शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

दुचाकीवरील प्रवाशांची संख्या दोनपेक्षा जास्त नकोच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 12:00 IST

दुचाकीवर दोनापेक्षा जास्त प्रवासी न नेल्यास दंड केला जात असावा, अशीच सध्याची स्थिती आहे की काय, असा प्रश्न पडतो. इतक्या मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार कायद्याचे उल्लंघन करीत स्वतःच्या सुरक्षिततेलाच धोक्यात टाकीत आहेत.

ठळक मुद्देस्कूटर म्हणजे रिक्षा वा टॅक्सीच्या ऐवजी वापरण्याचे सार्वजनिक साधन आहे का, असाच प्रश्न पडतोमोटारसायकलीवर चालवणारा व त्याच्यामागे एक अशा फक्त दोन जणांनाच जाण्यास परवानगी आहेइतकेच नव्हे तर कायद्यानुसार व सुरक्षिततेसाठी दोनही व्यक्तींनी हेल्मेट धारण करणे सक्तीचे आहे

भारतात स्कूटर व मोटारसायकल या दुचाकींचा वापर अनेकदा अगदी ट्रकसारखा मालवाहू म्हणून केला जातो. केवळ मालवाहू म्हणूनच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला बालबच्चांसह नेणे यात अनेकांना मोठी धन्यता वाटते. सर्वात मोठा स्टंट भर रस्त्यावर होत असूनही कोणी काही बोलत नाही वा कोणी त्यांना असे करू नका म्हणून सांगत नाही. ना पोलीस ना शेजारी-पाजारी, ना मित्र. अशा प्रकारचे बेकायदा वर्तन करणे यात अनेकांना बेकायदा वाटत नाही.

स्कूटर म्हणजे रिक्षा वा टॅक्सीच्या ऐवजी वापरण्याचे सार्वजनिक साधन आहे का, असाच प्रश्न पडतो. वाढत्या महागाईमुळे, पेट्रोलच्या किंमती वाढण्याने असे जर कोणी कृत्य करीत असेल तर त्याला काय म्हणावे. इतका भारत देश गरीब आहे का, की स्कूटर वा मोटारसायकल घेणे परवडते, ती नेहमी वापरणे परवडते पण कुटुंबाच्या, आपल्याच मुलाबाळांच्या सुरक्षेसाठी कोणतीही काळजी न घेता दुचाकीवर एकापेक्षा अनेकांना वाहून नेण्याची कसरत न करणे मात्र परवडत नाही. खरे म्हणजे कायद्यानुसार यावर बंदी आहे. हेल्मेट न वापरण्यावर जशी बंदी व दंड आहे तसेच स्कूटर वा मोटारसायकलीवर चालवणारा व त्याच्यामागे एक अशा फक्त दोन जणांनाच जाण्यास परवानगी आहे. इतकेच नव्हे तर कायद्यानुसार व सुरक्षिततेसाठी दोनही व्यक्तींनी हेल्मेट धारण करणे सक्तीचे आहे. पण लक्षात कोण घेतो, अशा थाटात सरकारला, नेत्यांना नावे ठेवमारे आपण, त्यांच्यावर तोंडसुख घेणारे आपण चलता है, टॅक्सी परवडत नाही असे सांगत अपघातांना निमंत्रण देत असतो.

अगदी छोटा अपघात झाला तर चार दिवस घरात बसण्यापेक्षा व दुखणं अंगावर काढत बसण्यापेक्षा हेल्मेट घातले किंवा दोनच जण स्कूटर वा मोटारसायकलवरून गेले तर काय बिघडते का, पण नाही... कायदेभंग हा जणू भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत आपल्यासाठीच आखून दिलेला मार्ग आहे, अशाच थाटात आपण सारे वावरत असतो. कायदे पाळल्याविना स्वातंत्र्य, त्याचे फायदे हवे आहेत, असे कसे. याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. दुचाकीस्वाराने त्याच्यासह दोनपेक्षा अधिक व्यक्ती रस्त्यावरून दुचाकी चालवताना नेल्या तर त्याला तीन महिने शिक्षा किंवा ५०० रुपये दंड वा दोन्ही होऊ शकतो. हा दंड वा ही शिक्षा करण्याचे पोलिसांनी अजूनतरी मनावर घेतलेले दिसत नाही. मात्र लोकांनी ते मनावर घ्यायला काहीच हरकत नसावी..

 

टॅग्स :Automobileवाहनtwo wheelerटू व्हीलरAccidentअपघात