शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत दाखल, किदाम्बी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 01:41 IST

पायांच्या जखमांतून सावरत पुनरागमन करणाऱ्या भारताच्या एच.एस. प्रणॉय याने आॅल इंग्लंडचॅम्पियनशीपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.

बर्मिंघम : पायांच्या जखमांतून सावरत पुनरागमन करणाऱ्या भारताच्या एच.एस. प्रणॉय याने आॅल इंग्लंडचॅम्पियनशीपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. दुसरीकडे, भारतीयांच्या नजरा असलेल्या किदाम्बी श्रीकांतला मात्र पराभवाचा झटका बसला. चीनच्या हुआंग युजियांगकडून पराभूत झाल्याने तो स्पर्धेबाहेर पडला. त्यामुळे भारताच्या आशा आता प्रणॉय आणि सिंधू यांच्यावर असतील.बिनमानांकित प्रणॉयने माजी नंबर तीनचा खेळाडू आणि २०१४ च्या विश्व चॅम्पियनशीपचा कांस्यपदक विजेत्या इंडोनेशियाच्या टामी सुगियातो याचा उपउपांत्यपूर्व फेरीत २१-१०, २१-१९ ने पराभव केला. सुरुवातीला तो काही स्पर्धांना मुकला होता. ज्यामुळे जागतिक क्रमवारीत त्याची १६ व्या स्थानी घसरण झाली होती. प्रणॉयने शानदार पुनरागमन केले. आता उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना युजियांगविरुद्ध होईल.दुहेरीत, भारताची सत्विक साईराज-चिराग शेट्टी ही जोडी एक तास तीन मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभूत झाली. माथियास बो-कार्स्टन मोगेनसन या दुसºया मानांकित जोडीने त्यांचा २१-१६, १६-२१ आणि २३-२१ ने पराभव केला. आॅलिम्पिक रौप्य विजेती पी. व्ही. सिंधूने सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या हायव्होल्टेज सामन्यात जपानच्या सातव्या मानांकित नोजोमी ओकूहाराविरुद्ध बाजी मारली. (वृत्तसंस्था)>दुहेरीतही पंचांच्या कामगिरीवर नाराजीभारताच्या साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीला माथियास-कार्स्टन या जोडीचा पराभव करण्याची संधी होती. ते उलटफेर करण्याच्या तयारीत होते. मात्र, मोक्याच्या क्षणी त्यांना सर्व्हिस फॉल्ट देण्यात आले. त्यामुळे त्यांना एक तास तीन मिनिटांत पराभव पत्करावा लागला.यावर चिरागनेही नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, हे दुदैवी असेच आहे. आम्हाला तिसºया गेमच्या शेवटी प्रत्येक २-३ गुणांवर सर्व्हिस फॉल्ट मिळाला.स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने दिमाखदार कामगिरी करताना जपानच्या नोझोमी ओकुहारा हिचे तगडे आव्हान परतावून उपांत्य फेरीत धडक मारली. तीन गेमपर्यंत रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात सिंधूने झुंजार खेळ करताना २०-२२, २१-१८, २१-१८ अशी बाजी मारली.>श्रीकांत पंचांवर नाराजभारतीय स्टार शटलर किदाम्बी श्रीकांत स्पर्धेतून बाहेर पडला. मात्र, पराभवानंतर त्याने पंचांनी दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, ‘पंचांकडून सलग सर्व्हिसबाबत झालेल्या चुका हास्यास्पद आहेत.’‘सर्व्हिस फॉल्ट’ निर्णयावर तो नाराज आहे. सुरुवातीला सर्व्हिसच्या खूप चुका होत्या.मला आशा नव्हती. काल मी एकही चूक केली नाही. आज मात्र स्थिती पूर्णपणे बदलली. स्पर्धेत असे होऊ नये. यासाठी काही विशेष नियम असणे आवश्यक आहे. पंचांना काल काहीच चुका दिसल्या नाहीत. आज मात्र त्यांना खूप चुका सापडल्या. हे हास्यास्पद आहे, असे श्रीकांतने सांगितले.