शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही पिशवीत नेऊन खातो, ते पिशवीच खातात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 16:39 IST

Amravati : आपला निष्काळजीपणा बनला जनावरांच्या जीवाला धोका

मनीष तसरेअमरावती : भाजीपाला, फळ तसेच इतरही वस्तूसाठी प्लास्टिक पिशवीचा वापर केला जातो. परंतु उपयोगानंतर प्लास्टिक पिशवी फेकून दिल्या जात असल्याने जनावरे ही प्लास्टिक पिशवी खात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे पहायला मिळत आहे.

प्लास्टिकचे धोके काय?• प्लास्टिक म्हणजे आपल्या पृथ्वीवरचे संकटच म्हणावे लागेल. जंगल, जमीन, नद्या, महासागर प्लास्टिकच्या कचऱ्याने व्यापले आहे.• प्लास्टिकचे कित्येक वर्षे विघटनच होत नाही, त्यामुळे ते तसेच पडून राहते. त्यामुळे पाण्याचे स्रोतदेखील प्रदूषित झाले आहे.• नद्या, समुद्र या विळख्यात आहेत. पाण्याचे प्रवाह बंद झाले आहेत. जमिनीचा पोत घसरला असून, भूगर्भातील पाणी प्रदूषित झाले आहे.

प्लास्टिकचा जनावरांनाही धोकाशहरातील जनावरांसाठी प्लास्टिक मोठा धोका ठरला आहे. जवळपास ८० टक्के गायी, म्हशी अन्नासोबत प्लास्टिकदेखील खातात. पोटामधील आतडे व इतर अवयवांची हालचाल होताना त्या सोबत प्लास्टिकदेखील गुंडाळले जाते. यामुळे पचन तंत्र बिघडते, गॅसेस तयार होतात व त्यातून विषबाधा होते. तसेच रवंथ प्रक्रिया बंद पडते व त्यातून त्यांचा मृत्यू होतो. - डॉ. सागर ठोसर, पशुवैद्यकीय अधिकारी 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीAmravatiअमरावती