शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी सुसाट, मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:26 IST

प्रवाशांचा प्रतिसाद अल्प; ११५ बसेस पैकी ३७ फेऱ्याच मुक्कामी अमरावती : कोरोना संसर्गामुळे थांबलेली एसटी बसची चाके पुन्हा कोविड-१९ ...

प्रवाशांचा प्रतिसाद अल्प; ११५ बसेस पैकी ३७ फेऱ्याच मुक्कामी

अमरावती : कोरोना संसर्गामुळे थांबलेली एसटी बसची चाके पुन्हा कोविड-१९ ची दुसरी लाट ओसरल्यानंतर धावू लागल्या आहेत. एसटी बसेस पूर्ण क्षमतेने धावत असल्या तरी ग्रामीण भागात प्रवाशांचा प्रतिसाद ५० ते ६० टक्के मिळत आहे. परिणामी विभागात ११५ मुक्कामी बसपैकी केवळ ३७ फेऱ्याच आजघडीला सुरू आहेत. ज्या ठिकाणी मुक्कामी गाड्या जायच्या त्या गावातील प्रवाशांना मात्र गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. परिणामी प्रवाशांनाही मुक्कामी बस कधी सुरू होईल, याची प्रतीक्षा लागली आहे.

जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे ८ एसटी आगार आहेत. यातील सर्वच आगारातून ग्रामीण भागात रात्री मुक्कामी बसेस खेडेगावात सोडल्या जातात. महामंडळाकडून बसेस सोडण्याची तयारी असली तरी बसेला पाहिजे तसा प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत नाही. यामुळे महामंडळाचा इंधनाचा खर्चही वसूल होत नाही. आर्थिक नुकसान होत असल्यामुळे ग्रामीण भागातील अद्यापही ७७ मुक्कामी फेऱ्या बंद आहेत. मुक्कामीे बस बंद असल्याने या गाड्या कधी सुरू होतील, याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे.

बॉक्स

शहर भागात गाड्या अधिक

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर विभागातून मध्यम व लांबपल्ल्याच्या तसेच जिल्हांतर्गत शहरी भागात धावणाऱ्या एसटी बसेसना प्रवाशाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणामी प्रवाशामुळे बसेसही हाऊसफुल्ल भरून धावत आहेत.

बाॅक्स

मुक्कामी गाड्यांचे काय?

अमरावती मध्यवर्ती बसस्थानकातून तसेच दर्यापूर, बडनेरा, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे या आगारातून सध्या ११५ पैकी ३७ मुक्कामी बसेस जात आहेत. ७७ मुक्कामी बसेस केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बॉक़्स

ग्रामीण भागातील गाड्यांना थंड प्रतिसाद

एसटी महामंडळाकडून ग्रामीण भागात सोडण्यात येणाऱ्या बसेस मध्ये ५० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. यात खर्च वसूल होत नाही. याशिवाय अनेक ठिकाणी मुक्कामी बसेसला थांबण्यासाठी जागाही मिळत नाही.

कोट

आमच्या गावात अगोदर एसटी बस मुक्कामी यायची मात्र कोरोनापासून ही बस बंद आहे. त्यामुळे कामासाठी बाहेरगावी जायचे असल्यास खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुक्कामी बस आता सुरू करणे आवश्यक आहे.

- राजेंद्र कावरे, प्रवासी

कोट

कोरोनामुळे बसेस बंद होत्या. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. शासनाने निर्बंधही शिथिल केले आहेत. त्यामुळे मुक्कामी बसेसही सुरू कराव्यात, सणासुदीचे दिवस तोंडावर असल्याने बस सुरू होणे गरजेचे आहे.

कोट

ग्रामीण भागात मुक्कामी जाणाऱ्या बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद ५० ते ६० टक्केच आहे. ज्या ठिकाणी प्रवासी प्रतिसाद आहे. अशा बस सुरू केल्या आहेत. उर्वरित मुक्कामी बस आगामी सणाचे दिवस लक्षात घेता टप्याटप्याने सुरू केल्या जातील.

- श्रीकांत गभणे,

विभाग नियंत्रक