शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

टायर बदलायला झाला तर लगेच बदला... नको खेळ प्राणाशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 07:00 IST

टायर योग्यवेळी बदलणे हे अतिशय महत्त्वाचे असते. तुमची कार ज्या टायरवर धावत असते, त्या टायरची योग्य काळजी व योग्यवेळी बदलल्य़ाविना सुरक्षित प्रवासाला अचूक आहे असे म्हणता येणार नाही. तेव्हा टायरकडे कायम लक्ष असणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देट्यूबलेस टायर वा सर्वसाधारण ट्यूबसह असणारे टायर हे ३० हजार किलोमीटर इतके चालतातअर्थात याचा अर्थ असाही नव्हे की ते तितके चालतातचखराब होण्याची कारणे म्हणजे कार बऱ्याच दिवसांपासून तशीच उभी करण्याची सवय, फार न वापरण्याची सवय

कारच्या टायरबाबत तशा बऱ्याच बाबी आहेत, त्या प्रत्येक कार चालक व मालकाने लक्षात घ्यायला हव्यात पण अनेकदा अतिआत्मविश्वास, कंजूषपणा आणि दुर्लक्ष यामुळे टायर बदलले जात नाहीत, परिणामी अपघाताला सामोरे जावे लागते. टायर फुटणे, टायर फाटणे,ट्यूब बाहेर पडणे ट्यूबलेस टायर असेल व गरम होऊन फुटला तर वाहन वेगात असेल तर काय होईल, ते न जाणो, अतकी भीषणता टायरकडे दुर्लक्ष झाल्याने होऊ शकते. वाहन व वाहतुकीचे नियम पाळताना तुम्ही तुमच्या वाहनाच्या मग ती कार असो, एसयूव्ही असो की बस असो वा ट्रक असो टायरची काळजी अतोनात घेणे हे तुमच्या व अन्य लोकांच्या प्राणाच्यादृष्टीनेही घेणे गरजेचे आहे. टायरबाबत अनेकजण इतके बेफिकीर असतात, की त्यांना विचारले की त्यांच्याकडून मिळणारी उत्तरे ऐकली की, नको त्यांना ते सांगणे असे वाटते.

साधारणपणे ट्यूबलेस टायर वा सर्वसाधारण ट्यूबसह असणारे टायर हे ३० हजार किलोमीटर इतके चालतात. अर्थात याचा अर्थ असाही नव्हे की ते तितके चालतातच. ते खराबही होऊ शकतात. खराब होण्याची कारणे म्हणजे कार बऱ्याच दिवसांपासून तशीच उभी करण्याची सवय, फार न वापरण्याची सवय., वेगामध्ये व खराब रस्ता असतानाही झटकन वळवण्याची सवय, हवा कमी वा अधिक ठेवण्याची सवय वा चूक, टायरला कट गेला असेल तरी तसाच वापरणे,अलाईनमेंट न करणे किंवा टायर रोटेशन न करता वापरणे, टायरवरील नक्षी घासली गेली व टायरच्या खळग्यातील एक विशिष्ट मर्यादा ओलांडली तरी तो वापरणे, एका बाजूने घासला गेला तरी वापरणे अशा  विविध कारणांचा यात समावेश आहे.

टायर अजून चालेल, पावसाळ्यानंतर बदलू, डिझाईन इतके काही खराब नाही झालेले,रिमोल्ड करून वापरू, मी काही जास्त वेगात कार नाही चालवत, फार रनिंगही नसते माझे अशीही कारणे देत टायर बदलण्याची गरज नाही, याचे समर्थन करणारेही अनेक लोक आहेत. टायर हा तुमच्या वाहनाचा एक महत्त्वाचा घटक असून त्याच्या खराब असण्याने अपघात होऊ शकतात, गंभीर अपघातही होऊ शकतात, हेच अनेकांना कळत नाही,. पैसे वाचवण्याच्या नावाखाली कंजूषपणा करीत आपल्याच प्राणाशी खेळणारे कार चालक, मालक पाहिले की मात्र कार वापरण्यासाठी असणारी भारतीय मानसिकता समजून येते. वास्तविक टायर उद्योग हा अतिशय मोठा व पर्याय देणारा असून टायर घेताना त्याबाबत चार लोकांशी बोलून व त्या अनुषंगाने टायरची निवड करणे गरजेचे आहे. टायरसारखी महत्त्वाची बाब दुर्लक्षून चालणार नाही.

टॅग्स :AutomobileवाहनcarकारAccidentअपघात