शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

१ एप्रिल २०२२ पासून 'या' गाड्या निघणार भंगारात; लवकरच येणार नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 13:44 IST

Scrapping Policy : १ फेब्रुवारी २०२१ रोजी सरकारनं वॉलेंटरी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीची करण्यात आली होती घोषणा

ठळक मुद्दे वॉलेंटरी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीची यापूर्वी करण्यात आली होती घोषणा१५ वर्षांपेक्षा जुन्या गाड्यांची नोंदणीचं नुतनीकरण होणार नाही

देशात सरकारी विभाग आणि PSUs द्वारे खरेदी करण्यात आलेल्या १५ वर्षांहून अधिक जुन्या गाड्या भंगारात काढण्याच्या स्क्रॅपेज धोकणाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी मंजुरी दिली होती. आता १ एप्रिल २०२२ पासून सरकारी विभागांना आपल्या १५ वर्षांपेक्षा जुन्या गाड्यांची नोंदणीचं नुतनीकरण करता येणार नाही. केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं या प्रस्तावाला अंतिम रूप दिलं तर हा नियम लागू होणार आहे. मंत्रालयाकडून या संबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी नोटिफिकेशन जारी करून यावरील सूचना मागवण्यात आल्या आहेत.प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर सर्व सरकारी वाहनं म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, सार्वजनिक उपक्रम, नगर पालिका आणि स्वायत्त संस्थांना लागू होणार आहे. "१ एप्रिल २०२२ पासून सरकारी विभाग आपल्या १५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनांच्या नोंदणीचं नुतनीकरण करू शकणार नाही. हे नियम केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, सार्वजनिक उपक्रम, नगर पालिका आणि स्वायत्त संस्थांना लागू होणार आहे," असं ट्वीट राष्ट्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रायलाद्वारे करण्यात आलं आहे.  अर्थसंकल्पातच घोषणाअधिसूचनेद्वारे ड्राफ्ट नियम १२ मार्च रोजी जारी करण्यात आले आहेत. यावर ३० दिवसांच्या आत सूचना, काही हरकती देण्यासही सांगण्यात आलं आहे. यापूर्वी १ फेब्रुवारी २०२१ रोजी सरकारनं वॉलेंटरी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा केली होती. या अंतर्गत खासगी वाहनांना २० वर्षांनंतर आणि कमर्शिअल वाहनांना १५ वर्षांनंतर फिटनेस चाचणी करणं आवश्यक केलं होतं. "सुरूवातीला १ कोटी वाहनं स्क्रॅपिंगसाठी दिली जाणार आहे. या धोरणात जवळपास १० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक आणि जवळपास ५० हजार नोकऱ्या तयार होतील. या गाड्या नव्या गाड्यांच्या तुलनेत१० ते १२ टक्के अधिक प्रदुषण करतात," असं गडकरी यापूर्वी म्हणाले होते.यासाठीचे पहिले पाऊल केंद्र सरकारने २६ जुलै २०१९ लाच उचलले होते. देशात इलेक्ट्रीक वाहनांना बूस्ट देण्यासाठी १५ वर्षांपेक्षा अधिक जुनी वाहने भंगारात काढण्यास मंजुरी देण्यासाठी मोटर वाहन नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला होता. आता त्यावर हळू हळू अंमल करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :carकारIndiaभारतGovernmentसरकारNitin Gadkariनितीन गडकरीpollutionप्रदूषण