शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत सरासरी ६३ टक्के पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 18:45 IST

पश्चिम विदर्भातील मोठे, लघु व मध्यम अशा एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६३ टक्के पाणीसाठा झाला आहे.

- संदीप मानकर 

अमरावती  - पश्चिम विदर्भातील मोठे, लघु व मध्यम अशा एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६३ टक्के पाणीसाठा झाला आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांतसुद्धा सरासरी ७०.२९ टक्के पाणीसाठा साचला आहे. २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ६७.१३ टक्के पाणीसाठा असून, ४६९ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ४९.९५ टक्के पाणीसाठा आहे.  मागील चार दिवसांपासून सार्वत्रिक पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होताना दिसून येत आहे. विदर्भात पुन्हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे. परतीच्या पावसात अनेक प्रकल्प शंभरी गाठतील, असा अंदाज जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वर्तविला आहे. जलसंपदा विभागाने १४ सप्टेंबरच्या सकाळी ७ वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार ५०२ प्रकल्पांत सरासरी ६२.७७ टक्के पाणीसाठा साचला आहे. या प्रकल्पांत प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा ३१७४.११ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा  १९९२.३० दलघमी आहे. दोन आठवड्यांत आणखी पाणीसाठ्यात वाढ होणार असल्याचा अंदाज जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.  नऊ मोठ्या प्रकल्पांत ७०.२९ टक्के पाणीसाठाअमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्प १०० टक्के भरला असून तीन गेट १० सेमींने उघडले आहेत. वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यंदा धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्यामुळे अमरावती शहरातील पिण्याच्या पाण्यासह या प्रकल्पातून होणाºया ७५ हजार हेक्टर सिंचनाची सोय झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस या मोठ्या प्रकल्पात ४३.६३ टक्के पाणीसाठा आहे. अरुणावती प्रकल्पात १२.९९ टक्के, बेंबळा प्रकल्पात ९८.३४ टक्के पाणीसाठा असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात काही प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झाली असून २३.३९ पाणीसाठा आहे. टक्के, वान प्रकल्पात ९३.४६ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ३४.५५ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात ९४.२० टक्के पाणीसाठा असून दोन गेट १० सेंमीने उघडण्यात आले आहे. खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांत ६८ टक्के पाणीसाठा अमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात ९४.४० टक्के पाणीसाठा असून ७.५ सें.मी. ४ गेट उघडले आहेत. चंद्रभागा प्रकल्पात ९३.९९ पाणीसाठा असून ५ सेंमीने दोन गेट उघडले आहे. पूर्णा प्रकल्पात ९१.३८ टक्के पाणीसाठा असून १५ सेंमीने दोन गेट उघडण्यात आले आहे.  सपन प्रकल्पात ९६.२७ टक्के पाणीसाठा असून १० सेंमीने चार गेट उघडले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस मध्यम प्रकल्पात ९७.६४ टक्के, सायखेडा १०० टक्के, गोकी ५२.८९ टक्के, वाघाडी ७६.५० टक्के, बोरगाव ८९.७१ टक्के नवरगाव १०० टक्के,  अकोला जिल्हा निर्गुणा ३४.११ टक्के, मोर्णा ३८.८१टक्के. उमा २५.२६ टक्के, घुंगशी बॅरेजमध्ये पहिल्यांदाच २६.५२ टक्के पाणीसाठा झाला आहे. वाशीम जिल्ह्यातील अडाण १३.३४ टक्के, सोनल ४१.३७ टक्के, एकबुर्जी ४९.७१ टक्के, बुलडाणा जिल्हा ज्ञानगंगा १०० टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोराडी शून्य टक्के, मन ६१.२३ टक्के, तोरणा ९६.२० टक्के उतावळी ६५.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीVidarbhaविदर्भWaterपाणी