शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

...तर शांतीलाल वाचला असता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:20 IST

एएसआय शांतीलाल पटेल यांची हत्या होण्यापूर्वी गस्तीदरम्यान संशयास्पद स्थितीत आढळलेल्या आरोपींना संबंधितांनी पोलीस ठाण्यात दिवस उजाडेपर्यंत थांबवले असते, तर पटेल यांचे प्राण वाचले असते. पण, तसे झाले नाही. यामुळे पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : एएसआय शांतीलाल पटेल यांची हत्या होण्यापूर्वी गस्तीदरम्यान संशयास्पद स्थितीत आढळलेल्या आरोपींना संबंधितांनी पोलीस ठाण्यात दिवस उजाडेपर्यंत थांबवले असते, तर पटेल यांचे प्राण वाचले असते. पण, तसे झाले नाही. यामुळे पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.रात्र गस्तीदरम्यान पोलिसांना कुणी संशयास्पद आढळले, तर त्याची चौकशी करण्याचा, सर्वांगीण माहिती घेण्याचा व यात समाधान झाले, तर सोडण्याचा आणि समाधान न झाल्यास त्याला पोलीस ठाण्यात नेऊन डिटेन करण्याचा प्रघात अनेक वर्षांपासून पोलीस विभागात आहे. शांतीलाल पटेल यांच्या हत्याप्रकरणात हा प्रघातच दुर्लक्षित केला गेला. शांतीलालची हत्या करणारे आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. यातील दोघांवर अचलपूर पोलीस ठाण्यात, तर एकावर जिल्ह्याबाहेर गुन्हे दाखल आहेत. अचलपूर व परतवाडा पोलीस ठाण्यांमध्ये केवळ पाच किलोमिटरचे अंतर आहे. या दोन्ही पोलीस ठाण्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांची माहिती असायला हवी. या माहितीचे आपसात आदानप्रदानही व्हायला हवे.परतवाडा पोलीस ठाण्यात मागील वर्षी २८३ गुन्हे घडलेत. यात ३७ घरफोड्या आणि नऊ जबरी चोऱ्या आहेत, तर यावर्षी जानेवारी ते आॅगस्ट दरम्यान १८४ गुन्हे नोंदले गेले आहेत. यात जबरी चोºया नऊ आणि घरफोड्या २४ आहेत. चोरट्यांची हिंमत वाढली आहे. नागरिक हवालदिल झाले आहेत. जुळ्या नगरीत चिडीमारीचे प्रमाण वाढले आहे. मुलींची टिंगल उडवित आहेत. या चिडीमारांमुळे शिक्षक, विद्यार्थी व पालक त्रस्त झाले आहेत. यावर पोलीस कर्मचाऱ्यांची संख्याच कमी आहे; काय करावे, असे उत्तर पुढे केले जाते. उत्तर काहीही असो, पण दररोज घडणाऱ्या घटनांकडे बघितल्यास जुळ्या नगरीत पोलिसांचा वचक राहिलेला नाही. पोलीसच सुरक्षित नाही मग नागरिकांचे काय?विशेष पोलीस महानिरीक्षकांची एएसआय पटेल यांच्या घरी भेटतिन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडीपरतवाडा : शांतीलाल पटेल हत्याप्रकरणातील तिन्ही आरोपींना अचलपूर न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी पटेल कुटुंबीयांची भेट घेतली.एएसआय शांतीलाल पटेल (५५, रा. गोवर्धन विहार, परतवाडा) यांची हत्या करणारे केदार घनश्याम चरपटे, नितीन खोलापुरे, नयन मंडले या तिघांना बुधवारी दुपारी अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयात कडक पोलीस बंदोबस्तात बुधवारी दुपारी २.३० वाजता हजर करण्यात आले. न्यायालय परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. आरोपींनी वापरलेल्या लोखंडी सळाखीची जप्ती पोलीस करणार आहेत. दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी बुधवारी येथे येऊन पटेल कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर विश्रामगृहात ठाणेदारांसह पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. पर्यावरण विभागाचे योगेश खानझोडे व माजी आमदार केवलराम काळे यांनीही तरवडे भेट घेऊन परिसरातील समस्यांवर चर्चा केली.आमचे पोलीस पती जिवंत परत येण्याची हमी घ्याएसडीओ पुढे पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नींचा टाहोपरतवाडा : शांतीलाल पटेल यांच्या हल्लेखोरांना फाशी झालीच पाहिजे. आमचे पोलीस पती सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस तैनात असतात. ते जिवंत घरी परत येण्याची हमी घ्या, असा आक्रोश पोलीस कर्मचाºयांच्या पत्नींनी अचलपूर उपविभागीय अधिकाºयांपुढे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता केला. सर्व पोलीस कुटुंब दहशतीखाली असल्याची जाणीव त्यांना करून देण्यात आला.पोलीस कर्मचाºयांच्या सौभाग्यवतींचे म्हणणे एसडीओ व्यंकट राठोड यांनी निवांतपणे ऐकून घेतले. गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाईबाबत शासनाला तसा अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संगीता दहीकर, मीना भुसूम, मीरा धांडे, मीरा सलामे, कलावती चिमोटे, कविता तोटे, गंगा कोल्हेकर, सोनिया मावस्कर, कमला बेठेकर, मीना बेलसरे, प्रमिला कासदेकर, शशी मावस्कर, इंदू तोटे, संतुलाल बेठे, महादेव कासदेकर, अशोक अखंडे, रामप्रसाद चिमोटे, दादाराव पळसकर, दाजी धुर्वे, शंकर बेठे, विक्की मवासी, रमेश मवासी आदी पोलीस कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनतर्फे निवेदन देण्यात आले.गुंडांचा तडीपारीचा प्रस्ताव तसेच पटेल हत्याप्रकरणातील आरोपींवर कठोर शासनाचा अहवाल पाठविला जाणार असल्याचे एसडीओ राठोड म्हणाले.