शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

ट्रक, टेम्पोमधून प्रवास करताय? अपघातानंतर एक छदामही मिळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 17:47 IST

रस्ते अपघातात प्राण गमावल्यास विमा कंपन्यांनी 10 लाख-15 लाखांची भरपाई दिल्याची किंवा न्यायालयाने त्यांना देण्यास लावल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो.

मद्रास : रस्ते अपघातात प्राण गमावल्यास विमा कंपन्यांनी 10 लाख-15 लाखांची भरपाई दिल्याची किंवा न्यायालयाने त्यांना देण्यास लावल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने नुकताच एक असा निर्णय दिला आहे, ज्याद्वारे केवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रवाशांच्या नातोवाईकांनाच विम्याची भरपाई मिळू शकणार आहे. 

बऱ्याचदा विमा कंपन्या मृत्यू किंवा जखमी झाल्यानंतर विम्याची रक्कम देणे नाकारतात. यामुळे अशी प्रकरणे न्यायालयात जातात. यावेळी न्यायालये या कंपन्यांना विम्याची रक्कम देण्याचे आदेश देतात. मात्र, मद्रास न्यायालयात आलेल्या खटला काहीसा विचार करायला लावणारा आहे. माल वाहतूक करणाऱ्या वाहनामधून प्रवास करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारे माल वाहतूक करणाऱ्य़ा वाहनातून प्रवास करतेवेळी अपघातात मृत्यू किंवा जखमी झाल्यास ती व्यक्ती विम्याची रक्कम मिळण्यास पात्र राहत नसल्याचा आदेश न्यायालयाने दिला. 

हा निर्णय बेंगळुरुच्या भारती AXA जनरल इन्शुरन्स कंपनीच्या बाजुने देण्यात आला. मोटर अॅक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलने या व्यक्तीच्या कुटुंबाला भरपाई देण्याचे आदेश दिले होते. या विरोधात कंपनी उच्च न्यायालयात गेली होती. 

घटना काय होती?1 सप्टेंबर 2011 मध्ये एका मालवाहतूक वाहनामधून 16 जण तामिळनाडूच्या  कोटापट्टी गावाहून सोलानकुरुचीला जात होते. यावेळी वाहनाला अपघात झाला. यामध्ये काही जण ठार झाले तर काही जखमी झाले. त्यांच्या कुटुंबियांनी  मोटर अॅक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलकडे धाव घेत भरपाई मिळण्याची मागणी केली. ती मान्य करत कंपनीला ट्रिब्युनलने भरपाई देण्याचे आदेश दिले होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAccidentअपघातroad transportरस्ते वाहतूक