शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरील प्रवाशांची संख्या दोनपेक्षा जास्त नकोच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 12:00 IST

दुचाकीवर दोनापेक्षा जास्त प्रवासी न नेल्यास दंड केला जात असावा, अशीच सध्याची स्थिती आहे की काय, असा प्रश्न पडतो. इतक्या मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार कायद्याचे उल्लंघन करीत स्वतःच्या सुरक्षिततेलाच धोक्यात टाकीत आहेत.

ठळक मुद्देस्कूटर म्हणजे रिक्षा वा टॅक्सीच्या ऐवजी वापरण्याचे सार्वजनिक साधन आहे का, असाच प्रश्न पडतोमोटारसायकलीवर चालवणारा व त्याच्यामागे एक अशा फक्त दोन जणांनाच जाण्यास परवानगी आहेइतकेच नव्हे तर कायद्यानुसार व सुरक्षिततेसाठी दोनही व्यक्तींनी हेल्मेट धारण करणे सक्तीचे आहे

भारतात स्कूटर व मोटारसायकल या दुचाकींचा वापर अनेकदा अगदी ट्रकसारखा मालवाहू म्हणून केला जातो. केवळ मालवाहू म्हणूनच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला बालबच्चांसह नेणे यात अनेकांना मोठी धन्यता वाटते. सर्वात मोठा स्टंट भर रस्त्यावर होत असूनही कोणी काही बोलत नाही वा कोणी त्यांना असे करू नका म्हणून सांगत नाही. ना पोलीस ना शेजारी-पाजारी, ना मित्र. अशा प्रकारचे बेकायदा वर्तन करणे यात अनेकांना बेकायदा वाटत नाही.

स्कूटर म्हणजे रिक्षा वा टॅक्सीच्या ऐवजी वापरण्याचे सार्वजनिक साधन आहे का, असाच प्रश्न पडतो. वाढत्या महागाईमुळे, पेट्रोलच्या किंमती वाढण्याने असे जर कोणी कृत्य करीत असेल तर त्याला काय म्हणावे. इतका भारत देश गरीब आहे का, की स्कूटर वा मोटारसायकल घेणे परवडते, ती नेहमी वापरणे परवडते पण कुटुंबाच्या, आपल्याच मुलाबाळांच्या सुरक्षेसाठी कोणतीही काळजी न घेता दुचाकीवर एकापेक्षा अनेकांना वाहून नेण्याची कसरत न करणे मात्र परवडत नाही. खरे म्हणजे कायद्यानुसार यावर बंदी आहे. हेल्मेट न वापरण्यावर जशी बंदी व दंड आहे तसेच स्कूटर वा मोटारसायकलीवर चालवणारा व त्याच्यामागे एक अशा फक्त दोन जणांनाच जाण्यास परवानगी आहे. इतकेच नव्हे तर कायद्यानुसार व सुरक्षिततेसाठी दोनही व्यक्तींनी हेल्मेट धारण करणे सक्तीचे आहे. पण लक्षात कोण घेतो, अशा थाटात सरकारला, नेत्यांना नावे ठेवमारे आपण, त्यांच्यावर तोंडसुख घेणारे आपण चलता है, टॅक्सी परवडत नाही असे सांगत अपघातांना निमंत्रण देत असतो.

अगदी छोटा अपघात झाला तर चार दिवस घरात बसण्यापेक्षा व दुखणं अंगावर काढत बसण्यापेक्षा हेल्मेट घातले किंवा दोनच जण स्कूटर वा मोटारसायकलवरून गेले तर काय बिघडते का, पण नाही... कायदेभंग हा जणू भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत आपल्यासाठीच आखून दिलेला मार्ग आहे, अशाच थाटात आपण सारे वावरत असतो. कायदे पाळल्याविना स्वातंत्र्य, त्याचे फायदे हवे आहेत, असे कसे. याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. दुचाकीस्वाराने त्याच्यासह दोनपेक्षा अधिक व्यक्ती रस्त्यावरून दुचाकी चालवताना नेल्या तर त्याला तीन महिने शिक्षा किंवा ५०० रुपये दंड वा दोन्ही होऊ शकतो. हा दंड वा ही शिक्षा करण्याचे पोलिसांनी अजूनतरी मनावर घेतलेले दिसत नाही. मात्र लोकांनी ते मनावर घ्यायला काहीच हरकत नसावी..

 

टॅग्स :Automobileवाहनtwo wheelerटू व्हीलरAccidentअपघात