शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

९० टक्के थकबाकीदारांच्या भागात पाणीपुरवठा होणार बंद!

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 3, 2024 22:17 IST

२१४ कोटींची थकबाकी, मजीप्राची योजनाच धोक्यात : उत्पन्न अन् खर्चात नऊ कोटींची तफावत

अमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनेद्वारे महानगराला पाणीपुरवठा केला जातो; मात्र थकबाकी २१४ कोटींवर गेल्याने योजनेची देखभाल दुरुस्ती करणे कठीण झाले आहे. उत्पन्न व त्यासाठी होणारा खर्च यामध्ये ९ कोटींची तफावत असल्याने योजनाच धोक्यात आलेली आहे. त्यामुळे ९० टक्के थकबाकीदार ग्राहक असलेल्या भागाचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे कठोर पाऊल मजीप्राद्वारा घेण्यात आलेले आहे. यामध्ये बिलाचा भरणा करणाऱ्या १० टक्के नागरिकांना टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्यात येईल. 

महानगरात १,००,६७३ नळजोडण्या दिलेल्या आहेत. यापैकी फक्त ३५ टक्के ग्राहकच नियमित पाणीपट्टीचा भरणा करतात. त्यामुळे योजनेवरील खर्च व पाणीपट्टीद्वारे उत्पन्न यामधील तफावत वाढत आहे. सद्य:स्थितीत नऊ कोटींचा घाटा सहन करून महानगराची योजना सुरू आहे; मात्र ही तफावत वाढत असल्याने घाट्यातील योजना चालविणे मजीप्रासाठी कठीण बाब होणार आहे. विजेचे देयक न भरले गेल्याने महावितरणद्वारा एका लाखाचा दंड मजीप्राला ठोठावला आहे. कंत्राटदारांची देयके आठ महिन्यांपासून प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत योजना बंद पडल्यास महानगराचा पाणीपुरवठा कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता आहे.

या भागाचा पाणीपुरवठा करणार बंद९० टक्के थकबाकी असलेल्या भागाचा पाणीपुरवठा मजीप्राद्वारा खंडित करण्यात येणार आहे. यामध्ये वडाळी, मसानगंज, यास्मिननगर, गुलिस्तानगर, रहेमतनगर, ताजनगर व बडनेरा शहरातील माताफैल, स्वीपर कॉलनी, पाच बंगला, अलमासनगर, चमननगर, मोतीनगर व संलग्न भागाचा समावेश आहे. यामध्ये १० टक्के नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.  

योजनेचे वीज देयक महिन्याला दीड कोटीयोजनेचे वीज देयक महिन्याला दीड कोटींचे आहे. धरणातील अशुद्ध पाण्याची उचल करण्यासाठी २५ लाख, पाणी शुद्धीकरणाचे रसायनकरिता ४.२६ लाख, व्हॅालमनचे वेतन, गळत्या दुरुस्ती, पंपिंग मशीनरी यासाठी ६० लाख, यासोबत इतर अनुषंगीत खर्चासाठी तीन कोटी असा खर्च होत आहे. शिवाय आठ अभियंते व २१२ कुशल, अकुशल कामगारांचाही खर्चाचा भार पाणीपट्टीतून केला जातो.

अमृत-२ साठी २९६ कोटी कसे उभारणार?अमृत-२ योजनेच्या ९८५.४९ कोटींच्या कामांना राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. त्यापैकी २९५.६४ कोटी रुपये मजीप्राला उभारायचे आहे. या रकमेची पूर्तता पाणीपट्टीमधून वसूल करण्याची हमी मजीप्राने घेतलेली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाणीपट्टीचा भरणा करून शहराच्या पाणीपुरवठा योजनेप्रती मजीप्राला सहकार्य करणे महत्त्वाचे आहे.

शहरातील ग्राहकांकडे २१४ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे पाणीपट्टीद्वारे उत्पन्न व योजनेचा खर्च यामध्ये नऊ कोटींचा सध्या घाटा आहे. त्यामुळे ९० टक्के थकबाकीदार ग्राहक असलेल्या भागाचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.- संजय लेवरकर, उपअभियंता मजीप्रा.

टॅग्स :Waterपाणी