शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत सरासरी ६३ टक्के पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 18:45 IST

पश्चिम विदर्भातील मोठे, लघु व मध्यम अशा एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६३ टक्के पाणीसाठा झाला आहे.

- संदीप मानकर 

अमरावती  - पश्चिम विदर्भातील मोठे, लघु व मध्यम अशा एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६३ टक्के पाणीसाठा झाला आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांतसुद्धा सरासरी ७०.२९ टक्के पाणीसाठा साचला आहे. २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ६७.१३ टक्के पाणीसाठा असून, ४६९ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ४९.९५ टक्के पाणीसाठा आहे.  मागील चार दिवसांपासून सार्वत्रिक पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होताना दिसून येत आहे. विदर्भात पुन्हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे. परतीच्या पावसात अनेक प्रकल्प शंभरी गाठतील, असा अंदाज जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वर्तविला आहे. जलसंपदा विभागाने १४ सप्टेंबरच्या सकाळी ७ वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार ५०२ प्रकल्पांत सरासरी ६२.७७ टक्के पाणीसाठा साचला आहे. या प्रकल्पांत प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा ३१७४.११ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा  १९९२.३० दलघमी आहे. दोन आठवड्यांत आणखी पाणीसाठ्यात वाढ होणार असल्याचा अंदाज जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.  नऊ मोठ्या प्रकल्पांत ७०.२९ टक्के पाणीसाठाअमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्प १०० टक्के भरला असून तीन गेट १० सेमींने उघडले आहेत. वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यंदा धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्यामुळे अमरावती शहरातील पिण्याच्या पाण्यासह या प्रकल्पातून होणाºया ७५ हजार हेक्टर सिंचनाची सोय झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस या मोठ्या प्रकल्पात ४३.६३ टक्के पाणीसाठा आहे. अरुणावती प्रकल्पात १२.९९ टक्के, बेंबळा प्रकल्पात ९८.३४ टक्के पाणीसाठा असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात काही प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झाली असून २३.३९ पाणीसाठा आहे. टक्के, वान प्रकल्पात ९३.४६ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ३४.५५ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात ९४.२० टक्के पाणीसाठा असून दोन गेट १० सेंमीने उघडण्यात आले आहे. खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांत ६८ टक्के पाणीसाठा अमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात ९४.४० टक्के पाणीसाठा असून ७.५ सें.मी. ४ गेट उघडले आहेत. चंद्रभागा प्रकल्पात ९३.९९ पाणीसाठा असून ५ सेंमीने दोन गेट उघडले आहे. पूर्णा प्रकल्पात ९१.३८ टक्के पाणीसाठा असून १५ सेंमीने दोन गेट उघडण्यात आले आहे.  सपन प्रकल्पात ९६.२७ टक्के पाणीसाठा असून १० सेंमीने चार गेट उघडले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस मध्यम प्रकल्पात ९७.६४ टक्के, सायखेडा १०० टक्के, गोकी ५२.८९ टक्के, वाघाडी ७६.५० टक्के, बोरगाव ८९.७१ टक्के नवरगाव १०० टक्के,  अकोला जिल्हा निर्गुणा ३४.११ टक्के, मोर्णा ३८.८१टक्के. उमा २५.२६ टक्के, घुंगशी बॅरेजमध्ये पहिल्यांदाच २६.५२ टक्के पाणीसाठा झाला आहे. वाशीम जिल्ह्यातील अडाण १३.३४ टक्के, सोनल ४१.३७ टक्के, एकबुर्जी ४९.७१ टक्के, बुलडाणा जिल्हा ज्ञानगंगा १०० टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोराडी शून्य टक्के, मन ६१.२३ टक्के, तोरणा ९६.२० टक्के उतावळी ६५.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीVidarbhaविदर्भWaterपाणी