शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कधी मिळणार इज्जत पासचा लाभ ?

By admin | Updated: September 26, 2015 00:04 IST

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना केवळ २५ रूपयांत एक महिना दीडशे किलोमीटरचा प्रवास करण्याची सोय इज्जत पासद्वारे शासनाने केली आहे.

मोहन राऊत अमरावतीदारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना केवळ २५ रूपयांत एक महिना दीडशे किलोमीटरचा प्रवास करण्याची सोय इज्जत पासद्वारे शासनाने केली आहे. मात्र जिल्ह्यातील अशा कुटुंबांना या पासचा लाभ अद्यापही मिळाला नाही. जनजागृतीअभावी ही योजना बासनात गुंडाळल्याचे स्पष्ट दिसत आहे़जिल्ह्यात सर्वाधिक बीपीएलधारक रेल्वे मार्गावरील तालुक्यातील रहिवासी आहे़ याअंतर्गत बीपीएलधारकांना २५ रूपयांत एक महिना प्रवासाचा लाभ मिळू शकतो. परंतु प्रशासनाने मागील चार वर्षांत कोणतीही हालचाल केली नाही़ धामणगाव रेल्वे तालुक्यात ११ हजार ४४९ तर चांदूररेल्वे तालुक्यात ७ हजार १५७ तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ११ हजार ५४६ बीपीएलधारक आहेत़ धामणगाव, चांदूर येथून दीडशे किलोमीटर प्रवास म्हणजे शेगाव, विदर्भाची राजधानी असलेले नागपूर व अन्य ठिकाणी प्रवास करता येतो़ नांदगाव खंडेश्वर तसेच अमरावती शहरातील तब्बल १८ हजार ३९४ व अमरावती तालुक्यातील ११ हजार ७७० बीपीएलधारकांना व भातकुली तालुक्यातील ७ हजार २७४ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना बडनेरा रेल्वे स्थानक किंवा कोणत्याही रेल्वे स्थानकावरून दीडशे किलोमीटर अंतर एक महिन्यासाठी २५ रूपयांत प्रवास करता येतो़ दर्यापूर तालुक्यातील १४,६०३ व अंजनगाव तालुक्यातील १३,४९५ बीपीएलधारकांना अकोला, मूर्तिजापूर या रेल्वे स्थानकावरून महागाईच्या ही योजना असताना बीपीएलधारकांना लाभ मिळाला नाही़ वरूड तालुक्यातील १४,७६३, अचलपूर- १६,०१६, तिवसा- ८,३२२ धारणी- ४,९९३ चिखलदरा- ३,६८१ या बीपीएलधारकांना जनजागृती अभावी ही इज्जत पास मिळाली नाही़ त्यामुळे ते सवलतीपासून वंचित आहेत.चार वर्षांत इज्जत पास रेल्वे प्रशासनच्या खिशात तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी सन २००९ मध्ये दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना रेल्वेने कमी दरात प्रवास करता यावा, या उद्देशाने इज्जत पास योजना सुरू केली होती. या योजनेनुसार दारिद्र्य रेषेखालील नागरीकांना २५ रूपये भरून पास काढलेल्या ठिकाणापासून क ोठेही १५० कि़मी़ प्रवास एक महिन्यासाठी मोफत करण्यात आला आहे़ परंतू रेल्वे च्या इज्जत पास योजने बाबत सर्व समाण्य रेल्वे प्रवाश्यांना अधीक ची माहिती मिळत नसल्याने आजही इज्जत पास बिपीएल धारकांऐवजी रेल्वे प्रशासनच्या खिश्यात आहे़ सेवाभावी संस्था व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा रेल्वे मंत्रालयाकडून कमी उत्पन्न गटातील अर्थात दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना कमी पैशात प्रवास करता यावा, यासाठी इज्जत पास योजना राबविली जात आहे़ मात्र या योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे़ जिल्ह्यातील बीपीएल कुटुंबातील लाभ मिळण्याकरिता जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी सेवाभावी संस्था यांनी पुढाकार घेऊन या इज्जत पास योजनेबाबत जनजागृती आणि मेळावे घेणे आवश्यक आहे़