शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाणीटंचाई तीव्र; टँकरवारीत दहापटीने वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 18:37 IST

गतवर्षी पावसाने दगा दिल्याने राज्यावर जलसंकटाचे मळभ अधिक तीव्र होऊ लागले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने झालेली वाढ त्या जलसंकटाच्या व्यापकतेची नांदी ठरली आहे.

- प्रदीप भाकरे

अमरावती : गतवर्षी पावसाने दगा दिल्याने राज्यावर जलसंकटाचे मळभ अधिक तीव्र होऊ लागले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने झालेली वाढ त्या जलसंकटाच्या व्यापकतेची नांदी ठरली आहे.  पाणीपुरवठा विभागानुसार, राज्यात २ फेब्रुवारीपर्यंत २ हजार ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केवळ २०२ टँकर्स पेयजलाचा पुरवठा करीत होते. सरासरीपेक्षा कमी पाऊस, सिंचनप्रकल्पांना पडलेली कोरड पाणीटंचाईत भर पाडणारी ठरली आहे. तूर्तास राज्यातील १,६८८ गावे व ३,७३९ वाड्यांना १६५ शासकीय व १८७६ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवार २०१८ मध्ये राज्यातील २३४ गावे व ३ वाड्यांनाच पाणीटंचाईची झळ पोहोचली होती. यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने वाढ झाली असताना पाणीटंचाई असलेल्या गाववाड्यांमध्ये तर २५ पटीने वाढ झाली आहे. तूर्तास, ठाणे विभागातील ५ गावे व ११ वाड्यांना ७ टँकरने, नाशिक विभागातील ५२२ गावे व २०९० वाड्यांमध्ये ५७६ टँकर, पुणे विभागातील १९८ गावे व १३२२ वाड्यांमध्ये २०० टँकर, औरंगाबाद विभागातील ९०४ गावे व ३१६ वाड्यांमध्ये १२०० टँकर, अमरावती विभागातील ५९ गावांमध्ये ५८ टँकर अशा एकूण २ हजार ४१ टँकरद्वारा पाणीपुरवठा केला जात आहे.

जलसाठा घटलाराज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक व पुणे विभागातील एकूण ३,२६७ सिंचन प्रकल्पांमध्ये ४ फेब्रुवारीअखेर केवळ ३८.६८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी तो ५४.९४ टक्के होता. जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नोंदीनुसार, अमरावती विभागातील ४४६ प्रकल्पांमध्ये ३५.९४ टक्के, औरंगाबाद विभागातील ९६४ प्रकल्पांमध्ये ११.७५ टक्के, नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांमध्ये १९.९३ टक्के, कोकण विभागातील १७६ प्रकल्पांमध्ये ६१.९ टक्के, नाशिक विभागातील ५७१ प्रकल्पांमध्ये ३५.६५ व पुणे विभागातील ७२६ प्रकल्पांमध्ये ५४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीWaterपाणी