शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 1:33 AM

पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पाणी स्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाद्वारा केलेल्या उपाययोजनांचा जि.प. अध्यक्षांनी बुधवारी आढावा घेतला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : अध्यक्षांनी घेतला पाणीटंचाईचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पाणी स्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाद्वारा केलेल्या उपाययोजनांचा जि.प. अध्यक्षांनी बुधवारी आढावा घेतला.जिल्ह्यात पाण्याचे टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५४ गावांतील ६५ खासगी विहीर अधिग्रहित केल्या आहेत. यावर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणी टंचाईचा सामना काही गावांमध्ये करावा लागत आहे. ग्रामीण भागातील भूजल स्तर खोल गेल्याने पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत आहेत. गावातील पाणीपुरवठ्याचे स्त्रोत आटल्याने पाणी पुरवठा योजना ठप्प असल्याचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी सांगितले. ग्रामस्थांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. यामध्ये मेळघाटातील दोन गावांचा समावेश आहे. पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध असल्याने टंचाईची तीव्रता कमी-अधिक आहे. यावर मात करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला असून त्यानुसार उपाययोजना सुरू केल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी उपलब्ध असलेल्या विहिरी अधिग्रहित करून आवश्यक तेथे उपाययोजना करण्याचे निर्देश अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी अधिकाºयांना दिले आहेत. बैठकीला उपअभियंता संदीप देशमुख, अनूप खासबागे, दीपक डोंगरे, आर.डी सावळकर, दिपेंद्र कोराटे, जी.आर पाटणे आदी उपस्थित होते.