शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

टायर बदलायला झाला तर लगेच बदला... नको खेळ प्राणाशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 07:00 IST

टायर योग्यवेळी बदलणे हे अतिशय महत्त्वाचे असते. तुमची कार ज्या टायरवर धावत असते, त्या टायरची योग्य काळजी व योग्यवेळी बदलल्य़ाविना सुरक्षित प्रवासाला अचूक आहे असे म्हणता येणार नाही. तेव्हा टायरकडे कायम लक्ष असणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देट्यूबलेस टायर वा सर्वसाधारण ट्यूबसह असणारे टायर हे ३० हजार किलोमीटर इतके चालतातअर्थात याचा अर्थ असाही नव्हे की ते तितके चालतातचखराब होण्याची कारणे म्हणजे कार बऱ्याच दिवसांपासून तशीच उभी करण्याची सवय, फार न वापरण्याची सवय

कारच्या टायरबाबत तशा बऱ्याच बाबी आहेत, त्या प्रत्येक कार चालक व मालकाने लक्षात घ्यायला हव्यात पण अनेकदा अतिआत्मविश्वास, कंजूषपणा आणि दुर्लक्ष यामुळे टायर बदलले जात नाहीत, परिणामी अपघाताला सामोरे जावे लागते. टायर फुटणे, टायर फाटणे,ट्यूब बाहेर पडणे ट्यूबलेस टायर असेल व गरम होऊन फुटला तर वाहन वेगात असेल तर काय होईल, ते न जाणो, अतकी भीषणता टायरकडे दुर्लक्ष झाल्याने होऊ शकते. वाहन व वाहतुकीचे नियम पाळताना तुम्ही तुमच्या वाहनाच्या मग ती कार असो, एसयूव्ही असो की बस असो वा ट्रक असो टायरची काळजी अतोनात घेणे हे तुमच्या व अन्य लोकांच्या प्राणाच्यादृष्टीनेही घेणे गरजेचे आहे. टायरबाबत अनेकजण इतके बेफिकीर असतात, की त्यांना विचारले की त्यांच्याकडून मिळणारी उत्तरे ऐकली की, नको त्यांना ते सांगणे असे वाटते.

साधारणपणे ट्यूबलेस टायर वा सर्वसाधारण ट्यूबसह असणारे टायर हे ३० हजार किलोमीटर इतके चालतात. अर्थात याचा अर्थ असाही नव्हे की ते तितके चालतातच. ते खराबही होऊ शकतात. खराब होण्याची कारणे म्हणजे कार बऱ्याच दिवसांपासून तशीच उभी करण्याची सवय, फार न वापरण्याची सवय., वेगामध्ये व खराब रस्ता असतानाही झटकन वळवण्याची सवय, हवा कमी वा अधिक ठेवण्याची सवय वा चूक, टायरला कट गेला असेल तरी तसाच वापरणे,अलाईनमेंट न करणे किंवा टायर रोटेशन न करता वापरणे, टायरवरील नक्षी घासली गेली व टायरच्या खळग्यातील एक विशिष्ट मर्यादा ओलांडली तरी तो वापरणे, एका बाजूने घासला गेला तरी वापरणे अशा  विविध कारणांचा यात समावेश आहे.

टायर अजून चालेल, पावसाळ्यानंतर बदलू, डिझाईन इतके काही खराब नाही झालेले,रिमोल्ड करून वापरू, मी काही जास्त वेगात कार नाही चालवत, फार रनिंगही नसते माझे अशीही कारणे देत टायर बदलण्याची गरज नाही, याचे समर्थन करणारेही अनेक लोक आहेत. टायर हा तुमच्या वाहनाचा एक महत्त्वाचा घटक असून त्याच्या खराब असण्याने अपघात होऊ शकतात, गंभीर अपघातही होऊ शकतात, हेच अनेकांना कळत नाही,. पैसे वाचवण्याच्या नावाखाली कंजूषपणा करीत आपल्याच प्राणाशी खेळणारे कार चालक, मालक पाहिले की मात्र कार वापरण्यासाठी असणारी भारतीय मानसिकता समजून येते. वास्तविक टायर उद्योग हा अतिशय मोठा व पर्याय देणारा असून टायर घेताना त्याबाबत चार लोकांशी बोलून व त्या अनुषंगाने टायरची निवड करणे गरजेचे आहे. टायरसारखी महत्त्वाची बाब दुर्लक्षून चालणार नाही.

टॅग्स :AutomobileवाहनcarकारAccidentअपघात