा थांबायला सांगायची. यामुळे सिंधूची लय बिघडत गेली आणि मरिनची रणनीती यशस्वी झाली.

पहिला गेम ज्यापद्धतीने मरिनने जिंकला, ते पाहता फक्त चॅम्पियन खेळाडूच असा विजय मिळवू शकतो, हे समजते. सिंधूने पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली होती. त्यानंतर मरिनचे पुनरागमन रोखण्यात तिला अपयश आले. पहिला गेम पराभूत झाल्यावर सिंधू पूर्णपणे खचून गेलेली होती. सिंधू दुसरा गेमही गमावणार, हे पहिला गेम मगावल्यावर तिच्या देहबोलीतून जाणवत होते. एक गेम गमावला म्हणजे सामन्यात आपण पराभूत झालेलो नाही, हे सिंधूने त्यावेळी समजून घ्यायला हवं होतं. मरिन आक्रमक खेळ करत असली तर तिला कोणत्या भाषेत उत्तर द्यायचे, हे सिंधूने ठरवायला हवं होतं. सिंधू पहिला गेम गमावल्यावर एवढी निष्प्रभ झाली होती की, तिच्या कानावर प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचे संवादही पडत नव्हते. नाहीतर गोपीचंद यांनी बऱ्याचदा अशा संकटांतून खेळाडूंना बाहेर काढले आहे. पण ते मार्गदर्शन करण्याचं काम करतील, अखेर खेळाडूला मैदानात खेळायचे असते. मरिनच्या आक्रमक खेळाने सिंधूचे बिघडलेले मानसीक संतुतन, असे या सामन्याचे वर्णन करता येऊ शकते. सिंधूमध्ये गुणवत्तेची कमी नाही, नाही तर ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचलीच नसती. आता तिला फक्त गरज आहे ती आपले मानसीक संतुलन राखण्याची.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton