शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने मंजूर केलेले संत्रा अनुदान मिळणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST

दीड वर्षांपूर्वी सन २०१९ मध्ये वादळ, गारपीट व अज्ञात रोगांमुळे संत्रा बागायतदारांचे नुकसान झाले होते. त्याच काळात बोंडअळी व लाल्या रोगामुळे कपाशी, सोयाबीन, पिकांचेही नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शिवारातील पिकांच्या नुकसानीचे ताबडतोब सर्वेक्षण करून अहवाल पाठविण्याचे आदेश शासनाने महसूल व कृषी विभागाला दिले होते.

ठळक मुद्देदीड वर्ष लोटले : पेरणीकरिता कामी येण्याची अपेक्षा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : परिसरातील संत्रा उत्पादकांना दीड वर्षांपूर्वी झालेल्या शेतमालाच्या नुकसानाबाबत भरपाईचे आश्वासन मिळाले होते. त्याच्या पूर्ततेची प्रतीक्षा अद्याप शेतकऱ्यांना लागलेली आहे. संत्रा पिकांच्या नुकसानाचा आकडा लाखोंच्या घरात असल्याने शेतकरी त्यामधून अद्याप सावरलेले नाहीत.दीड वर्षांपूर्वी सन २०१९ मध्ये वादळ, गारपीट व अज्ञात रोगांमुळे संत्रा बागायतदारांचे नुकसान झाले होते. त्याच काळात बोंडअळी व लाल्या रोगामुळे कपाशी, सोयाबीन, पिकांचेही नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शिवारातील पिकांच्या नुकसानीचे ताबडतोब सर्वेक्षण करून अहवाल पाठविण्याचे आदेश शासनाने महसूल व कृषी विभागाला दिले होते.शासनाच्या आदेशाची वेळीच दखल घेऊन नुकसानाचा अहवाल संबंधित विभागामार्फत तातडीने देण्यात आला. शासनाने नुकसानभरपाई म्हणून कपाशी पिकांकरिता हेक्टरी आठ हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेत अनुदान जाहीर केले आणि लवकरात लवकर शेतकºयांच्या खात्यात नुकसानभरपाईचे अनुदान जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे काही शेतकऱ्यांना कपाशीचे अनुदान मिळाले, तर काही शेतकरी वंचितच आहेत. हेक्टरी १८ हजार रुपयांनुसार संत्रा पिकाच्या नुकसानभरपाईतील अद्याप एक रुपयाही शेतकºयांच्या खात्यात जमा झालेली नाही. खरीप हंगामातील पेरणी जवळ आली आणि दिलेल्या अनुदानाच्या आश्वासनाला दीड वर्षे होऊनही शेतकऱ्यांची अनुदानाची प्रतीक्षा संपलेली नाही. संत्रा पिकाच्या अनुदानाच्या रकमेचे लवकरात लवकर वाटप करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे. नुकसानभरपाईच्या मागणीकडे लक्ष वेधण्याकरिता उपोषणाचा पवित्रा घेण्याचाही मानस शेतकºयांनी व्यक्त केला.नुकसानभरपाईच्या आश्वासनांवर शेतकऱ्यांची बोळवण केली जाते. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढतच आहे. भरपाई वेळेवर मिळावी.- रामनाथ मेतकर, शेतकरीअस्मानी-सुलतानी संकटाने शेतकरी पिचला गेला आहे. घरात पीक येण्यापूर्वी निसर्ग व नंतर शासन हमीभावाच्या नावावर घात करीत आहे.- रुपेश तायडे, शेतकरी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती