शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने मंजूर केलेले संत्रा अनुदान मिळणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST

दीड वर्षांपूर्वी सन २०१९ मध्ये वादळ, गारपीट व अज्ञात रोगांमुळे संत्रा बागायतदारांचे नुकसान झाले होते. त्याच काळात बोंडअळी व लाल्या रोगामुळे कपाशी, सोयाबीन, पिकांचेही नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शिवारातील पिकांच्या नुकसानीचे ताबडतोब सर्वेक्षण करून अहवाल पाठविण्याचे आदेश शासनाने महसूल व कृषी विभागाला दिले होते.

ठळक मुद्देदीड वर्ष लोटले : पेरणीकरिता कामी येण्याची अपेक्षा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : परिसरातील संत्रा उत्पादकांना दीड वर्षांपूर्वी झालेल्या शेतमालाच्या नुकसानाबाबत भरपाईचे आश्वासन मिळाले होते. त्याच्या पूर्ततेची प्रतीक्षा अद्याप शेतकऱ्यांना लागलेली आहे. संत्रा पिकांच्या नुकसानाचा आकडा लाखोंच्या घरात असल्याने शेतकरी त्यामधून अद्याप सावरलेले नाहीत.दीड वर्षांपूर्वी सन २०१९ मध्ये वादळ, गारपीट व अज्ञात रोगांमुळे संत्रा बागायतदारांचे नुकसान झाले होते. त्याच काळात बोंडअळी व लाल्या रोगामुळे कपाशी, सोयाबीन, पिकांचेही नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शिवारातील पिकांच्या नुकसानीचे ताबडतोब सर्वेक्षण करून अहवाल पाठविण्याचे आदेश शासनाने महसूल व कृषी विभागाला दिले होते.शासनाच्या आदेशाची वेळीच दखल घेऊन नुकसानाचा अहवाल संबंधित विभागामार्फत तातडीने देण्यात आला. शासनाने नुकसानभरपाई म्हणून कपाशी पिकांकरिता हेक्टरी आठ हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेत अनुदान जाहीर केले आणि लवकरात लवकर शेतकºयांच्या खात्यात नुकसानभरपाईचे अनुदान जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे काही शेतकऱ्यांना कपाशीचे अनुदान मिळाले, तर काही शेतकरी वंचितच आहेत. हेक्टरी १८ हजार रुपयांनुसार संत्रा पिकाच्या नुकसानभरपाईतील अद्याप एक रुपयाही शेतकºयांच्या खात्यात जमा झालेली नाही. खरीप हंगामातील पेरणी जवळ आली आणि दिलेल्या अनुदानाच्या आश्वासनाला दीड वर्षे होऊनही शेतकऱ्यांची अनुदानाची प्रतीक्षा संपलेली नाही. संत्रा पिकाच्या अनुदानाच्या रकमेचे लवकरात लवकर वाटप करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे. नुकसानभरपाईच्या मागणीकडे लक्ष वेधण्याकरिता उपोषणाचा पवित्रा घेण्याचाही मानस शेतकºयांनी व्यक्त केला.नुकसानभरपाईच्या आश्वासनांवर शेतकऱ्यांची बोळवण केली जाते. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढतच आहे. भरपाई वेळेवर मिळावी.- रामनाथ मेतकर, शेतकरीअस्मानी-सुलतानी संकटाने शेतकरी पिचला गेला आहे. घरात पीक येण्यापूर्वी निसर्ग व नंतर शासन हमीभावाच्या नावावर घात करीत आहे.- रुपेश तायडे, शेतकरी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती