शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

फोर्ड फायद्यात येऊनही भारत का सोडतेय? महिंद्रासोबत केला करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 17:39 IST

फोर्ड इंडिया ही कंपनी भारतात 20 वर्षांनी फायद्यात आली होती.

मुंबई : फोर्ड ही जगातील आघाडीच्या वाहन कंपन्यांमध्ये असलेली अमेरिकेची मोठी कंपनी भारतात गेल्या 20 वर्षांपासून जम बसवत होती. एवढी वर्षे झगडून ही कंपनी पहिल्यांदा फायद्यात आली आहे. मात्र, सध्याच्या वाहन उद्योगासमोरील अडचणी, मंदी आणि इलेक्ट्रीक वाहनांसाठी आवश्यक असलेले बदल यामुळे कंपनीने महिंद्रा आणि महिंद्रासोबत करार केला आहे. याची घोषणा पुढील आठवड्यात होईल. यामुळे फोर्ड भारत सोडणार असल्याचे वृत्त कमालीचे व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली. 

फोर्ड इंडिया ही कंपनी भारतात 20 वर्षांनी फायद्यात आली होती. तरीही कंपनीने महिंद्रासोबत सहकार्य करार केला आहे. यामुळे दोन वर्षांपूर्वी जशी आणखी एक अमेरिकन कंपनी जनरल मोटर्सने भारतातून गाशा गुंडाळला तसाच फोर्डही गुंडाळणार असे वृत्त पसरले आहे. फोर्ड इंडियाच्या वाहनांची विक्री घसरत चालली आहे. यामुळे फोर्डला भारतात खूप संघर्ष करावा लागत आहे. ऑगस्टमध्ये कंपनीच्या कारची विक्री 31.4 टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने 8042 वाहने विकली होती. यंदा हा आकडा 5517 वर आला आहे. 

काही वृत्तसंस्थांनी फोर्ड भारत सोडणार असल्याचे वृत्त दिले होते. महिंद्राला फोर्ड भारतातील व्यवसाय भागीदारीमध्ये विकणार आहे. यामध्ये 51 टक्के महिंद्राची मालकी असणार आहे. फोर्डने गेल्या 20 वर्षांत 2 अब्ज डॉलर्स भारतात गुंतविले आहेत. तसेच कंपनीचे सानंद आणि चेन्नईमध्ये दोन प्रकल्प आहेत. सानंदच्या प्रकल्प 2015 मध्ये उभारण्यात आला असून यामध्ये वर्षाला 2,40,000 फिगो, अस्पायर या कार बनविण्याची आणि 2,70,000 इंजिनांचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. या कार 30 देशांमध्ये निर्यात केल्या जातात. तसेच चेन्नईच्या प्रकल्पामध्ये इकोस्पोर्ट आणि एन्डोव्हर या 2 लाख कार आणि 3.4 लाख इंजिने बनविण्याची क्षमता आहे. भारतीय बाजाराची गरज पाहता दोन प्रकल्प कंपनीला डोईजड ठरत आहेत.

या वृत्ताची खातरजमा केली असता फोर्ड भारतीय बाजारातून बाहेर पडण्याच्या विचारात नसल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सानंदचा प्रकल्पही बंद करण्याचा विचार नसून जगभरातील 30 देशांना मेक इन इंडियाच्या कार निर्यात केल्या जाणार आहेत. फोर्डचे भारतातील ग्राहक पाहता कंपनी त्यांना सेवा देत राहील, असे सांगितले. 

टॅग्स :Fordफोर्डMahindraमहिंद्रा