शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

टाटाच्या या एसयुव्हीने तब्बल 25 वर्षे भारतीय रस्त्यांवर राज्य केले...आता उत्पादन बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:31 IST

टाटाने 1994 मध्ये पहिली एसयुव्ही भारतीय रस्त्यांवर उतरवली होती.

मुंबई : देशात वाहन क्षेत्र मंदीने ग्रासलेले आहे. नव्या अद्ययावत वाहनांची विक्रीही थंडावलेली आहे. केंद्र सरकारने यामागे वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. यापैकीच एक असलेले बीएस 6 नियमावली आहे. यामुळे मारुतीनेही जिप्सी, ओम्नीसारखी वाहने बंद केली आहेत. आता टाटानेही गेल्या 25 वर्षांपासून सामान्यांपर्यंत पोहोचलेली एसयुव्ही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टाटाने 1994 मध्ये पहिली एसयुव्ही भारतीय रस्त्यांवर उतरवली होती. ती म्हणजे टाटा सुमो. मात्र, काळाप्रमाणे बदल करण्यात टाटाला अपयश आले. टाटाने सुमोची ग्रँडे हे मॉडेल काढले खरे परंतू ते लोकांना भावले नाही. यामुळे सुमोचे मॉडेल टाटाला सुरू ठेवावे लागले. ग्रामीण भागात सुमोने चांगला जम बसविला होता. आजच्या काळातील स्टायलिश एसयुव्हींमुळे सुमो खूप मागे पडली. आता टाटाने ही सुमो बंद केली आहे. दिल्लीच्या डिलरने ही माहिती दिली आहे. 

येत्या 1 एप्रिलपासून वाहन क्षेत्र कात टाकणार आहे. सुरक्षेचे, पर्यावरणाचे नवीन नियम लागू होत आहेत. बीएस 6 नुसार सुरक्षा आणि इंधनापासून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी इंजिनामध्ये बदल करावे लागणार आहेत. दोन वर्षांपूर्वीच कंपन्यांना बीएस 4 प्रणाली वापरावी लागली होती. यामुळे कंपन्यांचा उत्पादन आणि संशोधन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे टाटा मोटर्सने सुमोच्या इंजिनामध्ये काही बदल केलेले नाहीत. त्यापेक्षा नवीन कार लाँच करण्याकडे कंपनीचा कल आहे. टाटा हॅरिअर, नेक्सॉन, अल्ट्रूझ अशा कार टाटा लाँच करत आहे. यामुळे टाटा सुमोला सुरू ठेवण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसत आहे. 

सुमोनंतर टाटाची सफारीचाही नंबर लागण्याची शक्यता आहे. सफारीलाही बाजारात मागणी नाही. यामुळे या एक्सयुव्हीला एकतर मॉडिफाय करावे लागेल किंवा बंद करावी लागणार आहे. टाटाची एक्सयुव्हीमध्ये हेक्साही आहे.  

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहन