शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

डोक्याच्या संरक्षणासाठी दुचाकीस्वारांवरील हेल्मेट सक्ती योग्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 18:35 IST

हेल्मेटमुळे दुचाकीस्वारांना अपघातांमध्ये मोठे संरक्षण मिळते, किमान जखमांवरही काहीवेळा निभावते व प्राण वाचतात, मात्र त्याचबरोबर आपण कायदा पाळणारे नागरिक आहोत, याचेही वर्तन तुमच्या हेल्मेट वापरण्यानेही होत असते. हे लक्षात घ्यायला हवे.

ठळक मुद्देआयएसाय मार्क असलेली हेल्मेट्स जी स्कूटर व मोटारसायकल स्वारांसाठी असतात, तीच घ्यायला हवीतत्यामध्ये केलेली रचना व वापरलेली साधने ही नक्कीच अधिक सक्षम असतातउन्हाचा त्रास होतो तर गॉगल लावणे, वा गॉगल ग्लास असणाऱ्या हेल्मेटचा वापर करणे शक्य आहे

मोटारसायकल असो, स्कूटर असो वा अगदी इलेक्ट्रिकवर चालणारी स्कूटी. दुचाकी चालवताना चालवणाऱ्याने वा त्या मागे बसणाऱ्यानेही हेल्मेट घालणे सक्तीचे केले आहे. तो नियम आहे, वाहतूक नियमामध्ये त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड आहे. हेल्मेटमुळे कोणत्याही प्रकारच्या अपघातात दुचाकीस्वारांच्या डोक्याला होणारी इजा कमीतकमी होते.किंबहुना अनेकदा होत नाही. मात्र त्या हेल्मेट सक्तीला अनेकांनी धुडकावून लावले आहे.उन्हाळ्यामध्ये त्रास होतो, पावसात चालवताना समोरचे नीट दिसत नाही, ते जड ओझे कुठे नेणार अशी अनेक कारणे पुढे करीत अनेकजण हेल्मेट वापरण्याचे टाळतात. वाहतूक पोलीस अडवतात व दंड वसूल करतात, त्यांच्या पद्धतीने ते समजवतात, काही अधिकारी हेल्मेट विकत आणून देण्याचाही उपक्रम करतात. पण यातून लोकांनी बोध घेतलेला नाही.

अपघातात हेल्मेटमुळे डोक्याला होणारी संभाव्य इजा किमान गंभीर होत नाही. अर्थात मोठ्या अपघातांमध्ये काहीवेळा त्याचाही उपयोग होत नाही. मात्र त्याचा अर्थ हेल्मेट ही संकल्पनाच कुचकामी आहे, असा अजिबात नाही. लोकांनी मनावर घेतले तर ते लोक करतात. हेल्मेट न वापरणे ही एक स्टाइलही बनलेली आहे. मुळात ते कशासाठी आहे ते समजून घेण्याची जशी गरज आहे, तसेच हेल्मेट वापरण्याने तुम्ही कायद्याचे पालन करीत आहात, हे देखील तितकचे महत्त्वाचे आहे. कायद्याचे पालन करणे हेच अनेकांना मान्य नसते, त्यांच्या मते हे चुकीचे आहे, कायदा बनवताना हेल्मेट तयार करणाऱ्या उत्पादकांचे भले करण्याचा हा प्रकार आहे. मात्र असा विचार करणेही चुकीचे म्हणावे लागते. मुळात हेल्मेटची आवश्यकता प्रत्येक दुचाकीधारकांना वाटली पाहिजे. मोटारसायकल व स्कूटरवरून आपल्या कुटुंबकाफिल्यासह तीन ते पाच जणांना वाहून नेणारा व फक्त स्वतः हेल्मेट घालणारा माणूस पाहिला तर तो त्याचा सोयीचा भाग नसून तो स्वार्थीपणा व कायदा धुडकावून लावण्याचेच वर्तन ठरते. मुलाबाळांना नेताना मर्यादेपेक्षा जास्त लोकांना नेताना त्यांच्या डोक्याचा तरी विचार कर बाब, असे सांगण्याची गरज वाटू लागते.

हेलमेटचे आज विविध प्रकार आहेत. आयएसाय मार्क असलेली हेल्मेट्स जी स्कूटर व मोटारसायकल स्वारांसाठी असतात, तीच घ्यायला हवीत. त्यामध्ये केलेली रचना व वापरलेली साधने ही नक्कीच अधिक सक्षम असतात. गरम होते जास्त असे म्हणणाऱ्यांना हाफ हेल्मेट वापरता येते, उन्हाचा त्रास होतो तर गॉगल लावणे, वा गॉगल ग्लास असणाऱ्या हेल्मेटचा वापर करणे शक्य आहे. आज स्कूटर्सना एक हेल्मेट ठेवण्यासाठी असणारी जागा पुरेशी आहे. बाईक्सना पूर्ण डोके कव्हर करणारे हेल्मेट घेतले किंवा हाफ हेल्मेट व पूर्ण हेल्मेट यांचे एकत्रित तंत्र वापरून असलेले हेल्मेट घेतले तर ते मोटारसायकलीला लॉक करून ठेवता येते. म्हणजेच हेल्मेट चोरीला जाण्याचा संभव कमी असतो. या स्थितीतही हेल्मेट न वापरणे हे स्वतःच्या प्राणाला दोक्यात घालण्याबरोबरच कायद्यालाही धाब्यावर बसवण्यासारखे आहे. देश व नागरिक म्हणून स्वतःला अभिमानाने भारतीय म्हणणाऱ्यांनी खरे म्हणजे हेल्मेट वापर करून कायद्याचे पालन करून अभिमान बाळगायला काहीच हरकत नाही.

टॅग्स :Automobileवाहनtwo wheelerटू व्हीलरAccidentअपघात