शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

महिंद्राने देशातील पहिल्यावहिल्या इलेक्ट्रीक कारचे उत्पादन थांबविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 17:00 IST

महिंद्रा या कारचे उत्पादन कर्नाटकमध्ये करत होती. कंपनीने या कारचे चार व्हेरिअंट लाँच केले होते.

पर्यावरणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने एकीकडे विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याची योजना आखलेली असताना एक वाईट बातमी य़ेत आहे. भारतीय कंपनी महिंद्राने देशातील पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार e2o प्लसचे उत्पादनच थांबविले आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 'बुलडोझर'ला मोठा धक्का बसला आहे. 

केंद्र सरकारने 2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची वाहने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या नंतर केवळ इलेक्ट्रीक वाहनेच विकली जाणार आहेत. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्याचे 'बुलडोझर'चे वक्तव्य त्यावेळी चर्चेत होते. या नंतर वाहन निर्मिती कंपन्यांनीसुद्धा त्यादृष्टीने पाऊले टाकण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला फोक्सवॅगन आणि आता मारुतीने डिझेलची वाहने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 

महिंद्राने या छोट्याशा दोन दरवाजांच्या e2o या कारचे उत्पादन 2013 मध्ये सुरु केले होते. तर ऑक्टोबर 2016 मध्ये या कारला चार दरवाजे देण्यात आले होते आणि  e2o प्लस असे नाव दिले होते. या कारचे उत्पादन 31 मार्चपासून झालेले नाही. 

महिंद्रा या कारचे उत्पादन कर्नाटकमध्ये करत होती. कंपनीने या कारचे चार व्हेरिअंट लाँच केले होते. या कारचे पी8 हे व्हेरिअंट एका चार्जिंगमध्ये 140 किमी जात होते. तर अन्य व्हेरिअंट 110 किमी धावत होते. कंपनीने गेल्यावर्षीच P2 आणि  P8 व्हेरिअंट बंद केले होते. आता त्यांच्याकडे केवळ दोनच मॉडेल आहेत.

फुल चार्जसाठी दीड तास लागायचा e2o च्या P2 व्हेरिअंटमध्ये  3kW सिंगल फेज 16 अँपिअरचा चार्जर येत होता. ही कार चार्ज होण्यासाठी 7.20 तास लागत होते. तर 32 अँपिअरच्या चार्जरद्वारे 1.35 तासांत फुल चार्ज होत होती. या कारमध्ये लिथिअम आयनची बॅटरी वापरली होती. या कारवर तीन वर्षांची किंवा 60 हजार किमीची वॉरंटी दिली जात होती. ही कार बंद झालेली असली तरीही त्याच्याजागी e-KUV100 ही नवीन इलेक्ट्रीक कार आणली जाण्याची शक्यता आहे. ही कार दुसऱ्या तिमाहीमध्ये लाँच केली जाईल. तसेच XUV300 चीही इलेक्ट्रीक कार येण्याची शक्यता आहे. या कारमध्ये दोन बॅटरी दिल्या जातील. 

 

टॅग्स :Mahindraमहिंद्राElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन