शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त, बॅटरीशिवाय घेता येणार स्कूटर; धोरणाचा मसुदा जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 14:30 IST

राज्यांच्या राजधानी, केंद्रशासित प्रदेश मुख्यालयांसह पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश केला जाईल, असे आयोगाने धोरणाच्या मसुद्यात म्हटले आहे...

नवी दिल्ली : नीती आयोगाने गुरुवारी बॅटरी स्वॅप (अदलाबदली) धोरणाचा मसुदा जारी केला. या अंतर्गत, पहिल्या टप्प्यात ४० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरांना बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क विकसित करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.राज्यांच्या राजधानी, केंद्रशासित प्रदेश मुख्यालयांसह पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश केला जाईल, असे आयोगाने धोरणाच्या मसुद्यात म्हटले आहे. चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी शहरी भागात जागेची कमतरता लक्षात घेता, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्र बॅटरी स्वॅप धोरण आणणार असल्याची घोषणा केली होती. या संदर्भात एक मजबूत आणि सर्वसमावेशक धोरण आराखडा तयार करण्यासाठी नीती आयोगाने फेब्रुवारी २०२२ मध्ये चर्चा सुरू केली होती. मसुदा सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावर आयोगाने लोकांना ५ जूनपर्यंत सूचना देण्यास सांगितले आहे.

बॅटरी स्वॅपमुळे फायदा- बॅटरी स्वॅप व्यवस्था असलेली वाहने बॅटरीशिवाय विकली जातील. इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांसाठी वाहनाची किंमत कमी होईल. - मसुद्याच्या धोरणानुसार, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही ठिकाणी बॅटरी स्वॅप स्टेशन स्थापित करण्यास मुक्त आहे; परंतु यासाठी विहित तांत्रिक, सुरक्षा आणि मानकांचे पालन करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कारcarकार