शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

टाटाच्या या एसयुव्हीने तब्बल 25 वर्षे भारतीय रस्त्यांवर राज्य केले...आता उत्पादन बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:30 PM

टाटाने 1994 मध्ये पहिली एसयुव्ही भारतीय रस्त्यांवर उतरवली होती.

मुंबई : देशात वाहन क्षेत्र मंदीने ग्रासलेले आहे. नव्या अद्ययावत वाहनांची विक्रीही थंडावलेली आहे. केंद्र सरकारने यामागे वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. यापैकीच एक असलेले बीएस 6 नियमावली आहे. यामुळे मारुतीनेही जिप्सी, ओम्नीसारखी वाहने बंद केली आहेत. आता टाटानेही गेल्या 25 वर्षांपासून सामान्यांपर्यंत पोहोचलेली एसयुव्ही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टाटाने 1994 मध्ये पहिली एसयुव्ही भारतीय रस्त्यांवर उतरवली होती. ती म्हणजे टाटा सुमो. मात्र, काळाप्रमाणे बदल करण्यात टाटाला अपयश आले. टाटाने सुमोची ग्रँडे हे मॉडेल काढले खरे परंतू ते लोकांना भावले नाही. यामुळे सुमोचे मॉडेल टाटाला सुरू ठेवावे लागले. ग्रामीण भागात सुमोने चांगला जम बसविला होता. आजच्या काळातील स्टायलिश एसयुव्हींमुळे सुमो खूप मागे पडली. आता टाटाने ही सुमो बंद केली आहे. दिल्लीच्या डिलरने ही माहिती दिली आहे. 

येत्या 1 एप्रिलपासून वाहन क्षेत्र कात टाकणार आहे. सुरक्षेचे, पर्यावरणाचे नवीन नियम लागू होत आहेत. बीएस 6 नुसार सुरक्षा आणि इंधनापासून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी इंजिनामध्ये बदल करावे लागणार आहेत. दोन वर्षांपूर्वीच कंपन्यांना बीएस 4 प्रणाली वापरावी लागली होती. यामुळे कंपन्यांचा उत्पादन आणि संशोधन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे टाटा मोटर्सने सुमोच्या इंजिनामध्ये काही बदल केलेले नाहीत. त्यापेक्षा नवीन कार लाँच करण्याकडे कंपनीचा कल आहे. टाटा हॅरिअर, नेक्सॉन, अल्ट्रूझ अशा कार टाटा लाँच करत आहे. यामुळे टाटा सुमोला सुरू ठेवण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसत आहे. 

सुमोनंतर टाटाची सफारीचाही नंबर लागण्याची शक्यता आहे. सफारीलाही बाजारात मागणी नाही. यामुळे या एक्सयुव्हीला एकतर मॉडिफाय करावे लागेल किंवा बंद करावी लागणार आहे. टाटाची एक्सयुव्हीमध्ये हेक्साही आहे.  

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहन