शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पाणीसाठा चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:46 PM

‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून नावारूपास आलेल्या वरूड तालुक्यात जुलै महिन्यापासून नदी-नाले कोरडेच असल्याने आणि सिंचन प्रकल्पात आवश्यक जलसाठा संचयित झाला नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सिंचन विभाग सांगत आहे. वरूड तालुक्यातील प्रकल्प आचके देत असून, तालुक्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

ठळक मुद्देवरूड तालुका : प्रकल्पसाठा निम्म्यावर पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून नावारूपास आलेल्या वरूड तालुक्यात जुलै महिन्यापासून नदी-नाले कोरडेच असल्याने आणि सिंचन प्रकल्पात आवश्यक जलसाठा संचयित झाला नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सिंचन विभाग सांगत आहे. वरूड तालुक्यातील प्रकल्प आचके देत असून, तालुक्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.तालुक्यात नऊ प्रकल्प असून, यावर्षी पावसाळ्यात सरासरी ४० टक्केच जलसाठा संचयित झाला. एकेकाळी जानेवारीपर्यंत वाहत्या राहणाऱ्या नदीला एकही पूर गेला नाही. आॅक्टोबर महिन्यात नऊ सिंचन प्रकल्पांपैकी जामगाव प्रकल्पात ७८.८४ व वाईमध्ये ६८.२५ टक्के जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये ५० टक्क््यांपेक्षा कमी जलसाठा असल्याने शेतकºयांना परतीच्या पावसाची अपेक्षा होती. परंतु, त्याचा मागमूसही नसल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.शेकदरी प्रकल्पात १० आॅक्टोबरपर्यंत १९.८९ टक्के, पुसली प्रकल्पामध्ये १७.२४ टक्के, सातनूर प्रकल्पामध्ये ३०.४१ टक्के, पंढरी प्रकल्पामध्ये ५७.४४ टक्के, नागठाणा प्रकल्पामध्ये ४५.३१ टक्के जलसाठा आहे, तर जमालपूर व बेलसावंगी प्रकल्प कोरडे पडले आहेत. तालुक्यात २३ हजार ५०० हेक्टर शेतजमीन संत्रा लागवडीखाली असून, यापैकी २१ हजार हेक्टर जमिनीवर फळधारणा करणारी संत्राझाडे आहे. रब्बी हंगामातील गहू, चणा तसेच संत्रा आणि कपाशी, मिरची आदी बागायती पिके घेण्यात येतात. परंतु, पाणीपुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण झाला असून, विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. ओलितामुळे भूजलपातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. भूगर्भातील जिरणाºया पाण्यापेक्षा उपसा अधिक प्रमाणात होत असल्याने समतोल होत नाही. पर्यायाने अतिशोषित म्हणून हा भाग वगळण्यात भूजल सर्वेक्षण विभागाला अडचण येत असल्याने जलव्यवस्थापन ही काळाची गरज झाली आहे. जलव्यवस्थापन झाले ेनाही, तर येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये १०० टक्के जलसंचय झाला होता.पाऊस २२७.९० मिमी कमीतालुक्यात १० आॅक्टोबरपर्यंत केवळ ५४० मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षी हीच नोंद ७६७.९० मिमी होती. यामुळे यावर्षी २२७.९० मिमी पाऊस कमी झाला. यामुळे तालुक्यावर जलसंकटाचे ढग तयार झाले आहेत. सातत्याने अस्मानी संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत असल्याने पुन्हा कर्जबाजारी होण्याकडे वाटचाल असल्याचे सुतोवाच आहे.वरूड तालुका ड्रायझोनमुक्त कराअतिशोषित भूभाग घोषित झाल्याने तालुक्यात नवीन विहिरी आणि बोअर करण्यावर बंदी आहे. यामुळे शेतकºयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यावर्षीसुद्धा प्रकल्प जलसंचयित झाले नाही, तर विहिरींची पातळीसुद्धा वाढलेली नाही. संत्र्यासह सिंचनाकरिता पाणी मिळविण्याकरिता यावर्षी तरी बोअर करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.अतिविकसित क्षेत्र असल्याने उपसा मोठ्या प्रमाणावर आहे. पावसाचे पडणारे, भूगर्भात जिरणारे आणि उपसा होणारे पाणी यात समतोलाकरिता रेनवाटर हार्वेस्टिंग, विहीर पुनर्भरण कार्यक्रम तसेच पाणी अडवा पाणी जिरवा अभियान राबविणे गरजेचे आहे.- डी.एम. सोनारेशाखा अभियंता