शहरं
Join us  
Trending Stories
1
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
2
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
3
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
4
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
5
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
6
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
7
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
8
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
10
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
11
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
12
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
13
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
14
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
15
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
16
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
17
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
18
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
19
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
20
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत वीज बचतीचे आॅडिट केव्हा?

By admin | Updated: December 7, 2014 22:43 IST

महापालिकेचे वीज देयकावर महिन्याकाठी ७० लाख रुपये खर्च होत असताना या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी वीज बचतीचे आॅडिट करण्याचा निर्णय झाला. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी

अमरावती : महापालिकेचे वीज देयकावर महिन्याकाठी ७० लाख रुपये खर्च होत असताना या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी वीज बचतीचे आॅडिट करण्याचा निर्णय झाला. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात प्रकाश विभाग माघारला असून वीजतंत्रीवर कुणाचाही अंकुश नसल्याचे चित्र आहे.
आयुक्त अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त विनायक औगड यांनी कर्मचाऱ्यांच्या कामकाजांचे मूल्याकंन करण्यासह त्यांनी वेळेवर कार्यालयात पोहचून नागरिकांची कामे ही निर्धारित वेळेत करावी, यासाठी हजेरी ही बायोमॅट्रिक्स प्रणाली लागू केली आहे. मात्र प्रकाश विभागाचे कर्मचारी, वीजतंत्री हे एकदा कार्यालयात पोहचून बॉयोमॅट्रिक्सने थबींग केले की, त्यानंतर गायब होतात. वीजतंत्रीच्या कामकाजाचे मूल्याकंन करणारी यंत्रणा नसल्यामुळे त्यांचा कारभार हा मर्जीनुसारच सुरु आहे. महापालिकेत सुमारे १० वीजतंत्री असून प्रत्येकाला ४० हजार रुपये वेतन आहे. परंतु त्यांच्याकडे कामकाजाची जबाबदारी काय? हे अभियंते देखील सांगू शकत नाही. महावितरणने पथदिवे चालू- बंद करण्याची जबाबदारी झटकण्याचा पवित्रा घेतला असला तरी ही जबाबदारी महापालिका आयुक्तांनी महावितरणवरच सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. वीज देयकांवर नियंत्रण करण्यासाठी पथदिव्यांवर अनावश्यक जास्त क्षमतेचे दिवे काढून त्या जागी कमी प्रकाश क्षमतेचे दिवे लावून वीजेचे आॅडीट करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रकाश विभागाने वीज बचतीचे आॅडीट करण्याच्या या निर्णयाला बगल दिली. याउलट वीजेच्या देयकांची रक्कम वाढतच चालली आहे. पथदिवे चालू- बंद करण्याचा कालावधी निश्चित नसल्यामुळे महावितरणचे कर्मचारी त्यांच्या मर्जीनुसार पथदिवे चालू- बंद करतात. परिणामी वीजेचा अनावश्यक वापर होत असल्याचे वास्तव आहे. पथदिवे चालू- बंद करण्यावर वीज तंत्रीनी लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र त्यांची वेळकाढू भूमिका असल्याने वीजेचे देयके दरमहिन्याला वाढतच आहे. काही भागातील सकाळी १० वाजेपर्यंत पथदिव्यांवरील दिवे बंद केले जात नाही. याचा भुर्दंड महापालिकेला सहन करावा लागत आहे. ज्या पथदिव्यावर दिवे आवश्यक आहेत, त्या पथदिव्यांवर दिवे नसल्याची ओरड स्वत: नगरसेवकांची आहे. वारंवार तक्रारे नोंदवून देखील त्या पथदिव्यांवर दिवे लावण्याची जबाबदारी वीजतंत्री घेत नाहीत, असा आरोप अनेक सदस्यांच्या आहे. प्रकाश विभागाचे प्रमुख असलेले उपअभियंता अशोक देशमुख यांचा विभागावर अंकुश नसल्याचे दिसून येते. सकाळी कर्मचाऱ्यांनी बायोमॅट्रिक्सने हजेरी नोंदविली की, त्यानंतर शेवटी जाण्याच्या वेळेतच कार्यालयात ते दाखल होतात. प्रकाश विभागाचे कर्मचारी दिवसभर कुठे गायब होतात? हा संशोधनाचा विषय आहे. (प्रतिनिधी)