शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

शाळेला कुलूप, शिक्षक मिळेपर्यंत उघडू देणार नाही वर्ग; संतप्त ग्रामस्थांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 12:41 IST

दहावीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

अमरावती : जिल्ह्यातील नया अकोला येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक नसल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. अनेक वेळा निवेदन देऊनही शिक्षक न मिळाल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी शाळेला कुलूप ठोकून रोष व्यक्त केला. जोपर्यंत शिक्षक मिळणार नाहीत, तोपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

शैक्षणिक सत्र २०२३-२४ सुरू होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. अजूनही जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षक दिलेले नाहीत. असाच प्रकार नया अकोला येथील जिल्हा परिषद शाळेबाबत झाला. येथे दहावी व नववीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नाहीत. सरपंच व स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा प्रशासनाच्या निदर्शनास हे आणून दिले. परंतु, शाळेला शिक्षक मिळाले नाहीत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी या शाळेला कुलूप ठोकून शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविला. शाळेत शिक्षक येत नाही, तोपर्यंत विद्यार्थीही शाळेत बसणार नसल्याची भूमिकाच गावकऱ्यांनी घेतली आहे.

गावातील काही पालकांनी आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना खासगी शिकवणी वर्ग लावून दिले आहेत. परंतु, प्रत्येकच विषयासाठी शिकवणी वर्ग लावणे हे पालकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे अशा या परिस्थितीमध्ये नया अकोला येथील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. जर शासन आणइ प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे.

मेळघाटातील दोन शिक्षकांची बदली नया अकोला येथे झाली आहे. परंतु, ते रीलिव्ह झालेले नाहीत. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन दोन ते तीन दिवसात नया अकोला येथील शाळेसंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल.

- बुद्धभूषण सोनोने, शिक्षणाधिकारी

शिक्षक मिळावे यासाठी आम्ही शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु, दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्यार्थी शिक्षकांविना चाचपडत आहेत. त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटली. हे कुलूप शिक्षक मिळाल्यानंतरच उघडेल.

- सुजाता तिडके, सरपंच

मी दहाव्या वर्गात शिकतो. आमच्या बोर्डाच्या परीक्षेला फक्त पाच महिनेच उरले आहेत. परंतु, आम्हाला एकही शिक्षक नाही. शाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा कालावधी उलटून गेला आहे. आमच्या भविष्याचा विचार शासनाने तातडीने करावा.

- ओम भुरे, विद्यार्थी

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळाSchoolशाळाAmravatiअमरावती