शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

केजरीवाल सरकारविरोधात TATA MOTORS न्यायालयात; फाईव्हस्टार नेक्सॉन ठरली कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 14:54 IST

Tata Nexon EV बाबत दिल्ली सरकारकडून घेतलेल्या एका निर्णयाविरोधात TATA Motors ने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देदिल्ली सरकारविरोधात टाटा मोटर्स दिल्ली उच्च न्यायालयातTata Nexon EV चे अनुदान थांबवलेNexon EV ही FAME मानदंड पूर्ण करणारी एकमेव इलेक्ट्रिक कार असल्याचा दावा

नवी दिल्ली : Tata Nexon EV बाबत दिल्लीसरकारकडून घेतलेल्या एका निर्णयाविरोधात TATA Motors ने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्ली सरकारने नेक्सॉन ईव्हीला दिले जाणारे अनुदान तात्पुरते थांबवले आहे. याविरोधात टाटा मोटर्सने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (tata motors filed an appeal in delhi high court against decision of govt to temporarily suspend subsidy on tata nexon ev)

०१ मार्च २०२१ रोजी ग्राहकांनी केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली सरकारने टाटा मोटर्सच्या बहुचर्चित आणि इलेक्ट्रिक मोटार सेगमेंटमध्ये आघाडीवर असललेल्या टाटा नेक्सॉन ईव्हीवरील अनुदान तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतला. यानंतर टाटा मोटर्सकडून दिल्ली उच्च न्यायलायात जाण्याचा निर्णय घेण्यात आला. 

दिल्ली परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यासंदर्भात ग्राहकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींचा तपास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे केवळ एका नाराज आणि असंतुष्ट ग्राहकाने केलेल्या तक्रारीवरून सरकारने एवढा मोठा निर्णय घेतला आहे, असे टाटा मोटर्सचे म्हणणे आहे. 

कोरोना लसीकरण नोंदणी करताना 'या' ५ चुका अजिबात करू नका; नुकसान टाळा

दिल्ली परिवहन विभागाकडून अशा प्रकारचा आदेश मिळणे दुर्दैवी आहे. ग्राहकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि यापुढेही राहू, असे टाटा मोटर्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले. या प्रकरणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. Nexon EV ही FAME मानदंड पूर्ण करणारी एकमेव इलेक्ट्रिक कार असल्याचा दावा टाटा मोटर्सच्या प्रवक्त्यांकडून करण्यात आला. 

दरम्यान, ०१ मार्च २०२१ रोजी दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी ट्विट करत परिवहन विभागाने काढलेल्या आदेशाची माहिती दिली. अनेक ग्राहकांकडून आलेल्या तक्रारींनंतर एका इलेक्ट्रिक कारच्या मॉडेलवरील अनुदान थांबवण्यात येत आहे. या प्रकरणी एका समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीचा अंतिम रिपोर्ट येणे बाकी आहे. इलेक्ट्रिक कारना पाठिंबा, प्रोत्साहन दिले जात असले, तरी कोणत्याही वाहन निर्मात्याने केलेल्या दाव्यावर ग्राहकाला विश्वास नसेल, तर त्यांना पाठिशी घालता येणार नाही, असे मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले होते.

 

टॅग्स :Tataटाटाdelhiदिल्लीGovernmentसरकारRto officeआरटीओ ऑफीसAutomobileवाहन