शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

...तर शांतीलाल वाचला असता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:20 IST

एएसआय शांतीलाल पटेल यांची हत्या होण्यापूर्वी गस्तीदरम्यान संशयास्पद स्थितीत आढळलेल्या आरोपींना संबंधितांनी पोलीस ठाण्यात दिवस उजाडेपर्यंत थांबवले असते, तर पटेल यांचे प्राण वाचले असते. पण, तसे झाले नाही. यामुळे पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : एएसआय शांतीलाल पटेल यांची हत्या होण्यापूर्वी गस्तीदरम्यान संशयास्पद स्थितीत आढळलेल्या आरोपींना संबंधितांनी पोलीस ठाण्यात दिवस उजाडेपर्यंत थांबवले असते, तर पटेल यांचे प्राण वाचले असते. पण, तसे झाले नाही. यामुळे पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.रात्र गस्तीदरम्यान पोलिसांना कुणी संशयास्पद आढळले, तर त्याची चौकशी करण्याचा, सर्वांगीण माहिती घेण्याचा व यात समाधान झाले, तर सोडण्याचा आणि समाधान न झाल्यास त्याला पोलीस ठाण्यात नेऊन डिटेन करण्याचा प्रघात अनेक वर्षांपासून पोलीस विभागात आहे. शांतीलाल पटेल यांच्या हत्याप्रकरणात हा प्रघातच दुर्लक्षित केला गेला. शांतीलालची हत्या करणारे आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. यातील दोघांवर अचलपूर पोलीस ठाण्यात, तर एकावर जिल्ह्याबाहेर गुन्हे दाखल आहेत. अचलपूर व परतवाडा पोलीस ठाण्यांमध्ये केवळ पाच किलोमिटरचे अंतर आहे. या दोन्ही पोलीस ठाण्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांची माहिती असायला हवी. या माहितीचे आपसात आदानप्रदानही व्हायला हवे.परतवाडा पोलीस ठाण्यात मागील वर्षी २८३ गुन्हे घडलेत. यात ३७ घरफोड्या आणि नऊ जबरी चोऱ्या आहेत, तर यावर्षी जानेवारी ते आॅगस्ट दरम्यान १८४ गुन्हे नोंदले गेले आहेत. यात जबरी चोºया नऊ आणि घरफोड्या २४ आहेत. चोरट्यांची हिंमत वाढली आहे. नागरिक हवालदिल झाले आहेत. जुळ्या नगरीत चिडीमारीचे प्रमाण वाढले आहे. मुलींची टिंगल उडवित आहेत. या चिडीमारांमुळे शिक्षक, विद्यार्थी व पालक त्रस्त झाले आहेत. यावर पोलीस कर्मचाऱ्यांची संख्याच कमी आहे; काय करावे, असे उत्तर पुढे केले जाते. उत्तर काहीही असो, पण दररोज घडणाऱ्या घटनांकडे बघितल्यास जुळ्या नगरीत पोलिसांचा वचक राहिलेला नाही. पोलीसच सुरक्षित नाही मग नागरिकांचे काय?विशेष पोलीस महानिरीक्षकांची एएसआय पटेल यांच्या घरी भेटतिन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडीपरतवाडा : शांतीलाल पटेल हत्याप्रकरणातील तिन्ही आरोपींना अचलपूर न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी पटेल कुटुंबीयांची भेट घेतली.एएसआय शांतीलाल पटेल (५५, रा. गोवर्धन विहार, परतवाडा) यांची हत्या करणारे केदार घनश्याम चरपटे, नितीन खोलापुरे, नयन मंडले या तिघांना बुधवारी दुपारी अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयात कडक पोलीस बंदोबस्तात बुधवारी दुपारी २.३० वाजता हजर करण्यात आले. न्यायालय परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. आरोपींनी वापरलेल्या लोखंडी सळाखीची जप्ती पोलीस करणार आहेत. दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी बुधवारी येथे येऊन पटेल कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर विश्रामगृहात ठाणेदारांसह पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. पर्यावरण विभागाचे योगेश खानझोडे व माजी आमदार केवलराम काळे यांनीही तरवडे भेट घेऊन परिसरातील समस्यांवर चर्चा केली.आमचे पोलीस पती जिवंत परत येण्याची हमी घ्याएसडीओ पुढे पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नींचा टाहोपरतवाडा : शांतीलाल पटेल यांच्या हल्लेखोरांना फाशी झालीच पाहिजे. आमचे पोलीस पती सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस तैनात असतात. ते जिवंत घरी परत येण्याची हमी घ्या, असा आक्रोश पोलीस कर्मचाºयांच्या पत्नींनी अचलपूर उपविभागीय अधिकाºयांपुढे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता केला. सर्व पोलीस कुटुंब दहशतीखाली असल्याची जाणीव त्यांना करून देण्यात आला.पोलीस कर्मचाºयांच्या सौभाग्यवतींचे म्हणणे एसडीओ व्यंकट राठोड यांनी निवांतपणे ऐकून घेतले. गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाईबाबत शासनाला तसा अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संगीता दहीकर, मीना भुसूम, मीरा धांडे, मीरा सलामे, कलावती चिमोटे, कविता तोटे, गंगा कोल्हेकर, सोनिया मावस्कर, कमला बेठेकर, मीना बेलसरे, प्रमिला कासदेकर, शशी मावस्कर, इंदू तोटे, संतुलाल बेठे, महादेव कासदेकर, अशोक अखंडे, रामप्रसाद चिमोटे, दादाराव पळसकर, दाजी धुर्वे, शंकर बेठे, विक्की मवासी, रमेश मवासी आदी पोलीस कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनतर्फे निवेदन देण्यात आले.गुंडांचा तडीपारीचा प्रस्ताव तसेच पटेल हत्याप्रकरणातील आरोपींवर कठोर शासनाचा अहवाल पाठविला जाणार असल्याचे एसडीओ राठोड म्हणाले.