शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

टायर बदलायला झाला तर लगेच बदला... नको खेळ प्राणाशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 07:00 IST

टायर योग्यवेळी बदलणे हे अतिशय महत्त्वाचे असते. तुमची कार ज्या टायरवर धावत असते, त्या टायरची योग्य काळजी व योग्यवेळी बदलल्य़ाविना सुरक्षित प्रवासाला अचूक आहे असे म्हणता येणार नाही. तेव्हा टायरकडे कायम लक्ष असणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देट्यूबलेस टायर वा सर्वसाधारण ट्यूबसह असणारे टायर हे ३० हजार किलोमीटर इतके चालतातअर्थात याचा अर्थ असाही नव्हे की ते तितके चालतातचखराब होण्याची कारणे म्हणजे कार बऱ्याच दिवसांपासून तशीच उभी करण्याची सवय, फार न वापरण्याची सवय

कारच्या टायरबाबत तशा बऱ्याच बाबी आहेत, त्या प्रत्येक कार चालक व मालकाने लक्षात घ्यायला हव्यात पण अनेकदा अतिआत्मविश्वास, कंजूषपणा आणि दुर्लक्ष यामुळे टायर बदलले जात नाहीत, परिणामी अपघाताला सामोरे जावे लागते. टायर फुटणे, टायर फाटणे,ट्यूब बाहेर पडणे ट्यूबलेस टायर असेल व गरम होऊन फुटला तर वाहन वेगात असेल तर काय होईल, ते न जाणो, अतकी भीषणता टायरकडे दुर्लक्ष झाल्याने होऊ शकते. वाहन व वाहतुकीचे नियम पाळताना तुम्ही तुमच्या वाहनाच्या मग ती कार असो, एसयूव्ही असो की बस असो वा ट्रक असो टायरची काळजी अतोनात घेणे हे तुमच्या व अन्य लोकांच्या प्राणाच्यादृष्टीनेही घेणे गरजेचे आहे. टायरबाबत अनेकजण इतके बेफिकीर असतात, की त्यांना विचारले की त्यांच्याकडून मिळणारी उत्तरे ऐकली की, नको त्यांना ते सांगणे असे वाटते.

साधारणपणे ट्यूबलेस टायर वा सर्वसाधारण ट्यूबसह असणारे टायर हे ३० हजार किलोमीटर इतके चालतात. अर्थात याचा अर्थ असाही नव्हे की ते तितके चालतातच. ते खराबही होऊ शकतात. खराब होण्याची कारणे म्हणजे कार बऱ्याच दिवसांपासून तशीच उभी करण्याची सवय, फार न वापरण्याची सवय., वेगामध्ये व खराब रस्ता असतानाही झटकन वळवण्याची सवय, हवा कमी वा अधिक ठेवण्याची सवय वा चूक, टायरला कट गेला असेल तरी तसाच वापरणे,अलाईनमेंट न करणे किंवा टायर रोटेशन न करता वापरणे, टायरवरील नक्षी घासली गेली व टायरच्या खळग्यातील एक विशिष्ट मर्यादा ओलांडली तरी तो वापरणे, एका बाजूने घासला गेला तरी वापरणे अशा  विविध कारणांचा यात समावेश आहे.

टायर अजून चालेल, पावसाळ्यानंतर बदलू, डिझाईन इतके काही खराब नाही झालेले,रिमोल्ड करून वापरू, मी काही जास्त वेगात कार नाही चालवत, फार रनिंगही नसते माझे अशीही कारणे देत टायर बदलण्याची गरज नाही, याचे समर्थन करणारेही अनेक लोक आहेत. टायर हा तुमच्या वाहनाचा एक महत्त्वाचा घटक असून त्याच्या खराब असण्याने अपघात होऊ शकतात, गंभीर अपघातही होऊ शकतात, हेच अनेकांना कळत नाही,. पैसे वाचवण्याच्या नावाखाली कंजूषपणा करीत आपल्याच प्राणाशी खेळणारे कार चालक, मालक पाहिले की मात्र कार वापरण्यासाठी असणारी भारतीय मानसिकता समजून येते. वास्तविक टायर उद्योग हा अतिशय मोठा व पर्याय देणारा असून टायर घेताना त्याबाबत चार लोकांशी बोलून व त्या अनुषंगाने टायरची निवड करणे गरजेचे आहे. टायरसारखी महत्त्वाची बाब दुर्लक्षून चालणार नाही.

टॅग्स :AutomobileवाहनcarकारAccidentअपघात