शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

शासनाने मंजूर केलेले संत्रा अनुदान मिळणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST

दीड वर्षांपूर्वी सन २०१९ मध्ये वादळ, गारपीट व अज्ञात रोगांमुळे संत्रा बागायतदारांचे नुकसान झाले होते. त्याच काळात बोंडअळी व लाल्या रोगामुळे कपाशी, सोयाबीन, पिकांचेही नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शिवारातील पिकांच्या नुकसानीचे ताबडतोब सर्वेक्षण करून अहवाल पाठविण्याचे आदेश शासनाने महसूल व कृषी विभागाला दिले होते.

ठळक मुद्देदीड वर्ष लोटले : पेरणीकरिता कामी येण्याची अपेक्षा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : परिसरातील संत्रा उत्पादकांना दीड वर्षांपूर्वी झालेल्या शेतमालाच्या नुकसानाबाबत भरपाईचे आश्वासन मिळाले होते. त्याच्या पूर्ततेची प्रतीक्षा अद्याप शेतकऱ्यांना लागलेली आहे. संत्रा पिकांच्या नुकसानाचा आकडा लाखोंच्या घरात असल्याने शेतकरी त्यामधून अद्याप सावरलेले नाहीत.दीड वर्षांपूर्वी सन २०१९ मध्ये वादळ, गारपीट व अज्ञात रोगांमुळे संत्रा बागायतदारांचे नुकसान झाले होते. त्याच काळात बोंडअळी व लाल्या रोगामुळे कपाशी, सोयाबीन, पिकांचेही नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शिवारातील पिकांच्या नुकसानीचे ताबडतोब सर्वेक्षण करून अहवाल पाठविण्याचे आदेश शासनाने महसूल व कृषी विभागाला दिले होते.शासनाच्या आदेशाची वेळीच दखल घेऊन नुकसानाचा अहवाल संबंधित विभागामार्फत तातडीने देण्यात आला. शासनाने नुकसानभरपाई म्हणून कपाशी पिकांकरिता हेक्टरी आठ हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेत अनुदान जाहीर केले आणि लवकरात लवकर शेतकºयांच्या खात्यात नुकसानभरपाईचे अनुदान जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे काही शेतकऱ्यांना कपाशीचे अनुदान मिळाले, तर काही शेतकरी वंचितच आहेत. हेक्टरी १८ हजार रुपयांनुसार संत्रा पिकाच्या नुकसानभरपाईतील अद्याप एक रुपयाही शेतकºयांच्या खात्यात जमा झालेली नाही. खरीप हंगामातील पेरणी जवळ आली आणि दिलेल्या अनुदानाच्या आश्वासनाला दीड वर्षे होऊनही शेतकऱ्यांची अनुदानाची प्रतीक्षा संपलेली नाही. संत्रा पिकाच्या अनुदानाच्या रकमेचे लवकरात लवकर वाटप करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे. नुकसानभरपाईच्या मागणीकडे लक्ष वेधण्याकरिता उपोषणाचा पवित्रा घेण्याचाही मानस शेतकºयांनी व्यक्त केला.नुकसानभरपाईच्या आश्वासनांवर शेतकऱ्यांची बोळवण केली जाते. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढतच आहे. भरपाई वेळेवर मिळावी.- रामनाथ मेतकर, शेतकरीअस्मानी-सुलतानी संकटाने शेतकरी पिचला गेला आहे. घरात पीक येण्यापूर्वी निसर्ग व नंतर शासन हमीभावाच्या नावावर घात करीत आहे.- रुपेश तायडे, शेतकरी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती