शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खेलो इंडियातील गोल्डन गर्ल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 07:59 IST

वय वर्षे अवघी १५. पूर्व महाराष्ट्रातील आदिवासी भागातील मुलगी. वडील शेतमजूर. खेळासाठी वातारण तर नाहीच. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत महाराष्ट्राच्या ताई बामणे या मुलीने खेलो इंडियात ८०० मीटर मुलींच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले. आज हीच मुलगी महाराष्ट्राची शान बनली आहे.

- सचिन कोरडेवय वर्षे अवघी १५. पूर्व महाराष्ट्रातील आदिवासी भागातील मुलगी. वडील शेतमजूर. खेळासाठी वातारण तर नाहीच. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत महाराष्ट्राच्या ताई बामणे या मुलीने खेलो इंडियात ८०० मीटर मुलींच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले. आज हीच मुलगी महाराष्ट्राची शान बनली आहे. आता तिच्याकडे आॅलिम्पिकमधील भवितव्य म्हणून पाहिले जात आहे. ताई हिच्या सुसाट धावण्याचा गुण टिपला तो प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी.  विजेंदर सिंग जे गेल्या शुक्रवारी (दि. २) जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आत्मविश्वास आणि थोडसे बिथरलेले वाटत होते. ताई बामणे धावत होती. पोडियमपासून दूर उभे असलेले विजेंदर मात्र कुणाशी बोलत नव्हते. तिची शर्यत पूर्ण होईपर्यंत विजेंदरच्या नजरा केवळ ताईवरच होत्या. चेहºयावर खेळाडूंना उत्साहित करणा-या भावनाही ते आणत नव्हते. ताई जिंकणार असे त्यांना  वाटत होते. पण जिंकेपर्यंत त्याची देहबोली अत्यंत शांत होती. केरळची प्रिन्सीला डॅनियल आणि सँड्रा एएस या दोन्ही धावपटूंचे आव्हान ताईपुढे होते. ताईच्या तुलनेत या दोघींची देहरचना धष्टपुष्ट होती. त्यामुळे ती स्वत:ला कशी सिद्ध करणार, याची चिंताही त्यांना वाटत होती. ताई मात्र आत्मविश्वासाने ट्रॅकवर उतरली होती. ती बिनधास्त धावली. श्वास टिकवून ठेवत शेवटच्या क्षणी तिने सुवर्ण क्षणावर पाय ठेवला. तेव्हा कुठे विजेंदरच्या चेह-यावर हास्य फुलले. ८०० मीटरच्या शर्यतीसाठी २:१३:३७ अशी वेळ देत ताईने महाराष्ट्राला खेलो इंडियाया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले. 

गेल्या अर्धदशकापासून विीजेंदर सिंग हे देशातील टॅलेंटचा शोेध घेत आहेत. देशात होणा-या मॅरेथॉन स्पर्धेवर ते नजर ठेऊन असायचे. त्यांनी कविता राऊत, संजीवनी जाधव, रणजित पटेल, किसन तडवी अशा खेळाडूंना मॅरेथॉन स्पर्धेतून निवडले आणि त्यांना मार्गदर्शन करीत आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवले. ग्रासरूट पातळीवर खरे टॅलेंट असून त्याचा शोध घेण्याची गरज आहे, असे विजेंदर सांगतात. जेव्हा कविताला अर्जुन पुरस्कार मिळाला तेव्हापासून मला लोक द्रोणाचार्य संबोधतात. मी कधीही पुरस्काराचा विचार केला नाही पण जेव्हा माझे चॅम्पियन खेळाडू ट्रॅकवर धावतात तेव्हा खूप अभिमान वाटतो. विजेंदर हे मुझफ्फनगर (उत्तरप्रदेश) येथील असून ते सध्या नाशिक येथे राहतात.ते म्हणतात, नाशिक हे समुद्रसपाटीपासून ७०० मीटर उंच आहे. अशा वातावरण आणि स्थितीचा फायदा लांब पल्ल्याच्या धावपटूंना होतो. अंत्यत हालाखीच्या परिस्थितीतील धावपटूंना मात्र खूप संघर्ष करावा लागतो. काही मुली आजही रोज २० ते ३० लीटर पाणी डोक्यावर घेऊन चालतात. यातून १५ किमी अंतरराच्या चांगल्या धावपटू तयार होतात. मी यातून सकारात्मकपणे पाहतो आणि म्हणूनच आज माझ्याकडे महाराष्ट्रातील दुर्गम भागातील २० खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. आम्ही याकडे व्यावसायिकांचे लक्ष वेधले. काही डॉक्टरांची आम्हाला मदत मिळत आहेत. 

क्रॉस कंट्रीतून ताईचा शोध..

विजेंदर यांचीच शिष्य असलेल्या नाशिकच्या कविता राऊत हिने क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित केली होती. त्यात दलपतपूर येथील ताई हिने बाजी मारली. शाळेतील स्पर्धेत तार्ईच पुढे असायची. पण मोठ्या पातळीवरील ती पहिल्यांदाच धावली होती.  त्यामुळे तिच्या शारीरिक शिक्षकांनी तिला नाशिक येथे प्रशिक्षणासाठी विजेंदर यांच्याकडे पाठवले. ताई ही कोणत्या शर्यतीत फिट बसेल हे आम्हाला आजही माहीत नाही. पण तिच्यातील आत्मविश्वास इतका प्रचंड आहे की ती स्पर्धा नक्की जिंकेल असे नेहमी वाटते. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर या मुलीने ८०० मीटरची शर्यत जिंकून ते सिद्ध करुन दाखवले. भविष्यात ही मुलगी आॅलिम्पिक स्पर्धेत चमक दाखवेल, असा विश्वास विजेंदर व्यक्त करतात. 

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र