शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

महिंद्राने देशातील पहिल्यावहिल्या इलेक्ट्रीक कारचे उत्पादन थांबविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 17:00 IST

महिंद्रा या कारचे उत्पादन कर्नाटकमध्ये करत होती. कंपनीने या कारचे चार व्हेरिअंट लाँच केले होते.

पर्यावरणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने एकीकडे विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याची योजना आखलेली असताना एक वाईट बातमी य़ेत आहे. भारतीय कंपनी महिंद्राने देशातील पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार e2o प्लसचे उत्पादनच थांबविले आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 'बुलडोझर'ला मोठा धक्का बसला आहे. 

केंद्र सरकारने 2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची वाहने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या नंतर केवळ इलेक्ट्रीक वाहनेच विकली जाणार आहेत. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्याचे 'बुलडोझर'चे वक्तव्य त्यावेळी चर्चेत होते. या नंतर वाहन निर्मिती कंपन्यांनीसुद्धा त्यादृष्टीने पाऊले टाकण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला फोक्सवॅगन आणि आता मारुतीने डिझेलची वाहने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 

महिंद्राने या छोट्याशा दोन दरवाजांच्या e2o या कारचे उत्पादन 2013 मध्ये सुरु केले होते. तर ऑक्टोबर 2016 मध्ये या कारला चार दरवाजे देण्यात आले होते आणि  e2o प्लस असे नाव दिले होते. या कारचे उत्पादन 31 मार्चपासून झालेले नाही. 

महिंद्रा या कारचे उत्पादन कर्नाटकमध्ये करत होती. कंपनीने या कारचे चार व्हेरिअंट लाँच केले होते. या कारचे पी8 हे व्हेरिअंट एका चार्जिंगमध्ये 140 किमी जात होते. तर अन्य व्हेरिअंट 110 किमी धावत होते. कंपनीने गेल्यावर्षीच P2 आणि  P8 व्हेरिअंट बंद केले होते. आता त्यांच्याकडे केवळ दोनच मॉडेल आहेत.

फुल चार्जसाठी दीड तास लागायचा e2o च्या P2 व्हेरिअंटमध्ये  3kW सिंगल फेज 16 अँपिअरचा चार्जर येत होता. ही कार चार्ज होण्यासाठी 7.20 तास लागत होते. तर 32 अँपिअरच्या चार्जरद्वारे 1.35 तासांत फुल चार्ज होत होती. या कारमध्ये लिथिअम आयनची बॅटरी वापरली होती. या कारवर तीन वर्षांची किंवा 60 हजार किमीची वॉरंटी दिली जात होती. ही कार बंद झालेली असली तरीही त्याच्याजागी e-KUV100 ही नवीन इलेक्ट्रीक कार आणली जाण्याची शक्यता आहे. ही कार दुसऱ्या तिमाहीमध्ये लाँच केली जाईल. तसेच XUV300 चीही इलेक्ट्रीक कार येण्याची शक्यता आहे. या कारमध्ये दोन बॅटरी दिल्या जातील. 

 

टॅग्स :Mahindraमहिंद्राElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन