शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

वरहडात डिसेंबरमध्येच पाण्यासाठी भटकंती; ४३ टक्के साठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 10:14 IST

यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा २६ टक्के पाऊस कमी झाल्याचा परिणाम आता वरहडात जाणवायला लागला आहे. दोन मोठे अन् मध्यम प्रकल्प वगळता उर्वरित ४५२ प्रकल्पांमध्ये सरासरी ४३ टक्केच साठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची अनास्थाआराखडेच नाहीत, अकोला जिल्ह्यात ४० टँकर सुरू

आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा २६ टक्के पाऊस कमी झाल्याचा परिणाम आता वरहडात जाणवायला लागला आहे. दोन मोठे अन् मध्यम प्रकल्प वगळता उर्वरित ४५२ प्रकल्पांमध्ये सरासरी ४३ टक्केच साठा शिल्लक आहे. सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यात ४० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळात विभागात जलसंकट भीषण होण्याची स्थिती ओढावणार आहे.विभागात बुलडाणा वगळता उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ७४ टक्केच पाऊस झाला. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत केवळ ३६ दिवस पाऊस पडला. त्याचे परिणाम आता जाणवायला लागले आहे. अकोला जिल्ह्यात ३७, बुलडाणा ३७, वाशिम २७, अमरावती ४५, तर यवतमाळ जिल्ह्यात फक्त ३४ दिवसच पाऊस पडला. या अपुऱ्या पावसामुळे खरिपाचा हंगाम बाधित झाला. परतीच्या पावसामुळे जमिनीची थोडीफार आर्द्रता वाढली.त्यामुळे रबीचे क्षेत्र वाढले असले तरी जमिनीतील पाण्यात मात्र वाढ झाली नाही. याउलट सिंचन विहिरींची पातळी खोल गेली. भूजल सर्वेक्षण विभागानुसार, अमरावती विभागातील भूजलस्तर सरासरी दोन मीटरपेक्षा अधिक खालावला असल्याने आगामी काळात पाणीटंचाईची भीषण समस्या उद्भवणार आहे.विशेष म्हणजे, विभागातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा कृती आराखडाच अद्याप जिल्ह्यांनी तयार केलेला नाही. विभागीय आयुक्तांनी याविषयी सर्व जिल्हा प्रशासनाला दोन वेळा पत्र दिले आहे.मात्र, अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचीच अनास्था असल्यामुळे विभागात यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची स्थिती बिकट रूप धारण करणार आहे.

४५४ प्रकल्पांमध्ये ४३.९४ टक्केच साठाविभागात नऊ मुख्य प्रकल्प आहेत. यापैकी अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा ८५ टक्के व अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात ९८ टक्के जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये सरासरीच्या ३६ टक्केच साठा आहे. मध्यम प्रकल्पात सपन ८० टक्के, पूर्णा ८७ व सायखेडा वगळता उर्वरित २० मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ४० टक्केच साठा आहे. विभागात एकूण ४५२ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ३१ टक्केच साठा असल्याने उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचे सावट आहे.

जलशिवारच्या कामांचा आराखड्यास खोडाविभागात २०१५-१६ मध्ये १३९६ व २०१६-१७ मध्ये ९९७ अशा एकूण २३९७ गावांध्ये जलयुक्त शिवार अभियानची कामे करण्यात आलीत. या गावांतील जलस्तर उंचावल्याचे प्रशासनाचे म्हणणे असल्याने सर्व जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्याला विलंब होत आहे. मात्र, जानेवारीपासून आराखड्याच्या अंमलबजावणीचा दुसरा टप्पा सुरू होत असतानाही आराखडेच नसल्यामुळे विभागीय आयुक्त पीयूषसिंह यांनी सर्व जिल्ह्यांना पत्र दिले आहे.

टॅग्स :Waterपाणी