शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

केजरीवाल सरकारविरोधात TATA MOTORS न्यायालयात; फाईव्हस्टार नेक्सॉन ठरली कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 14:54 IST

Tata Nexon EV बाबत दिल्ली सरकारकडून घेतलेल्या एका निर्णयाविरोधात TATA Motors ने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देदिल्ली सरकारविरोधात टाटा मोटर्स दिल्ली उच्च न्यायालयातTata Nexon EV चे अनुदान थांबवलेNexon EV ही FAME मानदंड पूर्ण करणारी एकमेव इलेक्ट्रिक कार असल्याचा दावा

नवी दिल्ली : Tata Nexon EV बाबत दिल्लीसरकारकडून घेतलेल्या एका निर्णयाविरोधात TATA Motors ने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्ली सरकारने नेक्सॉन ईव्हीला दिले जाणारे अनुदान तात्पुरते थांबवले आहे. याविरोधात टाटा मोटर्सने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (tata motors filed an appeal in delhi high court against decision of govt to temporarily suspend subsidy on tata nexon ev)

०१ मार्च २०२१ रोजी ग्राहकांनी केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली सरकारने टाटा मोटर्सच्या बहुचर्चित आणि इलेक्ट्रिक मोटार सेगमेंटमध्ये आघाडीवर असललेल्या टाटा नेक्सॉन ईव्हीवरील अनुदान तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतला. यानंतर टाटा मोटर्सकडून दिल्ली उच्च न्यायलायात जाण्याचा निर्णय घेण्यात आला. 

दिल्ली परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यासंदर्भात ग्राहकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींचा तपास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे केवळ एका नाराज आणि असंतुष्ट ग्राहकाने केलेल्या तक्रारीवरून सरकारने एवढा मोठा निर्णय घेतला आहे, असे टाटा मोटर्सचे म्हणणे आहे. 

कोरोना लसीकरण नोंदणी करताना 'या' ५ चुका अजिबात करू नका; नुकसान टाळा

दिल्ली परिवहन विभागाकडून अशा प्रकारचा आदेश मिळणे दुर्दैवी आहे. ग्राहकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि यापुढेही राहू, असे टाटा मोटर्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले. या प्रकरणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. Nexon EV ही FAME मानदंड पूर्ण करणारी एकमेव इलेक्ट्रिक कार असल्याचा दावा टाटा मोटर्सच्या प्रवक्त्यांकडून करण्यात आला. 

दरम्यान, ०१ मार्च २०२१ रोजी दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी ट्विट करत परिवहन विभागाने काढलेल्या आदेशाची माहिती दिली. अनेक ग्राहकांकडून आलेल्या तक्रारींनंतर एका इलेक्ट्रिक कारच्या मॉडेलवरील अनुदान थांबवण्यात येत आहे. या प्रकरणी एका समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीचा अंतिम रिपोर्ट येणे बाकी आहे. इलेक्ट्रिक कारना पाठिंबा, प्रोत्साहन दिले जात असले, तरी कोणत्याही वाहन निर्मात्याने केलेल्या दाव्यावर ग्राहकाला विश्वास नसेल, तर त्यांना पाठिशी घालता येणार नाही, असे मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले होते.

 

टॅग्स :Tataटाटाdelhiदिल्लीGovernmentसरकारRto officeआरटीओ ऑफीसAutomobileवाहन