शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे कंपन्यांविरोधात ‘एफआयआर’ का नाही? संतप्त शेतक-यांचा सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 18:23 IST

राज्यात बीटी बियाण्यांची विक्री करणा-या पाच मोठ्या कंपन्यांच्या विरोधात खुद्द मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

गजानन मोहोड/ अमरावती : राज्यात बीटी बियाण्यांची विक्री करणा-या पाच मोठ्या कंपन्यांच्या विरोधात खुद्द मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. याउलट चित्र विदर्भात पाहावयास मिळत आहे. बीटीवरील गुलाबी बोंड अळीने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना व असा समित्यांचा अहवाल असतानासुद्धा कंपन्यांविरोधात तक्रार करण्यात कृषी विभागाला स्वारस्य नसल्याची शोकांतिका आहे.

विभागातील सहा लाख, तर विदर्भात आठ लाख हेक्टरमधील कपाशीचे बोंड नि बोंड गुलाबी अळीने पोखरले आहे. याविषयी शेतक-यांनी तक्रार केल्यावर जिल्हास्तरीय समितीने शेतातील बीटी कपाशीची पाहणी केली. यामध्ये कपाशीची ९६ टक्के बोंडे किडली असल्यामुळे शेतक-यांचे किमान १ लाख २५ हजाराचे नुकसान झाल्याचा अहवाल दिला आहे. विशेष म्हणजे, हा अहवाल कृषी संचालकांनादेखील पाठविण्यात येत आहे. बियाणे कंपन्यांनी बीटीच्या नावावर दुय्यम दर्जाची बियाणे शेतक-यांच्या माथी मारल्यामुळेच शेतक-यांचे संपूर्ण पीक धोक्यात आले आहे. यामध्ये शेतक-यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यात २००, तर विभागात एक हजारावर तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त आहेत. त्यांची तपासणी कृषी विभाग करीत आहे. हंगामच उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी कमालीचा आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी शासनाविरोधात आंदोलने होत असतानाही शासनाने सर्वेक्षणाचे आदेश दिलेले नाहीत. विशेष म्हणजे, बीटीच्या बीजी-२ उत्पादक कंपन्यांची बियाणे परवानाधारक विक्रेत्यांद्वारा शेतक-यांना विकण्यात आल्यानेच महाराष्ट्र कापूस बी-बियाणे अधिनियम २००९ चे उल्लंघन झालेले आहे. त्यामुळे गुणनियंत्रक अधिका-यांद्वारा बियाणे कंपन्याविरोधात तक्रार करणे क्रमप्राप्त असताना असे झालेले नाही. त्यामुळे शेतक-यांच्या जिवाशी खेळणा-या बियाणे कंपन्यांचे लाड का, असा शेतक-यांचा सवाल आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या