शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप का नाही? आदिवासी संघटनांचा राज्य सरकारला सवाल

By गणेश वासनिक | Updated: April 14, 2023 13:48 IST

सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर टिआरटिआयने पुढाकार घ्यावा

अमरावती : सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर टिआरटिआय पुढाकार घेऊन आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट अभिछात्रवृत्ती लागू करतील का? असा सवाल आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे केला आहे.

सद्य:स्थितीत एप्रिल २०२१ नंतर नोंदणी केलेले व त्यांच्या कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी असणाऱ्या आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना अभिछात्रवृत्तीसाठी पात्र ठरविण्याचा निर्णय तीन महिन्यापूर्वी शासनाने घेतला आहे. मात्र छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे (सारथी) यांनी मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा - कुणबी प्रवर्गातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती आणि गुणवत्ताधारक पी. एचडी करणाऱ्या उमेदवारांसाठी सारथी मार्फत छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अभिछात्रवृत्ती सरसकट सुरु केली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर (महाज्योती) यांनी इतर मागासवर्गीय, विमुक्त -जाती,भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट अभिछात्रवृत्ती सुरु केली आहे. परंतु आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (टिआरटिआय) यांनी आदिवासी संशोधक उमेदवारांना सरसकट फेलोशिप का लागू केली नाहीत? अशी चर्चा आता आदिवासी समाजात होत आहे.

आदिवासी समाजातील संशोधक विद्यार्थ्यांनी फेलोशिपसाठी बराच संघर्ष केल्यानंतर शासनाने दरवर्षी १०० अनुसूचित जमातीच्या संशोधक उमेदवारांना अभिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल २०१९ नंतर नोंदणी करणारे विद्यार्थी ग्राह्य धरले नसून ते वंचित आहे. त्यातील अनेकांनी आर्थिक परिस्थिती अभावी संशोधन करणे सोडून दिले आहे. मुळातच आदिवासी समाजात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इतरांच्या तुलनेत कमीच आहे. अशा परिस्थितीत त्यांना सरसकट फेलोशिप देऊन अर्थसहाय्य करणे आणि प्रवाहात आणणे गरजेचे आहे. अनुसूचित जातीच्याही विद्यार्थ्यांचा संघर्ष

सारथी, महाज्योती प्रमाणेच बार्टीनेही अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, म्हणून मुंबईच्या आझाद मैदानात गत दीड महीना बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. अखेर बुधवार, १२ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डाँ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अभिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

संशोधन करणारे आदिवासी विद्यार्थी इतरांच्या तुलनेत तसेही नगण्यच आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अट न ठेवता एप्रिल २०१९ पासूनच्या विद्यार्थांना सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर टिआरटिआयने आदिवासी संशोधकांना सरसकट फेलोशिप देण्यात द्यावी.

- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम.

अनुसूचित जातीच्याही विद्यार्थ्यांचा संघर्ष

सारथी, महाज्योती प्रमाणेच बार्टीनेही अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, म्हणून मुंबईच्या आझाद मैदानात गत दीड महीना बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. अखेर बुधवार, १२ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डाँ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अभिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

संशोधन करणारे आदिवासी विद्यार्थी इतरांच्या तुलनेत तसेही नगण्यच आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अट न ठेवता एप्रिल २०१९ पासूनच्या विद्यार्थांना सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर टिआरटिआयने आदिवासी संशोधकांना सरसकट फेलोशिप देण्यात द्यावी.

- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम.

टॅग्स :Educationशिक्षणTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाAmravatiअमरावती