शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त, बॅटरीशिवाय घेता येणार स्कूटर; धोरणाचा मसुदा जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 14:30 IST

राज्यांच्या राजधानी, केंद्रशासित प्रदेश मुख्यालयांसह पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश केला जाईल, असे आयोगाने धोरणाच्या मसुद्यात म्हटले आहे...

नवी दिल्ली : नीती आयोगाने गुरुवारी बॅटरी स्वॅप (अदलाबदली) धोरणाचा मसुदा जारी केला. या अंतर्गत, पहिल्या टप्प्यात ४० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरांना बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क विकसित करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.राज्यांच्या राजधानी, केंद्रशासित प्रदेश मुख्यालयांसह पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश केला जाईल, असे आयोगाने धोरणाच्या मसुद्यात म्हटले आहे. चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी शहरी भागात जागेची कमतरता लक्षात घेता, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्र बॅटरी स्वॅप धोरण आणणार असल्याची घोषणा केली होती. या संदर्भात एक मजबूत आणि सर्वसमावेशक धोरण आराखडा तयार करण्यासाठी नीती आयोगाने फेब्रुवारी २०२२ मध्ये चर्चा सुरू केली होती. मसुदा सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावर आयोगाने लोकांना ५ जूनपर्यंत सूचना देण्यास सांगितले आहे.

बॅटरी स्वॅपमुळे फायदा- बॅटरी स्वॅप व्यवस्था असलेली वाहने बॅटरीशिवाय विकली जातील. इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांसाठी वाहनाची किंमत कमी होईल. - मसुद्याच्या धोरणानुसार, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही ठिकाणी बॅटरी स्वॅप स्टेशन स्थापित करण्यास मुक्त आहे; परंतु यासाठी विहित तांत्रिक, सुरक्षा आणि मानकांचे पालन करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कारcarकार