शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

पाणीटंचाई तीव्र; टँकरवारीत दहापटीने वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 18:37 IST

गतवर्षी पावसाने दगा दिल्याने राज्यावर जलसंकटाचे मळभ अधिक तीव्र होऊ लागले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने झालेली वाढ त्या जलसंकटाच्या व्यापकतेची नांदी ठरली आहे.

- प्रदीप भाकरे

अमरावती : गतवर्षी पावसाने दगा दिल्याने राज्यावर जलसंकटाचे मळभ अधिक तीव्र होऊ लागले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने झालेली वाढ त्या जलसंकटाच्या व्यापकतेची नांदी ठरली आहे.  पाणीपुरवठा विभागानुसार, राज्यात २ फेब्रुवारीपर्यंत २ हजार ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केवळ २०२ टँकर्स पेयजलाचा पुरवठा करीत होते. सरासरीपेक्षा कमी पाऊस, सिंचनप्रकल्पांना पडलेली कोरड पाणीटंचाईत भर पाडणारी ठरली आहे. तूर्तास राज्यातील १,६८८ गावे व ३,७३९ वाड्यांना १६५ शासकीय व १८७६ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवार २०१८ मध्ये राज्यातील २३४ गावे व ३ वाड्यांनाच पाणीटंचाईची झळ पोहोचली होती. यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने वाढ झाली असताना पाणीटंचाई असलेल्या गाववाड्यांमध्ये तर २५ पटीने वाढ झाली आहे. तूर्तास, ठाणे विभागातील ५ गावे व ११ वाड्यांना ७ टँकरने, नाशिक विभागातील ५२२ गावे व २०९० वाड्यांमध्ये ५७६ टँकर, पुणे विभागातील १९८ गावे व १३२२ वाड्यांमध्ये २०० टँकर, औरंगाबाद विभागातील ९०४ गावे व ३१६ वाड्यांमध्ये १२०० टँकर, अमरावती विभागातील ५९ गावांमध्ये ५८ टँकर अशा एकूण २ हजार ४१ टँकरद्वारा पाणीपुरवठा केला जात आहे.

जलसाठा घटलाराज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक व पुणे विभागातील एकूण ३,२६७ सिंचन प्रकल्पांमध्ये ४ फेब्रुवारीअखेर केवळ ३८.६८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी तो ५४.९४ टक्के होता. जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नोंदीनुसार, अमरावती विभागातील ४४६ प्रकल्पांमध्ये ३५.९४ टक्के, औरंगाबाद विभागातील ९६४ प्रकल्पांमध्ये ११.७५ टक्के, नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांमध्ये १९.९३ टक्के, कोकण विभागातील १७६ प्रकल्पांमध्ये ६१.९ टक्के, नाशिक विभागातील ५७१ प्रकल्पांमध्ये ३५.६५ व पुणे विभागातील ७२६ प्रकल्पांमध्ये ५४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीWaterपाणी