शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election : 'फडणवीसांच्या मेहनतीचा अन् उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा निकाल दिसला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 13:29 IST

कौर यांनीही फडणवीसांची री ओढली, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाचं कौतुकही केलंय. पोटनिवडणुकीतील निकालातून हे स्पष्ट होत आहे की, महाराष्ट्राच्या जनतेनं कोणाला साथ दिली अन् कोणाला नाही

ठळक मुद्देमुख्यमंत्री जरी महाराष्ट्राचे असले, तरी निकाल पाहिल्यास भाजपच्या बाजूने लागल्याचे दिसून येते. कारण, शिवसेनेनं भाजपा युतीसोबत विश्वासघात करुन खुर्चीच्या लालसेपोटी तिघडी सरकार बनवले.

मुंबई - विदर्भातील 5 जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील पोटनिवडणुकींच्या निकालाबाबत भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तसेच, या निकालातून भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचं सिद्ध झालं असून सत्तेतील शिवसेना चौथ्या नंबरवर फेकल्याचंही त्यांनी सांगितलं. आता, अमरावतीच्या खासदार नवनीत कौर यांनीही हा भाजपचाच विजय असल्याचे म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

पोटनिवडणुकांमधील 225 पैकी 55 जागांवर भाजपला विजय मिळाला आहे, म्हणजेच 25 टक्के जागा भाजपाने जिंकल्या आहेत. त्याबद्दल, जनतेचे आभार मानतो, असे फडणवीस यांनी म्हटल होते. आता, कौर यांनीही फडणवीसांची री ओढली, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाचं कौतुकही केलंय. पोटनिवडणुकीतील निकालातून हे स्पष्ट होत आहे की, महाराष्ट्राच्या जनतेनं कोणाला साथ दिली अन् कोणाला नाही. मुख्यमंत्री जरी महाराष्ट्राचे असले, तरी निकाल पाहिल्यास भाजपच्या बाजूने लागल्याचे दिसून येते. कारण, शिवसेनेनं भाजपा युतीसोबत विश्वासघात करुन खुर्चीच्या लालसेपोटी तिघडी सरकार बनवले. महाराष्ट्राच्या जनतेनं आज त्यालाच उत्तर दिलंय, असे म्हणत खासदार नवनीत कौर यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत. 

फडणवीस हे माजी मुख्यमंत्री असतानाही, मुख्यमंत्र्यांच्या तिपटीने फिरत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जातात, लोकांचे दु:ख ऐकून घेतात, समजून घेतात, त्यावर मार्ग काढायचा प्रयत्न करतात. म्हणून, महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना साध दिलीय. जनता जी दुखावली होती, त्यांनी आज त्यांची भूमिका निकालातून मांडलीय. फडणवीसांच्या मेहनतीचा अन् उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा हा निकाल दिसल्याची घणाघाती टीकाही कौर यांनी केली आहे. 

दरम्यान, सहा जिल्हा परिषदांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारली आहे. पण, स्वंतत्रपणे विचार केल्यास भाजपला सर्वाधिक जागा जिंकता आल्या आहेत.  

झेडपीत भाजपला २३ जागा

जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीपैकी सर्व ८५ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये, ४६ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या ८५ पैकी काँग्रेसने १७, राष्ट्रवादीने १७ आणि शिवसेनेने १२ अशा मिळून महाविकास आघाडीने आतापर्यंत ४६ जागा जिंकल्या. तर भाजपाने २३ जागा जिंकल्या आहेत. उर्वरित १६ जागा इतर पक्षांच्या खात्यात गेल्या आहेत.  

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसZP Electionजिल्हा परिषदBJPभाजपा