शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

फोर्ड फायद्यात येऊनही भारत का सोडतेय? महिंद्रासोबत केला करार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 5:36 PM

फोर्ड इंडिया ही कंपनी भारतात 20 वर्षांनी फायद्यात आली होती.

मुंबई : फोर्ड ही जगातील आघाडीच्या वाहन कंपन्यांमध्ये असलेली अमेरिकेची मोठी कंपनी भारतात गेल्या 20 वर्षांपासून जम बसवत होती. एवढी वर्षे झगडून ही कंपनी पहिल्यांदा फायद्यात आली आहे. मात्र, सध्याच्या वाहन उद्योगासमोरील अडचणी, मंदी आणि इलेक्ट्रीक वाहनांसाठी आवश्यक असलेले बदल यामुळे कंपनीने महिंद्रा आणि महिंद्रासोबत करार केला आहे. याची घोषणा पुढील आठवड्यात होईल. यामुळे फोर्ड भारत सोडणार असल्याचे वृत्त कमालीचे व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली. 

फोर्ड इंडिया ही कंपनी भारतात 20 वर्षांनी फायद्यात आली होती. तरीही कंपनीने महिंद्रासोबत सहकार्य करार केला आहे. यामुळे दोन वर्षांपूर्वी जशी आणखी एक अमेरिकन कंपनी जनरल मोटर्सने भारतातून गाशा गुंडाळला तसाच फोर्डही गुंडाळणार असे वृत्त पसरले आहे. फोर्ड इंडियाच्या वाहनांची विक्री घसरत चालली आहे. यामुळे फोर्डला भारतात खूप संघर्ष करावा लागत आहे. ऑगस्टमध्ये कंपनीच्या कारची विक्री 31.4 टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने 8042 वाहने विकली होती. यंदा हा आकडा 5517 वर आला आहे. 

काही वृत्तसंस्थांनी फोर्ड भारत सोडणार असल्याचे वृत्त दिले होते. महिंद्राला फोर्ड भारतातील व्यवसाय भागीदारीमध्ये विकणार आहे. यामध्ये 51 टक्के महिंद्राची मालकी असणार आहे. फोर्डने गेल्या 20 वर्षांत 2 अब्ज डॉलर्स भारतात गुंतविले आहेत. तसेच कंपनीचे सानंद आणि चेन्नईमध्ये दोन प्रकल्प आहेत. सानंदच्या प्रकल्प 2015 मध्ये उभारण्यात आला असून यामध्ये वर्षाला 2,40,000 फिगो, अस्पायर या कार बनविण्याची आणि 2,70,000 इंजिनांचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. या कार 30 देशांमध्ये निर्यात केल्या जातात. तसेच चेन्नईच्या प्रकल्पामध्ये इकोस्पोर्ट आणि एन्डोव्हर या 2 लाख कार आणि 3.4 लाख इंजिने बनविण्याची क्षमता आहे. भारतीय बाजाराची गरज पाहता दोन प्रकल्प कंपनीला डोईजड ठरत आहेत.

या वृत्ताची खातरजमा केली असता फोर्ड भारतीय बाजारातून बाहेर पडण्याच्या विचारात नसल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सानंदचा प्रकल्पही बंद करण्याचा विचार नसून जगभरातील 30 देशांना मेक इन इंडियाच्या कार निर्यात केल्या जाणार आहेत. फोर्डचे भारतातील ग्राहक पाहता कंपनी त्यांना सेवा देत राहील, असे सांगितले. 

टॅग्स :Fordफोर्डMahindraमहिंद्रा