शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

कारच्या बॅटरीचे आयुष्य वाढविण्यासाठी काय कराल ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 18:48 IST

बाहेर कुठेतरी जायचे असेल आणि नेमकी त्याचवेळी बॅटरी पार उतरली असेल तर काय? होणार की नाही खोळंबा...

कोणत्याही वाहनासाठी बॅटरी हा खूप महत्वाचा भाग आहे. जर बॅटरी खराब झाली असेल तर वाहन चालू करणे कठीण जाते. शहरांमध्ये कार सारख्या उभ्या असल्याने बऱ्याचदा बॅटरी उतरल्याचा अनुभव येतो. जर आपल्याला बाहेर कुठेतरी जायचे असेल आणि नेमकी त्याचवेळी बॅटरी पार उतरली असेल तर काय? होणार की नाही खोळंबा... चला तर मग बॅटरीची काळजी कशी घ्यायची यावर एक नजर टाकू...

आजच्या वाहनांमध्ये पाणी नसलेली बॅटरी वापरली जाते. पुर्वी प्रकिया केलेले पाणी बॅटरीमध्ये टाकावे लागत होते. तसेच ते वेळोवेळी न तपासल्यास बॅटरीची चार्ज होण्याची शक्ती कमी होत होती. आता कंपन्यांनी 'नो मेन्टेनन्स' वाली बॅटरी बाजारात आणली आहे. यामध्ये पाणी टाकावे लागत नाही. एकदा खराब झाली की बदलावी लागते. बॅटरी का खराब होते? त्याची कारणे.

बॅटरी टर्मिनलची तपासणी करावी : बॅटरी ही कारसाठी उर्जेचा स्त्रोत आहे. यामुळे आठवड्यातून एकदातरी बॅटरी तपासावी. याचबरोबर महिन्यातून एकदातरी बॅटरीच्या टर्मिनलवर जमा झालेले अॅसिड साफ करावे. बॅटरी मेन्टेनन्स फ्री नसेल तर नियमित पाण्याची पातळी तपासावी. 

टर्मिनलला ग्रीस नको : बऱ्याचदा बॅटरीच्या टर्मिनलला लोक ग्रीस लावतात. परंतू, हे ग्रीस बॅटरीला आणखी खराब करते. यामुळे ग्रीसऐवजी पेट्रोलियम जेली किंवा वॅसलीन लावावे. परंतू त्याला वेळोवेळी साफ करत रहावे. अन्यथा त्याला धुळ चिकटू शकते. 

इंजिनची देखभाल : बॅटरीची मुळ उपयुक्तता इंजिन चालू करण्यासाठी आहे. त्यामुळे इंजिनची देखभाल नीट केल्यास बॅटरीवर ताण येत नाही. इंजिन सुरु करण्यासाठी मोठी उर्जा लागते. तसेच इंजिन तापल्यास त्याचा बॅटरीवर परिणाम जाणवतो. त्यातील पाणी सुकते. यामुळे बॅटरी जादा ऑक्सीडाइज्ड होते.

कार चालवण्याची सवय : कार चालविण्याची सवयही बॅटरीचे आयुष्यमान ठरविते. रॅश ड्रायव्हिंग केल्याने त्याचा थेट परिणाम बॅटरीवर होतो. यासाठी नेहमी सावकाश कार चालवावी.

बॅटरी बदलण्याची वेळ : साधारणता बॅटरीचे आयुष्य तीन ते पाच वर्षांचे असते. काही कंपन्या तर पाच वर्षांची वॉरंटी देतात. परंतू, बॅटरी 3 ते 4 वर्षांत खराब व्हायला सुरु होते. शेवटपर्यंत चालवायची म्हटल्यास त्याचा इतर पार्टवर परिणाम होतो. यामुळे 3-4 वर्षांत बॅटरी बदलावी. 

टॅग्स :AutomobileवाहनcarकारAutomobile Industryवाहन उद्योग