शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या बॅटरीचे आयुष्य वाढविण्यासाठी काय कराल ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 18:48 IST

बाहेर कुठेतरी जायचे असेल आणि नेमकी त्याचवेळी बॅटरी पार उतरली असेल तर काय? होणार की नाही खोळंबा...

कोणत्याही वाहनासाठी बॅटरी हा खूप महत्वाचा भाग आहे. जर बॅटरी खराब झाली असेल तर वाहन चालू करणे कठीण जाते. शहरांमध्ये कार सारख्या उभ्या असल्याने बऱ्याचदा बॅटरी उतरल्याचा अनुभव येतो. जर आपल्याला बाहेर कुठेतरी जायचे असेल आणि नेमकी त्याचवेळी बॅटरी पार उतरली असेल तर काय? होणार की नाही खोळंबा... चला तर मग बॅटरीची काळजी कशी घ्यायची यावर एक नजर टाकू...

आजच्या वाहनांमध्ये पाणी नसलेली बॅटरी वापरली जाते. पुर्वी प्रकिया केलेले पाणी बॅटरीमध्ये टाकावे लागत होते. तसेच ते वेळोवेळी न तपासल्यास बॅटरीची चार्ज होण्याची शक्ती कमी होत होती. आता कंपन्यांनी 'नो मेन्टेनन्स' वाली बॅटरी बाजारात आणली आहे. यामध्ये पाणी टाकावे लागत नाही. एकदा खराब झाली की बदलावी लागते. बॅटरी का खराब होते? त्याची कारणे.

बॅटरी टर्मिनलची तपासणी करावी : बॅटरी ही कारसाठी उर्जेचा स्त्रोत आहे. यामुळे आठवड्यातून एकदातरी बॅटरी तपासावी. याचबरोबर महिन्यातून एकदातरी बॅटरीच्या टर्मिनलवर जमा झालेले अॅसिड साफ करावे. बॅटरी मेन्टेनन्स फ्री नसेल तर नियमित पाण्याची पातळी तपासावी. 

टर्मिनलला ग्रीस नको : बऱ्याचदा बॅटरीच्या टर्मिनलला लोक ग्रीस लावतात. परंतू, हे ग्रीस बॅटरीला आणखी खराब करते. यामुळे ग्रीसऐवजी पेट्रोलियम जेली किंवा वॅसलीन लावावे. परंतू त्याला वेळोवेळी साफ करत रहावे. अन्यथा त्याला धुळ चिकटू शकते. 

इंजिनची देखभाल : बॅटरीची मुळ उपयुक्तता इंजिन चालू करण्यासाठी आहे. त्यामुळे इंजिनची देखभाल नीट केल्यास बॅटरीवर ताण येत नाही. इंजिन सुरु करण्यासाठी मोठी उर्जा लागते. तसेच इंजिन तापल्यास त्याचा बॅटरीवर परिणाम जाणवतो. त्यातील पाणी सुकते. यामुळे बॅटरी जादा ऑक्सीडाइज्ड होते.

कार चालवण्याची सवय : कार चालविण्याची सवयही बॅटरीचे आयुष्यमान ठरविते. रॅश ड्रायव्हिंग केल्याने त्याचा थेट परिणाम बॅटरीवर होतो. यासाठी नेहमी सावकाश कार चालवावी.

बॅटरी बदलण्याची वेळ : साधारणता बॅटरीचे आयुष्य तीन ते पाच वर्षांचे असते. काही कंपन्या तर पाच वर्षांची वॉरंटी देतात. परंतू, बॅटरी 3 ते 4 वर्षांत खराब व्हायला सुरु होते. शेवटपर्यंत चालवायची म्हटल्यास त्याचा इतर पार्टवर परिणाम होतो. यामुळे 3-4 वर्षांत बॅटरी बदलावी. 

टॅग्स :AutomobileवाहनcarकारAutomobile Industryवाहन उद्योग