शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

फोर्ड फायद्यात येऊनही भारत का सोडतेय? महिंद्रासोबत केला करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 17:39 IST

फोर्ड इंडिया ही कंपनी भारतात 20 वर्षांनी फायद्यात आली होती.

मुंबई : फोर्ड ही जगातील आघाडीच्या वाहन कंपन्यांमध्ये असलेली अमेरिकेची मोठी कंपनी भारतात गेल्या 20 वर्षांपासून जम बसवत होती. एवढी वर्षे झगडून ही कंपनी पहिल्यांदा फायद्यात आली आहे. मात्र, सध्याच्या वाहन उद्योगासमोरील अडचणी, मंदी आणि इलेक्ट्रीक वाहनांसाठी आवश्यक असलेले बदल यामुळे कंपनीने महिंद्रा आणि महिंद्रासोबत करार केला आहे. याची घोषणा पुढील आठवड्यात होईल. यामुळे फोर्ड भारत सोडणार असल्याचे वृत्त कमालीचे व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली. 

फोर्ड इंडिया ही कंपनी भारतात 20 वर्षांनी फायद्यात आली होती. तरीही कंपनीने महिंद्रासोबत सहकार्य करार केला आहे. यामुळे दोन वर्षांपूर्वी जशी आणखी एक अमेरिकन कंपनी जनरल मोटर्सने भारतातून गाशा गुंडाळला तसाच फोर्डही गुंडाळणार असे वृत्त पसरले आहे. फोर्ड इंडियाच्या वाहनांची विक्री घसरत चालली आहे. यामुळे फोर्डला भारतात खूप संघर्ष करावा लागत आहे. ऑगस्टमध्ये कंपनीच्या कारची विक्री 31.4 टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने 8042 वाहने विकली होती. यंदा हा आकडा 5517 वर आला आहे. 

काही वृत्तसंस्थांनी फोर्ड भारत सोडणार असल्याचे वृत्त दिले होते. महिंद्राला फोर्ड भारतातील व्यवसाय भागीदारीमध्ये विकणार आहे. यामध्ये 51 टक्के महिंद्राची मालकी असणार आहे. फोर्डने गेल्या 20 वर्षांत 2 अब्ज डॉलर्स भारतात गुंतविले आहेत. तसेच कंपनीचे सानंद आणि चेन्नईमध्ये दोन प्रकल्प आहेत. सानंदच्या प्रकल्प 2015 मध्ये उभारण्यात आला असून यामध्ये वर्षाला 2,40,000 फिगो, अस्पायर या कार बनविण्याची आणि 2,70,000 इंजिनांचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. या कार 30 देशांमध्ये निर्यात केल्या जातात. तसेच चेन्नईच्या प्रकल्पामध्ये इकोस्पोर्ट आणि एन्डोव्हर या 2 लाख कार आणि 3.4 लाख इंजिने बनविण्याची क्षमता आहे. भारतीय बाजाराची गरज पाहता दोन प्रकल्प कंपनीला डोईजड ठरत आहेत.

या वृत्ताची खातरजमा केली असता फोर्ड भारतीय बाजारातून बाहेर पडण्याच्या विचारात नसल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सानंदचा प्रकल्पही बंद करण्याचा विचार नसून जगभरातील 30 देशांना मेक इन इंडियाच्या कार निर्यात केल्या जाणार आहेत. फोर्डचे भारतातील ग्राहक पाहता कंपनी त्यांना सेवा देत राहील, असे सांगितले. 

टॅग्स :Fordफोर्डMahindraमहिंद्रा