शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

वाहन चालकांनो...15 लाखांचा अपघात विमाही बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 16:07 IST

अपघातामध्ये मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना पैशांची मदत मिळणार असली तरीही कारचा विमाही महागणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नव्या वाहनांना खरेदीवेळीच तीन वर्षांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स बंधनकारक केलेला असताना आता मालक-चालकाचा 15 लाखांचा अपघात विमा काढणेही बंधनकारक केले आहे. यासाठी वार्षिक 750 रुपये आकारले जाणार आहेत. यामुळे अपघातामध्ये मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना पैशांची मदत मिळणार असली तरीही कारचा विमाही महागणार आहे.

विमा क्षेत्रावर नियंत्रण ठेवणारी संस्था इरडाने गुरुवारी हा निर्णय घेतला आहे. यानुसार नव्या आणि जुन्या अशा दोन्ही वाहनांच्या चालकांचा आणि मालकांना 15 लाखांचा अपघात विमा काढावा लागणार आहे. यासाठी प्रारंभी 750 रुपये ठरविण्यात आले आहेत. इरडा काही काळाने यामध्ये वाढही करू शकते. 

इरडाने सर्व विमा कंपन्यांना याबाबतचे आदेश दिले असून त्यांच्या पॉलिसींमध्ये तशी तरतूद करण्यास सांगितले आहे. अधासूचना काढल्यानंतर लगेचच किंवा 25 ऑक्टोबरपर्यंत अपघात विमा लागू करणे कंपन्यांना बंधनकारक राहणार आहे. 

मद्रास उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच वाहन चालकांचा अपघात विमा 1 लाखांवरून 15 लाख करण्याच्या सुचना केल्या होत्या. इरडाच्या या निर्णयावर कंपन्यांनी असा विमा देण्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यासाठी वेगळी रक्कम आकारण्याची मागणी केली आहे. 

सध्या भारतात दुचाकी चालविणाऱ्यांसाठी 1 लाख आणि चार चाकी चालविणाऱ्यांसाठी 2 लाखांचा अपघात विमा असतो. विमा कंपन्या चालकाला जादाचा अपघात विमा देण्यासाठी मोठी रक्कम आकारतात. इरडाच्या या निर्णयामुळे वाहन चालकांचा फायदाच होणार आहे. 

टॅग्स :carकारAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा