शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

पाणीटंचाई तीव्र; टँकरवारीत दहापटीने वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 18:37 IST

गतवर्षी पावसाने दगा दिल्याने राज्यावर जलसंकटाचे मळभ अधिक तीव्र होऊ लागले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने झालेली वाढ त्या जलसंकटाच्या व्यापकतेची नांदी ठरली आहे.

- प्रदीप भाकरे

अमरावती : गतवर्षी पावसाने दगा दिल्याने राज्यावर जलसंकटाचे मळभ अधिक तीव्र होऊ लागले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने झालेली वाढ त्या जलसंकटाच्या व्यापकतेची नांदी ठरली आहे.  पाणीपुरवठा विभागानुसार, राज्यात २ फेब्रुवारीपर्यंत २ हजार ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केवळ २०२ टँकर्स पेयजलाचा पुरवठा करीत होते. सरासरीपेक्षा कमी पाऊस, सिंचनप्रकल्पांना पडलेली कोरड पाणीटंचाईत भर पाडणारी ठरली आहे. तूर्तास राज्यातील १,६८८ गावे व ३,७३९ वाड्यांना १६५ शासकीय व १८७६ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवार २०१८ मध्ये राज्यातील २३४ गावे व ३ वाड्यांनाच पाणीटंचाईची झळ पोहोचली होती. यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने वाढ झाली असताना पाणीटंचाई असलेल्या गाववाड्यांमध्ये तर २५ पटीने वाढ झाली आहे. तूर्तास, ठाणे विभागातील ५ गावे व ११ वाड्यांना ७ टँकरने, नाशिक विभागातील ५२२ गावे व २०९० वाड्यांमध्ये ५७६ टँकर, पुणे विभागातील १९८ गावे व १३२२ वाड्यांमध्ये २०० टँकर, औरंगाबाद विभागातील ९०४ गावे व ३१६ वाड्यांमध्ये १२०० टँकर, अमरावती विभागातील ५९ गावांमध्ये ५८ टँकर अशा एकूण २ हजार ४१ टँकरद्वारा पाणीपुरवठा केला जात आहे.

जलसाठा घटलाराज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक व पुणे विभागातील एकूण ३,२६७ सिंचन प्रकल्पांमध्ये ४ फेब्रुवारीअखेर केवळ ३८.६८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी तो ५४.९४ टक्के होता. जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नोंदीनुसार, अमरावती विभागातील ४४६ प्रकल्पांमध्ये ३५.९४ टक्के, औरंगाबाद विभागातील ९६४ प्रकल्पांमध्ये ११.७५ टक्के, नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांमध्ये १९.९३ टक्के, कोकण विभागातील १७६ प्रकल्पांमध्ये ६१.९ टक्के, नाशिक विभागातील ५७१ प्रकल्पांमध्ये ३५.६५ व पुणे विभागातील ७२६ प्रकल्पांमध्ये ५४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीWaterपाणी