शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

गाडीच्या टायर्सबाबतचाही नियम बदलला, आता ‘अशीच’ टायर्स असलेली वाहनं चालवता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 16:12 IST

सरकारनं वाहनांना सुरक्षित बनवण्यासाठी ब्रेक, सेन्सर आणि एअरबॅग्ससारखे काही नियम यापूर्वीच तयार केले आहेत. परंतु आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

वाहन सुरक्षित करण्यासाठी सरकारने ब्रेक, सेन्सर, एअरबॅग असे अनेक नियम केले आहेत. आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वास्तविक, वाहनांच्या टायरच्या डिझाइनमध्ये बदलांना मान्यता देण्यात आली आहे. टायर्स आता 1 ऑक्टोबरच्या नव्या डिझाईनप्रमाणे तयार केली जातील. पुढील वर्षी 1 एप्रिलपासून नवीन टायरसह वाहनांची विक्री केली जाणार आहे. टायरच्या डिझाईनचे नवीन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होतील. नवीन मानके टायर्सच्या C1, C2 आणि C3 श्रेणींना लागू होतील.

नवीन टायर डिझाइन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होतील. AIS-142:2019 टप्पा 2 C1, C2 आणि C3 श्रेणीतील टायरसाठी अनिवार्य आहे. 1 एप्रिल 2023 पासून नवीन वाहनांमध्ये असे टायर ठेवणे बंधनकारक असेल. ऑटोमोटिव्ह इंडियन स्टँडर्ड्स (AIS) नुसार, वाहनाच्या टायर्सची गुणवत्ता आणि डिझाइन आता AIS-142:2019 नुसार असेल.

काय आहे C1, C2 आणि C3?टायर तयार करण्यासाठी सध्या C1, C2 आणि C3 अशा 3 श्रेणी आहेत. पॅसेंजर कार टायर्सच्या श्रेणीला C1 म्हणतात. C2 म्हणजे छोटे कमर्शिअल व्हेईकल व्आणि C3 म्हणजे हेवी व्हेईकल टायर. आतापासून, ऑटोमोटिव्ह इंडियन स्टँडर्ड (AIS) च्या दुसऱ्या टप्प्यातील काही नियम आणि मापदंड या सर्व टायरच्या श्रेणींना अनिवार्यपणे लागू होतील. रोलिंग रेझिस्टन्स, वेट ग्रिप आणि रोलिंग साऊंड एमिशन्ससारख्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

स्टार रेटिंग सिस्टमहीवाहन चालवताना निर्माण होणारा आवाज लक्षात घेऊन नवीन टायर्स अधिक सुरक्षित केले जातील, सोबतच रस्त्यावरील चांगली वेट ग्रीप, ओल्या रस्त्यावरील पकड आणि जास्त वेगावर नियंत्रण ठेवता येईल. याद्वारे ग्राहकांना खरेदीच्या वेळी टायर किती सुरक्षित आहे हे कळू शकणार आहे. याशिवाय परिवहन मंत्रालय आणि अवजड उद्योग मंत्रालय लवकरच टायर्ससाठी स्टार रेटिंग सुरू करणार आहेत. रेटिंग ग्राहकाला त्याच्या वापरानुसार सर्वोत्तम आणि सुरक्षित टायर निवडण्यास मदत करेल.

कारमध्ये ६ एअरबॅग्स अनिवार्यप्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सरकार आठ प्रवासी वाहनांमध्ये किमान सहा एअरबॅग अनिवार्य करणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, वाहनांमध्ये बसणाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कंपन्यांना वाहनांमधील एअरबॅगची संख्या वाढवावी लागेल. त्यांना आठ प्रवासी क्षमता असलेल्या वाहनांमध्ये किमान सहा एअरबॅग्ज बसविण्यास सांगितले जाईल. गडकरींच्या म्हणण्यानुसार, आठ प्रवासी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या अधिसूचनेला त्यांनी मंजुरी दिली आहे.

टॅग्स :AutomobileवाहनNitin Gadkariनितीन गडकरी