शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी कार कंपन्यांना टाटा-महिंद्राकडून धोबीपछाड, विक्रीत जोरदार वाढ, समोर आली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 12:01 IST

Indian Car Market Updates: भारतीय कार बाजारातील चित्र गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने बदलत चालले आहे. एकीकडे सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. तर दुसरीकडे ग्राहकांच्या आवडीनिवडीही बदलत आहेत.

मुंबई - भारतीय कार बाजारातील चित्र गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने बदलत चालले आहे. एकीकडे सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. तर दुसरीकडे ग्राहकांच्या आवडीनिवडीही बदलत आहेत. छोट्या कारसाठी प्रसिद्ध असलेले भारतीय ग्राहक आता एसयूव्ही खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. त्याचा परिणाम भारतीय कार बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याचा फायदा टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यासारख्या भारतीय कार कंपन्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. तर परदेशी कंपन्यांची भारतीय बाजारांमधील भागीदारी सातत्याने घटत आहे. 

भारतीय कार मार्केटमधील भागीदारीचा विचार केल्यास मारुती-सुझुकी अद्यापही पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र गेल्या काही दिवसांत कंपनीची बाजारातील भागीदारी ही वेगाने कमी होत चालली आहे. कधीकाळी ही कंपनी कार बाजारामध्ये मक्तेदारी ठेवून होती. तसेच देशातील एकूण कारविक्रीपैकी अर्ध्याहून अधिक कारची विक्री करायची. मात्र आता कार बाजारातील मारुती सुझुकीची हिस्सेदारी ही कमी होऊन ४० टक्क्यांच्या खाली आली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये मारुती सुझुकीच्या भारतीय कार बाजारामधील भागीदारीमध्ये आठ टक्क्यांनी घट दिसून आली आहे. 

भारतातील कार बाजारात होत असलेल्या या बदलांचा सर्वाधिक फायदा हा टाटा मोटर्सला झाला आहे. टाटा मोटर्सने एसयूव्हीची वाढती मागणी विचारात घेऊन नेक्सन, हॅरियर आणि पंचसारखे मॉडेल लॉन्च केले आहेत. नेक्सन भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. तिचं इलेक्ट्रिक रूप नेक्सन ईव्ही भारतीय बाजारात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे.

ऑगस्ट महिन्यातील विक्रीचे आकडे पाहिल्यास १ लाख ३४ हजार १६६ युनिट्सच्या विक्रीसह मारुती सुझुकी पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर हुंडाईचा नंबर लागला. हुंडाईने ऑगस्ट महिन्यात ४९ हजार ५१० कारची विक्री केली. तर टाटा आणि महिंद्राच्या वाढीचा आकडा जबरदस्त आहे. ऑगस्ट महिन्यात टाटा मोटर्सच्या ४७ हजार १६६ कार विकल्या गेल्या. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ ६८ टक्के आहे. तर महिंद्राच्या पॅसेंजर वाहनांच्या विक्रीत ८७ टक्क्यांनी वाढ दिसून आली. महिंद्राच्या २९ हजार ८५२ युनिट्सवर पोहोचली आहे. 

टॅग्स :carकारAutomobileवाहनTataटाटाMahindraमहिंद्रा