शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीची आशा - गोपीचंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 06:52 IST

नवी दिल्ली : पी.व्ही. सिंधूसह आघाडीचे बॅडमिंटनपटू सध्या फॉर्ममध्ये नसले, तरी राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपले ...

नवी दिल्ली : पी.व्ही. सिंधूसह आघाडीचे बॅडमिंटनपटू सध्या फॉर्ममध्ये नसले, तरी राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपले खेळाडू सर्वोत्कृष्ट कामगिरी करतील, अशी अपेक्षा आहे.गोपीचंद म्हणाले, ‘मागील काही ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी चांगली झाली. यंदा आमच्या संघात पी. व्ही. सिंधूच्या रुपाने एक विश्व विजेतीदेखील आहे. यामुळेच चांगल्या तयारीच्या जोरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी घडेल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.’ गेल्यावर्षी विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू सिंधूने जपानची नोजोमी ओकुहाराचा पराभव करीत जेतेपद पटकावले होते.त्याआधी ‘फुलराणी’ सायना नेहवालने लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्य आणि सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.यावेळी पी. गोपीचंद यांनी भारत सरकारच्या वतीने युवा खेळाडूंसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया’ या क्रीडा महोत्सवाचेही कौतुक केले. ‘अशा प्रकारच्या महोत्सवात युवा खेळाडूंना चांगले व्यासपीठ लाभल्याने खेळांसाठी आश्वासक चित्र तयार होते. येथे मिळालेला अनुभव कारकिर्दीत मोलाचा ठरतो,’ असे मत गोपीचंद यांनी व्यक्त केले आहे. खेलो इंडिया महोत्सवाचे आयोजन १० ते २२ जानेवारीदरम्यान गुवाहाटी येथे होईल. (वृत्तसंस्था)