शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

बियाणे कंपन्यांविरोधात ‘एफआयआर’ का नाही? संतप्त शेतक-यांचा सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 18:23 IST

राज्यात बीटी बियाण्यांची विक्री करणा-या पाच मोठ्या कंपन्यांच्या विरोधात खुद्द मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

गजानन मोहोड/ अमरावती : राज्यात बीटी बियाण्यांची विक्री करणा-या पाच मोठ्या कंपन्यांच्या विरोधात खुद्द मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. याउलट चित्र विदर्भात पाहावयास मिळत आहे. बीटीवरील गुलाबी बोंड अळीने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना व असा समित्यांचा अहवाल असतानासुद्धा कंपन्यांविरोधात तक्रार करण्यात कृषी विभागाला स्वारस्य नसल्याची शोकांतिका आहे.

विभागातील सहा लाख, तर विदर्भात आठ लाख हेक्टरमधील कपाशीचे बोंड नि बोंड गुलाबी अळीने पोखरले आहे. याविषयी शेतक-यांनी तक्रार केल्यावर जिल्हास्तरीय समितीने शेतातील बीटी कपाशीची पाहणी केली. यामध्ये कपाशीची ९६ टक्के बोंडे किडली असल्यामुळे शेतक-यांचे किमान १ लाख २५ हजाराचे नुकसान झाल्याचा अहवाल दिला आहे. विशेष म्हणजे, हा अहवाल कृषी संचालकांनादेखील पाठविण्यात येत आहे. बियाणे कंपन्यांनी बीटीच्या नावावर दुय्यम दर्जाची बियाणे शेतक-यांच्या माथी मारल्यामुळेच शेतक-यांचे संपूर्ण पीक धोक्यात आले आहे. यामध्ये शेतक-यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यात २००, तर विभागात एक हजारावर तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त आहेत. त्यांची तपासणी कृषी विभाग करीत आहे. हंगामच उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी कमालीचा आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी शासनाविरोधात आंदोलने होत असतानाही शासनाने सर्वेक्षणाचे आदेश दिलेले नाहीत. विशेष म्हणजे, बीटीच्या बीजी-२ उत्पादक कंपन्यांची बियाणे परवानाधारक विक्रेत्यांद्वारा शेतक-यांना विकण्यात आल्यानेच महाराष्ट्र कापूस बी-बियाणे अधिनियम २००९ चे उल्लंघन झालेले आहे. त्यामुळे गुणनियंत्रक अधिका-यांद्वारा बियाणे कंपन्याविरोधात तक्रार करणे क्रमप्राप्त असताना असे झालेले नाही. त्यामुळे शेतक-यांच्या जिवाशी खेळणा-या बियाणे कंपन्यांचे लाड का, असा शेतक-यांचा सवाल आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या